रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, आता ४ नव्हे तर रेल्वे सुटण्याच्या इतके तास आधी तयार होणार चार्ट

  45

नवी दिल्ली: तुम्ही जर रेल्वेमधून प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता तिकीटिंग आणि रिझर्व्हेशन प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या दिशेने पावले उचलण्यासाठी भारतीय रेल्वे सातत्याने नवनवीन उपक्रम करत आहे. १ जुलैपासून आता तत्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलणार आहेत. आता रेल्वे मंडळाने या प्रपोजलवर सहमती दर्शवली आहे. यात रेल्वे सुटण्याच्या ८ तास आधी रिझर्व्हेशन चार्ट तयार होणार आहे.

टप्प्याटप्प्याने लागू होणार नियम


रेल्वे बोर्डाने प्रवाशांसाठी रेल्वे सुटण्याच्या आठ तास आधी आरक्षण चार्ट तयार करण्याबाबतचा प्रस्ताव ठेवला होता. यावर सहमती दर्शवताना केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. रेल्वे मंत्रीने प्रपोजला टप्प्याटप्प्याने लागू करण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. ही बातमी रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एखाद्या गिफ्टपेक्षा कमी नाही.

शेवटच्या क्षणापर्यंतची प्रतीक्षा संपली


रेल्वेच्या या निर्णयामुळे आता आपली तिकीट कन्फर्म झाली की नाही याची माहिती आधीच मिळणार आहे. त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत याची वाट बघायला नको. आठ तास आधीच कन्फर्मेशन मिळाल्याने प्रवाशांना प्रवासही सुलभ होणार आहे.

१ जुलैपासून रेल्वे करत आहेत हे बदल


रेल्वे प्रवाशांच्या सविधेसाठी भारतीय रेल्वे सातत्याने पावले उचलत आहे. याच अंतर्गत १ जुलै २०२५पासून मोठा बदल होत आहे. यात पहिल्या तारखेपासून आता केवळ आधार व्हेरिफाईड युजर्सच आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरून तत्काळ तिकीट बुक करू शकतात.
Comments
Add Comment

Emergency : आणीबाणी लादणाऱ्यांनी संविधानाची हत्या केली - पंतप्रधान

नवी दिल्ली : देशावर आणीबाणी लादण्यात आली, त्या घटनेला काही दिवसांपूर्वी पन्नास वर्षे पूर्ण झाली. आपण

केरळच्या शाळांमध्ये झुंबा सक्ती

कोझिकोड : अमली पदार्थविरोधी मोहिमेचा भाग म्हणून शाळांमध्ये झुंबा नृत्याचे शिक्षण बंधनकारक करण्याचा निर्णय

Jagannath Yatra Stampede: डीएम-एसपींची बदली, दोन अधिकारी निलंबित...चेंगराचेंगरीत झालेल्या ३ मृत्यूंबाबत ओडिशा सरकारची मोठी कारवाई

ओडिशा: भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेदरम्यान पुरीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीची गंभीर दखल घेत, ओडिशा सरकारने

दुचाकी वाहनांसाठी आता दोन हेल्मेटची सक्ती, परिवहन मंत्रालयाचा आदेश

मुंबई : दुचाकी वाहनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे! रस्ते अपघात कमी करण्याच्या उद्देशाने

राजस्थान सीमेजवळ आढळले दोन मृतदेह, पोलीस तपास सुरू

जैसलमेर : राजस्थानमध्ये जैसलमेर जिल्ह्यात भारत - पाकिस्तान सीमेजवळ दोन मृतदेह आढळले. यातील एक मृतदेह अल्पवयीन

Jagannath Yatra Stampede: जगन्नाथ यात्रेला गालबोट! चेंगराचेंगरीत तीन भाविकांचा मृत्यू, अनेकजण जण जखमी

पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ भीषण चेंगराचेंगरी ओडिशा: पुरी जिल्ह्यातील भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेदरम्यान