पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात सुधारणा झाली. त्यामुळे मुंबईकरांची  पाण्याच्या  बाबतीत चिंता मिटली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी धरणात जास्त प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे मुंबईकरांवरील पाणी संकट टळलं आहे.  मागील वर्षात धरणात ५.३५ टक्के पाणीसाठा असल्याने मुंबईकरांची चिंता वाढली होती. मुंबईच्या धरणात उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमधून प्रतिदिन ३९०० दशलक्ष पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे या वर्षी मुंबईच्या धरणात ३८.५८ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.


मुंबईकरांना उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमधून प्रतिदिन ३९०० दशलक्ष पाणीपुरवठा करण्यात येतो. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने या सातही धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून धरणांतील पाणीसाठ्याने तळ गाठायला सुरुवात केली होती. कडक उन्हाळ्यामुळे झपाट्याने होणाऱ्या बाष्पीभवनामुळे धरणांमधील पाणीसाठा खालावू लागला होता.


यंदा मे महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे सातही धरणांतील जलसाठ्यात वाढ होऊ लागली होती. आतापर्यंत सातही धरणांमध्ये ३८.५८ टक्के पाच लाख ५८ हजार ३५० दशलक्ष पाणीसाठा उपलब्ध झाला होता.गतवर्षी याच दिवशी या धरणांतील पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक होती. त्यावेळी केवळ ५.३५ टक्के म्हणजे ७७ हजार ४२१ दशलक्ष लिटर इतके पाणी धरणांमध्ये होते. तर तत्पूर्वी २८ जून २०२३ रोजी धरणांमध्ये एक लाख पाच हजार १०८ दशलक्ष लिटर (७.२६ टक्के) पाणी उपलब्ध होते. मागील दोन वर्षांच्या तुलनेत धरणांतील साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे भविष्यात पावसाचा जोर वाढला तर धरणातला पाणीसाठा जास्त वाढू शकतो. त्यामुळे मुंबईकरांनावरील पाण्याचं संकट पूर्णपणे टळलं आहे.













Comments
Add Comment

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम