पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात सुधारणा झाली. त्यामुळे मुंबईकरांची  पाण्याच्या  बाबतीत चिंता मिटली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी धरणात जास्त प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे मुंबईकरांवरील पाणी संकट टळलं आहे.  मागील वर्षात धरणात ५.३५ टक्के पाणीसाठा असल्याने मुंबईकरांची चिंता वाढली होती. मुंबईच्या धरणात उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमधून प्रतिदिन ३९०० दशलक्ष पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे या वर्षी मुंबईच्या धरणात ३८.५८ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.


मुंबईकरांना उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमधून प्रतिदिन ३९०० दशलक्ष पाणीपुरवठा करण्यात येतो. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने या सातही धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून धरणांतील पाणीसाठ्याने तळ गाठायला सुरुवात केली होती. कडक उन्हाळ्यामुळे झपाट्याने होणाऱ्या बाष्पीभवनामुळे धरणांमधील पाणीसाठा खालावू लागला होता.


यंदा मे महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे सातही धरणांतील जलसाठ्यात वाढ होऊ लागली होती. आतापर्यंत सातही धरणांमध्ये ३८.५८ टक्के पाच लाख ५८ हजार ३५० दशलक्ष पाणीसाठा उपलब्ध झाला होता.गतवर्षी याच दिवशी या धरणांतील पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक होती. त्यावेळी केवळ ५.३५ टक्के म्हणजे ७७ हजार ४२१ दशलक्ष लिटर इतके पाणी धरणांमध्ये होते. तर तत्पूर्वी २८ जून २०२३ रोजी धरणांमध्ये एक लाख पाच हजार १०८ दशलक्ष लिटर (७.२६ टक्के) पाणी उपलब्ध होते. मागील दोन वर्षांच्या तुलनेत धरणांतील साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे भविष्यात पावसाचा जोर वाढला तर धरणातला पाणीसाठा जास्त वाढू शकतो. त्यामुळे मुंबईकरांनावरील पाण्याचं संकट पूर्णपणे टळलं आहे.













Comments
Add Comment

Chandrakant-dada Patil : पॉलीटेक्निक प्रवेशासाठी अर्ज करण्यास ६ जुलैपर्यंत मुदतवाढ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा विद्यार्थीहिताच्या निर्णय

मुंबई  : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील(Chandrakant Patil) यांनी विद्यार्थीहिताला सर्वोच्च प्राधान्य देत

Pandharpur Wari : आषाढी वारीसाठी मानाच्या १ हजार ४०० दिंड्यांना प्रत्येकी २० हजारांचे अनुदान

मुंबई : आषाढी एकादशी वारीसाठी मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या १ हजार ४०० दिंड्यांना प्रत्येकी २० हजार

Sakinaka Manhole Accident : साकीनाका मॅनहोल दुर्घटनेप्रकरणी चार अधिकाऱ्यांचे निलंबन

- विधानसभेत नगरविकास राज्यमंत्र्यांचे निवेदन; मृताच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत, उच्च स्तरीय समिती

Dattatray Bharne : महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर

विशेष सवलतींची तरतूद; शेतमजूर, निराधार महिलांना मिळणार शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता मुंबई : राज्यातील

Devendra Fadnavis : माहिती अधिकार कायद्यांमधील बदलांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती

राज्य माहिती आयोगाला पत्र; अण्णा हजारेंनी दिला होता उपोषणाचा इशारा मुंबई : माहिती अधिकार (

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो-३ मार्ग

सार्वजनिक वाहतूक दिवसानिमित्त अ‍ॅक्वा लाईनच्या प्रवाशांसाठी बीकेसी मध्ये मोफत फीडर बस सेवा मुंबई: मुंबई