पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात सुधारणा झाली. त्यामुळे मुंबईकरांची  पाण्याच्या  बाबतीत चिंता मिटली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी धरणात जास्त प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे मुंबईकरांवरील पाणी संकट टळलं आहे.  मागील वर्षात धरणात ५.३५ टक्के पाणीसाठा असल्याने मुंबईकरांची चिंता वाढली होती. मुंबईच्या धरणात उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमधून प्रतिदिन ३९०० दशलक्ष पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे या वर्षी मुंबईच्या धरणात ३८.५८ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.


मुंबईकरांना उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमधून प्रतिदिन ३९०० दशलक्ष पाणीपुरवठा करण्यात येतो. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने या सातही धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून धरणांतील पाणीसाठ्याने तळ गाठायला सुरुवात केली होती. कडक उन्हाळ्यामुळे झपाट्याने होणाऱ्या बाष्पीभवनामुळे धरणांमधील पाणीसाठा खालावू लागला होता.


यंदा मे महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे सातही धरणांतील जलसाठ्यात वाढ होऊ लागली होती. आतापर्यंत सातही धरणांमध्ये ३८.५८ टक्के पाच लाख ५८ हजार ३५० दशलक्ष पाणीसाठा उपलब्ध झाला होता.गतवर्षी याच दिवशी या धरणांतील पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक होती. त्यावेळी केवळ ५.३५ टक्के म्हणजे ७७ हजार ४२१ दशलक्ष लिटर इतके पाणी धरणांमध्ये होते. तर तत्पूर्वी २८ जून २०२३ रोजी धरणांमध्ये एक लाख पाच हजार १०८ दशलक्ष लिटर (७.२६ टक्के) पाणी उपलब्ध होते. मागील दोन वर्षांच्या तुलनेत धरणांतील साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे भविष्यात पावसाचा जोर वाढला तर धरणातला पाणीसाठा जास्त वाढू शकतो. त्यामुळे मुंबईकरांनावरील पाण्याचं संकट पूर्णपणे टळलं आहे.













Comments
Add Comment

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,

Radhakrishna Vikhe Patil : धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी सर्वेक्षण करणार

मुंबई : जलसंपदा विभाग आता मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहक

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Weather Update : महाराष्ट्रातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : राज्यात श्रावणाचं आगमन धो धो पावसानं होणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत गुरुवार १३ ते शनिवार १५ ऑगस्ट

Nitesh Rane : मच्छीमार बांधवांसाठी आधुनिक व सर्व सुविधांयुक्त वास्तू उभारणार – मंत्री नितेश राणे

· मरोळ मच्छी मार्केटच्या विकासकामांना गती देणार मुंबई, दि. 12: मुंबईतील मच्छीमार बांधवांसाठी महत्त्वपूर्ण

Water Metro : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी; वॉटर मेट्रोसह विविध प्रकल्पांना मिळणार गती

मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने अनेक