आयसीसीकडून क्रिकेटच्या ६ नियमांमध्ये बदल

  36

नवी दिल्ली : आयसीसीने क्रिकेटच्या नियमांमध्ये काही बदल केले आहे . हे नियम कसोटी, एकदिवसीय आणि टी २० क्रिकेटसाठी आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपलाही हे नियम लागू होणार आहेत.

कोणते आहेत हे नियम ?


कॅच रिव्यूमध्ये एलीबीडब्ल्यू

आयसीसीनं कॅचच्या नियमांमध्ये देखील बदल केले आहेत. जर कॅच आऊटच्या रिव्यूमध्ये तो चुकीचा ठरल्यास आणि बॉल पॅडवर लागल्यास टीव्ही अम्पायर एलीबीडब्ल्यू फलंदाज आऊट आहे का ते पाहतील. हा नियम कसोटी, टी २० आणि वनडे मध्ये लागू असेल.

शॉर्ट रन काढल्यास दंड

आयसीसीनं कसोटी, वनडे आणि टी २० क्रिकेटमधील शॉर्ट रनचा नियम बदलला आहे. जाणीवपूर्वक शॉर्ट रन घेतल्यास पहिल्यांदा ५ धावांचा दंड लावला जायचा. आता फलंदाजानं अतिरिक्त रन घेण्यासाठी जाणीवपूर्वक पहिली रन पूर्ण न केल्यास फील्डिंग करणाऱ्या संघाला स्ट्राइकवर कोणता खेळाडू पाहिजे असं विचारतील, आणि त्यांनी सांगितलेल्या खेळाडुला स्ट्राइकवर घेतले जाईल . ५ धावांचा नियम देखील लागू असेल , त्यात बदल नाही .

चुकून चेंडूला लाळ लावली म्हणून चेंडू बदलता येणार नाही

एखाद्या गोलंदाजानं चुकून चेंडूला लाळ लावली म्हणून चेंडू बदलता येणार नाही. चुकून लाळ लावल्यास चेंडू बदलणे अनिवार्य नसेल. चेंडूच्या रचनेत बदल झाल्यास किंवा चेंडू खूप ओला झाल्यानं त्याच्यावरील चमक वाढल्यास अम्पायर चेंडू बदलण्याचा निर्णय घेऊ शकतात. चेंडू बदलण्याचा निर्णय घेणं हे पंचांवर अवलंबून असेल. चेंडूत फार बदल झाला नसेल तर तर तो बदलला जाणार नाही. हे नियम कसोटी, वनडे आणि टी २० क्रिकेटसाठी लागू असतील .

कसोटी क्रिकेटमध्ये स्टॉप वॉच

आयसीसीनं कसोटी क्रिकेटमध्ये स्टॉप क्लॉक नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमानुसार कसोटी क्रिकेटमध्ये फील्डिंग करणाऱ्या टीमनं ६० सेकंदापेक्षा जास्त वेळ ओव्हर सुरु करण्यास लावल्यास पहिल्यांदा दोन वेळा वॉर्निंग दिली जाईल . त्यानंतर नियमाचे पालन न केल्यास त्या संघाच्या ५ धावा वजा केल्या जाणार आहेत. टी २० क्रिकेट आणि वनडे क्रिकेटमध्ये हा नियम एक वर्षापासून लागू आहे.

नोबॉलवर कॅच

पंचांनी सॉफ्ट सिग्नल रिव्यू घेतल्यास आणि नो बॉलवर कॅच योग्य असल्यास फलंदाजी करणाऱ्या टीमला नो बॉलची एक रन अतिरिक्त मिळेल. कॅच योग्य नसल्यास नो बॉलची एक रन आणि फलंदाज जितक्या रन धावतील त्यांना त्या धावा मिळतील.

पहिल्यांदा कॅचसंदर्भात संशय असल्यास मैदानावरील पंच थंर्ड अम्पायरकडे दाद मागायचे. त्यावेळी टीव्ही अम्पायर नो बॉल होता की नव्हता हे सांगायचे, कॅचची तपासणी करत नव्हते. आता त्याची तपासणी केली जाईल. कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० मध्ये हा नियम लागू असेल.

टी २० पॉवर प्लेचे नियम बदलले

आयसीसीनं टी २० क्रिकेटमधील पॉवरप्लेच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. हे नियम जुलैपासून लागू होणार आहेत. पाऊस किंवा अन्य कारणांमुळं मॅचमधील ओव्हर कमी केल्यास पॉवरप्लेच्या ओव्हर देखील कमी केल्या जाणार आहे.

ओव्हर आणि पॉवरप्ले

५ ओव्हरची मॅच : १.३ ओव्हरचा पॉवरप्ले
६ ओव्हरची मॅच : १.५ ओव्हरचा पॉवरप्ले
७ ओव्हरची मॅच : २.१ ओव्हरचा पॉवरप्ले
८ ओव्हरची मॅच : २.२ ओव्हरचा पॉवरप्ले
९ ओव्हरची मॅच : २.४ ओव्हरचा पॉवरप्ले
१० ओव्हरची मॅच : ३ ओव्हरचा पॉवरप्ले
११ ओव्हरची मॅच : ३.२ ओव्हरचा पॉवरप्ले
१२ ओव्हरची मॅच : ३.४ ओव्हरचा पॉवरप्ले
१३ ओव्हरची मॅच : ३.५ ओव्हरचा पॉवरप्ले
१४ ओव्हरची मॅच : ४.१ ओव्हरचा पॉवरप्ले
१५ ओव्हरची मॅच : ४.३ ओव्हरचा पॉवरप्ले
१६ ओव्हरची मॅच : ४.५ ओव्हरचा पॉवरप्ले
१७ ओव्हरची मॅच : ५.१ ओव्हरचा पॉवरप्ले
१८ ओव्हरची मॅच : ५.२ ओव्हरचा पॉवरप्ले
१९ ओव्हरची मॅच : ५.४ ओव्हरचा पॉवरप्ले
Comments
Add Comment

Ravi Shastri on Shubhaman Gill: शुभमन गिलला ३ वर्षे कर्णधारपदी कायम ठेवा – रवी शास्त्री

लंडन: भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलला पाठिंबा

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत