श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

मुंबई: गुजरातमधील जुनागड येथील गिरनार पर्वताच्या पाचव्या भागात श्री दत्तात्रेय भगवान यांचे तपश्चर्या स्थान आहे. दत्त भक्ताचे श्रद्धास्थान असलेल्या या जागेवर गेल्या काही वर्षापासून दिगंबर जैन आपला हक्क सांगण्याचा प्रयत्न केला आहे; परंतु गुजरात न्यायालयाने यासंदर्भातील याचिकेवरील सुनावणीत शांततेच्या मार्गाने फक्त दर्शन घेण्याचे निर्देश दिलेले असतानाही, दिगंबर जैन पंथाकडून दर्शनाच्या नावाखाली शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न सुरू आहे.


येत्या २ जुलै २०२५ रोजी जैन मंडळीकडून शक्ती प्रदर्शन झाल्यास धार्मिक तेढ निर्माण होउ शकतो. याबाबत स्थानिक प्रशासनाने योग्य खबरदारी घेतली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास मदत करावी, असे आवाहन श्रीगुरु दत्तात्रेय गिरनार चॅरिटेबल ट्रस्टचे कैलास पुरोहित यांनी केले आहे.


गिरनार हे दत्तस्थान असून दत्त भगवान यांनी येथे १२ हजार वर्षे ध्यान केले होते आणि तेथून ते निराकार झाले. दत्तांनी गिरनार येथे त्यांच्या पाऊलखुणा सोडल्या. ज्यांची पूजा गुरू-शिष्य परंपरेनुसार अखंड चालू आहे. दर पौर्णिमेला दत्तभक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गिरनार वारीला येतात.


हिंदू धर्मियांच्या भावनांना ठेच पोहचविण्याचे काम काही जैन मंडळीकडून केले जात असल्याने महाराष्ट्र आणि संपूर्ण देशातील दत्तभक्त दुःखी झाले आहेत. त्यामुळे काही दत्त भक्तांनी स्वयंस्फुर्तीने मोठ्या संख्येने या हिंसक घटनेचा निषेध केला आहे.


गिरनार पर्वताचे पावित्र्य राखत शांतता पद्धतीने दर्शन व्हावे, प्रशासनाला पूर्ण सहकार्य करत, कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये याची हजारोंच्या संख्येने गिरनार पर्वतावर उपस्थित राहणार असल्याचे समजते. दरम्यान, दिगंबर जैन पंथाच्या दाव्यानुसार, येथील पाचवा भाग त्यांच्या श्री नेमिनाथ जींचा आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : वर्ष २०३०-३१ पर्यंत नवीन फार्मसी अभ्यासक्रमांना स्थगिती

मुख्यमंत्र्यांचा निर्णय; सिंधुदुर्गमध्ये 'हॉटेल मॅनेजमेंट'ला मान्यता, दुर्गम भागात १७ नवीन व्यावसायिक

विदर्भासाठी ५५० कि.मी.च्या चार महामार्गांना मंजुरी

पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत निर्णय; दोन वर्षांत काम पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश मुंबई :

स्पर्धा परीक्षेत सवलत घेतल्यास 'खुल्या' प्रवर्गातील दावा अमान्य

राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; आरक्षणाच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न मुंबई : सरकारी

Maharashtra Investment : राज्यात १.१४ लाख कोटींची नवी गुंतवणूक

८ हजार रोजगार निर्माण होणार; उद्योग विभाग आणि एएम इंटेलिजन्स लॅब यांच्यात सामंजस्य करार मुंबई : राज्याच्या

राज्यात ३० जूनपासून मतदार याद्यांच्या शुद्धीकरणाचा 'श्रीगणेशा'

 'एसआयआर' मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर; ७ ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार मुंबई : लोकशाहीचे अविभाज्य अंग

Nitesh Rane : इंधन बचतीसाठी मंत्री नितेश राणेंचा मंत्रालयापर्यंत पायी प्रवास

मुंबई : जागतिक इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या 'काटकसरी'च्या आवाहनाला