Electricity Price : इलेक्ट्रिक वाहनधारकांच्या खिशाला कात्री, महावितरणाकडून दरवाढ होणार?

  37

मुंबई : पेट्रोलच्या वाढत्या किंमतीला कंटाळून अनेक वाहनधारकांनी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करायला सुरवात केली. आता इलेक्ट्रिक वाहनधारकांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे. १ जूलैपासून इलेक्ट्रिक वाहनधारकांना चार्जिंग स्टेशनला पुरवल्या जाणाऱ्या विजेच्या दरात प्रतियुनिट वाढ करण्यात येणार आहे. ही वाढ ५० पैशांहून अधिक असणार आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन वापरणाऱ्या वाहनधारकांच्या खिशाला कात्री लागणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. महावितरण विभागाने दाखल केलेल्या याचिकेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने नुकतेच वीज दर निश्चित करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे घरगुती वीज वापरत असलेल्या ग्राहकांना दिलासा देण्यात आला असून विजेवरील वाहनांना पुरवल्या जाणाऱ्या विजेच्या दरात पुढील पाच वर्षे वाढ होत राहणार असल्याची शक्यता वर्तवण्याता आलेली आहे.


विशेष म्हणजे टाटा पॉवर, अदानी इलेक्ट्रिसिटी, बेस्ट इलेक्ट्रिसीटी, यांच्या तुलनेत महावितरणचे वीज दर जास्त असणार आहेत. सुरवातीला महावितरण यांच्याकडून प्रतियुनिटचा दर ८.४७ रुपये असून तो आता १ जुलैपासून ९.०१ रुपये एवढा होणार आहे.पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या वाहनांसाठी इंधन आयात करावे लागत असून त्यासाठी परकीय चलनात वाढ होते. त्याची दखल घेत वीज आयोगाने पुढील पाच वर्षासाठी बहुवार्षिक वीज दर निश्चित करताना इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी चार्जिंग स्टेशनला पुरवल्या जाणाऱ्या प्रतियुनिट विजेचा दर सहा रूपये एवढा निश्चित केला होता. मात्र यंदाची दरवाढ पाहता आयोगाने प्रोत्साहन मोहिम गुंडाळल्याचे दिसत आहे..


 

 

 

 

 
Comments
Add Comment

'समितीचा अहवाल येऊ दे किंवा नको येऊ दे, परंतु हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत'

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा सरकारला इशारा मुंबई : राज्य सरकारने त्रिभाषा संदर्भातील दोन जीआर रद्द केले आहेत.

त्रिभाषा सूत्रासंदर्भात सांगोपांग अभ्यास, विद्यार्थी हितासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती - मुख्यमंत्री

पावसाळी अधिवेशनात १२ विधेयके लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्यासाठी ३६०० कोटी मंजूर मुंबई : राज्यात सर्व

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या शिधापत्रिकांचा रंग हवा पांढरा

अन्य रंगांच्या पत्रिका असल्यास त्वरीत बदलाव्या लागणार मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कार्यरत कर्मचारी

पाच तारखेचा मोर्चा निघणार नाही, सर्वपक्षीय नेत्यांचा निर्णय

मुंबई : मागील सरकारमध्ये उद्धव ठाकरे  मुख्यमंत्री असताना हिंदी भाषा सक्तीकरणाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे

कुठल्या तोंडाने आंदोलन करता, शासनाचे दोन्ही जीआर रद्द; फडणवीसांची घोषणा

मुंबई : राज्यात हिंदी भाषेला विरुध्द करण्यासाठी राजकीय वाद, आरोप-प्रत्यारोप होत आहेत. याच पार्श्वभूमीवर

मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा महागणार

मुंबई :मुंबई डबेवाल्यांच्या सेवा दरात आता वाढ होणार आहे . याबद्दलची सविस्तर माहिती मुंबई डबेवाला असोसिएशन ने