रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, आता ४ नव्हे तर रेल्वे सुटण्याच्या इतके तास आधी तयार होणार चार्ट

नवी दिल्ली: तुम्ही जर रेल्वेमधून प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता तिकीटिंग आणि रिझर्व्हेशन प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या दिशेने पावले उचलण्यासाठी भारतीय रेल्वे सातत्याने नवनवीन उपक्रम करत आहे. १ जुलैपासून आता तत्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलणार आहेत. आता रेल्वे मंडळाने या प्रपोजलवर सहमती दर्शवली आहे. यात रेल्वे सुटण्याच्या ८ तास आधी रिझर्व्हेशन चार्ट तयार होणार आहे.

टप्प्याटप्प्याने लागू होणार नियम


रेल्वे बोर्डाने प्रवाशांसाठी रेल्वे सुटण्याच्या आठ तास आधी आरक्षण चार्ट तयार करण्याबाबतचा प्रस्ताव ठेवला होता. यावर सहमती दर्शवताना केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. रेल्वे मंत्रीने प्रपोजला टप्प्याटप्प्याने लागू करण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. ही बातमी रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एखाद्या गिफ्टपेक्षा कमी नाही.

शेवटच्या क्षणापर्यंतची प्रतीक्षा संपली


रेल्वेच्या या निर्णयामुळे आता आपली तिकीट कन्फर्म झाली की नाही याची माहिती आधीच मिळणार आहे. त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत याची वाट बघायला नको. आठ तास आधीच कन्फर्मेशन मिळाल्याने प्रवाशांना प्रवासही सुलभ होणार आहे.

१ जुलैपासून रेल्वे करत आहेत हे बदल


रेल्वे प्रवाशांच्या सविधेसाठी भारतीय रेल्वे सातत्याने पावले उचलत आहे. याच अंतर्गत १ जुलै २०२५पासून मोठा बदल होत आहे. यात पहिल्या तारखेपासून आता केवळ आधार व्हेरिफाईड युजर्सच आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरून तत्काळ तिकीट बुक करू शकतात.
Comments
Add Comment

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे