वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

  55

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले. या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक व्यक्ती जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे.


शनिवारी संध्याकाळी ६.१५ वाजता हे तीन व्यक्ती अस्थी विसर्जनासाठी वरळीच्या लोटस जेट्टीजवळ गेले होते.


पावसाळ्याच्या काळात समुद्र आधीच उसळलेला असतो. अस्थी विसर्जन करण्यासाठी ते समुद्राच्या खोल भागात गेले असता तिथे ते बुडाले.


यावेळी तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी तत्काळ ओरडून मदत मागितली. जेट्टीवर तैनात असलेल्या पोलिसांनी स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने तिन्ही व्यक्तींना समुद्रातून बाहेर काढले आणि त्वरित नायर रुग्णालयात दाखल केले.


रुग्णालयात दाखल करताना दोघांचा आधीच मृत्यू झाला होता. तिसरा व्यक्ती जखमी अवस्थेत आहे आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालयाच्या माहितीनुसार जखमी व्यक्तीची प्रकृती स्थिर आहे.


मृत व्यक्तींची नावे:


संतोष विश्वेश्वर (वय ५१)
कुणाल कोकाटे (वय ४५)


जखमी व्यक्ती:


संजय सरवणकर (वय ५८)



या पावसाळ्यातील पहिली घटना


मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, यावर्षीच्या पावसाळ्यात मुंबई समुद्रात बुडून होणारा हा पहिला मृत्यू आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही दुर्दैवी घटना घडली आहे.


मुंबई महानगरपालिकेने पावसाळ्याच्या सुरुवातीलाच नागरिकांना समुद्रकिनाऱ्यावर न जाण्याचा इशारा दिला होता. पावसाळ्यात समुद्रातील लाटा धोकादायक असतात आणि अपघाताची शक्यता वाढते, असे सांगितले होते.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, 'एसटी'साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची