Jagannath Yatra Stampede: जगन्नाथ यात्रेला गालबोट! चेंगराचेंगरीत तीन भाविकांचा मृत्यू, अनेकजण जण जखमी

पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ भीषण चेंगराचेंगरी


ओडिशा: पुरी जिल्ह्यातील भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेदरम्यान रविवारी सकाळी श्री गुंडीचा मंदिराजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत किमान तीन भाविकांचा मृत्यू झाला आणि सुमारे १० जण जखमी झाले. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास श्री गुंडीचा मंदिरासमोर रथावर विराजमान भगवान जगन्नाथ यांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. यादरम्यान, धक्काबुक्की झाली आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली.


पुरीचे जिल्हाधिकारी सिद्धार्थ एस स्वैन यांनी सांगितले की, या घटनेतील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यापैकी सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे. बसंती साहू, प्रेमकांत मोहंती आणि प्रवती दास अशी मृतांची नावे आहेत. तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. आणि प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. गर्दी नियंत्रित करण्यासाठी आणि जखमींना मदत करण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.


दरम्यान, शुक्रवारी पुरी येथे महाप्रभू जगन्नाथ यांच्या रथयात्रेदरम्यान काही लोकांनी गुदमरल्याची तक्रार केली आणि आर्द्रतेमुळे अनेक जण बेशुद्ध पडले होते. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी रथयात्रेदरम्यान प्रचंड उष्णतेमुळे आणि प्रचंड गर्दीमुळे सुमारे ६२५ लोक आजारी पडले. अनेक भाविकांना रुग्णालयात दाखल करावे लागले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बहुतेक लोकांना उलट्या, चक्कर येणे आणि किरकोळ दुखापती झाल्या.


पुरीचे मुख्य जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सत्पथी म्हणाले की, बहुतेक रुग्णांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले. त्यांनी सांगितले की, कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Comments
Add Comment

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे