रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, आता ४ नव्हे तर रेल्वे सुटण्याच्या इतके तास आधी तयार होणार चार्ट

नवी दिल्ली: तुम्ही जर रेल्वेमधून प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता तिकीटिंग आणि रिझर्व्हेशन प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या दिशेने पावले उचलण्यासाठी भारतीय रेल्वे सातत्याने नवनवीन उपक्रम करत आहे. १ जुलैपासून आता तत्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलणार आहेत. आता रेल्वे मंडळाने या प्रपोजलवर सहमती दर्शवली आहे. यात रेल्वे सुटण्याच्या ८ तास आधी रिझर्व्हेशन चार्ट तयार होणार आहे.

टप्प्याटप्प्याने लागू होणार नियम


रेल्वे बोर्डाने प्रवाशांसाठी रेल्वे सुटण्याच्या आठ तास आधी आरक्षण चार्ट तयार करण्याबाबतचा प्रस्ताव ठेवला होता. यावर सहमती दर्शवताना केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. रेल्वे मंत्रीने प्रपोजला टप्प्याटप्प्याने लागू करण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. ही बातमी रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एखाद्या गिफ्टपेक्षा कमी नाही.

शेवटच्या क्षणापर्यंतची प्रतीक्षा संपली


रेल्वेच्या या निर्णयामुळे आता आपली तिकीट कन्फर्म झाली की नाही याची माहिती आधीच मिळणार आहे. त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत याची वाट बघायला नको. आठ तास आधीच कन्फर्मेशन मिळाल्याने प्रवाशांना प्रवासही सुलभ होणार आहे.

१ जुलैपासून रेल्वे करत आहेत हे बदल


रेल्वे प्रवाशांच्या सविधेसाठी भारतीय रेल्वे सातत्याने पावले उचलत आहे. याच अंतर्गत १ जुलै २०२५पासून मोठा बदल होत आहे. यात पहिल्या तारखेपासून आता केवळ आधार व्हेरिफाईड युजर्सच आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरून तत्काळ तिकीट बुक करू शकतात.
Comments
Add Comment

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी