वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले. या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक व्यक्ती जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे.


शनिवारी संध्याकाळी ६.१५ वाजता हे तीन व्यक्ती अस्थी विसर्जनासाठी वरळीच्या लोटस जेट्टीजवळ गेले होते.


पावसाळ्याच्या काळात समुद्र आधीच उसळलेला असतो. अस्थी विसर्जन करण्यासाठी ते समुद्राच्या खोल भागात गेले असता तिथे ते बुडाले.


यावेळी तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी तत्काळ ओरडून मदत मागितली. जेट्टीवर तैनात असलेल्या पोलिसांनी स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने तिन्ही व्यक्तींना समुद्रातून बाहेर काढले आणि त्वरित नायर रुग्णालयात दाखल केले.


रुग्णालयात दाखल करताना दोघांचा आधीच मृत्यू झाला होता. तिसरा व्यक्ती जखमी अवस्थेत आहे आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालयाच्या माहितीनुसार जखमी व्यक्तीची प्रकृती स्थिर आहे.


मृत व्यक्तींची नावे:


संतोष विश्वेश्वर (वय ५१)
कुणाल कोकाटे (वय ४५)


जखमी व्यक्ती:


संजय सरवणकर (वय ५८)



या पावसाळ्यातील पहिली घटना


मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, यावर्षीच्या पावसाळ्यात मुंबई समुद्रात बुडून होणारा हा पहिला मृत्यू आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही दुर्दैवी घटना घडली आहे.


मुंबई महानगरपालिकेने पावसाळ्याच्या सुरुवातीलाच नागरिकांना समुद्रकिनाऱ्यावर न जाण्याचा इशारा दिला होता. पावसाळ्यात समुद्रातील लाटा धोकादायक असतात आणि अपघाताची शक्यता वाढते, असे सांगितले होते.

Comments
Add Comment

मुंबईतील कचरा खासगीकरणाच्या निविदेला विलंब

खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबई महापालिकेच्या सफाई खात्याच्यावतीने कचरा उचलण्यासाठी वाहनांसह मनुष्यबळ

दुर्गंधी पसरत नाही की कचरा दिसत नाही, मुंबईतल्या अनोख्या कचरापेट्या

सचिन धानजी, मुंबई : मुंबईत आज कुणालाच आपल्या घरासमोर कचरा नको असतो. तसेच सार्वजनिक कचरा पेट्या असल्यास त्या

मुंबईत साथीच्या आजारांचे वाढले प्रमाण

मुंबई : गेल्या पंधरावड्यात साथीच्या आजारांनी पुन्हा डोके वर काढले. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात

'आपली एसटी' ॲपद्वारे कळणार लालपरीचा ठावठिकाणा - प्रताप सरनाईक

मुंबई : प्रत्येक थांब्यावर एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना एसटीचा अचुक ठावठीकाणा काळावा

नवी मुंबई विमानतळामुळे महामार्गावर 'ट्रॅफिक कोंडी'चा धोका!

विमानतळासाठी वाहतूक 'वळवणार'; पाम बीच रोडवरील गर्दी टाळण्यासाठी 'सिक्रेट प्लॅन' लागू नवी मुंबई: नवी मुंबई

तब्बल १५ वर्षांपासून महिला होती त्रस्त, महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी कायमची केली त्रासातून मुक्तता ..

मुंबई (खास प्रतिनिधी) : रजोनिवृत्तीनंतरच्या रक्तस्त्रावाच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्य ६५ वर्षीय महिलेवर