टप्प्याटप्प्याने लागू होणार नियम
रेल्वे बोर्डाने प्रवाशांसाठी रेल्वे सुटण्याच्या आठ तास आधी आरक्षण चार्ट तयार करण्याबाबतचा प्रस्ताव ठेवला होता. यावर सहमती दर्शवताना केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. रेल्वे मंत्रीने प्रपोजला टप्प्याटप्प्याने लागू करण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. ही बातमी रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एखाद्या गिफ्टपेक्षा कमी नाही.
शेवटच्या क्षणापर्यंतची प्रतीक्षा संपली
रेल्वेच्या या निर्णयामुळे आता आपली तिकीट कन्फर्म झाली की नाही याची माहिती आधीच मिळणार आहे. त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत याची वाट बघायला नको. आठ तास आधीच कन्फर्मेशन मिळाल्याने प्रवाशांना प्रवासही सुलभ होणार आहे.
१ जुलैपासून रेल्वे करत आहेत हे बदल
रेल्वे प्रवाशांच्या सविधेसाठी भारतीय रेल्वे सातत्याने पावले उचलत आहे. याच अंतर्गत १ जुलै २०२५पासून मोठा बदल होत आहे. यात पहिल्या तारखेपासून आता केवळ आधार व्हेरिफाईड युजर्सच आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरून तत्काळ तिकीट बुक करू शकतात.