Jagannath Yatra Stampede: जगन्नाथ यात्रेला गालबोट! चेंगराचेंगरीत तीन भाविकांचा मृत्यू, अनेकजण जण जखमी

पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ भीषण चेंगराचेंगरी


ओडिशा: पुरी जिल्ह्यातील भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेदरम्यान रविवारी सकाळी श्री गुंडीचा मंदिराजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत किमान तीन भाविकांचा मृत्यू झाला आणि सुमारे १० जण जखमी झाले. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास श्री गुंडीचा मंदिरासमोर रथावर विराजमान भगवान जगन्नाथ यांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. यादरम्यान, धक्काबुक्की झाली आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली.


पुरीचे जिल्हाधिकारी सिद्धार्थ एस स्वैन यांनी सांगितले की, या घटनेतील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यापैकी सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे. बसंती साहू, प्रेमकांत मोहंती आणि प्रवती दास अशी मृतांची नावे आहेत. तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. आणि प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. गर्दी नियंत्रित करण्यासाठी आणि जखमींना मदत करण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.


दरम्यान, शुक्रवारी पुरी येथे महाप्रभू जगन्नाथ यांच्या रथयात्रेदरम्यान काही लोकांनी गुदमरल्याची तक्रार केली आणि आर्द्रतेमुळे अनेक जण बेशुद्ध पडले होते. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी रथयात्रेदरम्यान प्रचंड उष्णतेमुळे आणि प्रचंड गर्दीमुळे सुमारे ६२५ लोक आजारी पडले. अनेक भाविकांना रुग्णालयात दाखल करावे लागले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बहुतेक लोकांना उलट्या, चक्कर येणे आणि किरकोळ दुखापती झाल्या.


पुरीचे मुख्य जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सत्पथी म्हणाले की, बहुतेक रुग्णांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले. त्यांनी सांगितले की, कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने