रविवारी रेल्वेचा मेगाब्लॉक

मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वेचा रविवार २९ जून २०२५ रोजी मेगाब्लॉक आहे. ब्लॉक काळात उपनगरीय रेल्वे सेवेच्या वेळापत्रकात बदल केला जाणार आहे. अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. काही गाड्यांच्या मार्गात फेरबदल करण्यात आले आहेत. गाड्या नियोजीत वेळेच्या तुलनेत काही मिनिटे उशिराने धावतील. यामुळे प्रवाशांनी मेगाब्लॉक काळातील वेळापत्रकाची माहिती घेऊन नंतर प्रवासाचे नियजन करणे हिताचे आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी मध्यरात्रीच वसई रोड ते वैतरणादरम्यान देखभाल दुरुस्तीसाठी ब्लॉक घेण्यात आला होता. यामुळे पश्चिम रेल्वेवर रविवारी ब्लॉक नसेल.

मध्य रेल्वे, मुख्य मार्ग - ठाणे ते कल्याण जाणाऱ्या आणि येणाऱ्या जलद मार्गावर - सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० मेगाब्लॉक
ब्लॉक काळात ठाणे ते कल्याण जाणाऱ्या आणि येणाऱ्या जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर वळवल्या जातील. काही गाड्या २० मिनिटे उशिराने धावतील.

हार्बर रेल्वे मार्ग - पनवेल ते वाशी - जाणाऱ्या आणि येणाऱ्या मार्गावर - सकाळी ११.०५ ते संध्याकाळी ४.०५ मेगाब्लॉक - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल/बेलापूरदरम्यान, ठाणे ते पनवेलदरम्यान जाणाऱ्या आणि येणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. सीएसएमटी ते वाशीदरम्यान विशेष लोकल फेऱ्या धावणार आहेत. ठाणे ते वाशी/नेरूळदरम्यान आणि खारकोपर मार्गावर लोकल फेऱ्या सुरू राहणार आहेत. ब्लॉक वेळेत हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.
Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण