वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार वर्धा जिल्ह्यातील निमसडा गावात झाला आहे . आधी खून आणि नंतर आत्महत्येच्या घटनेने गावात खळबळ उडाली आहे .
पनवेल : तक्का परिसरातील स्वप्नालय नावाच्या संस्थेजवळ बास्केटमध्ये बेवारस अवस्थेत अर्भक आढळले. ही घटना शनिवार २८ जून २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास घडली. ...
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या शेतीच्या वादाने काल नवीनच वळण घेतले. वर्धा जिल्ह्यातील निमसडा गावात मोहिजे कुटुंबात शेतीच्या वाटपावरून वाद सुरू होते . हा वाद इतका चिघळला की आरोपी महेंद्र मोहिजे याने त्याची चुलती साधना सुभाष मोहिजे (वय ५५) आणि त्यांचा मुलगा नितीन सुभाष मोहिजे (वय २७) यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले . त्यात या दोघांचाही मृत्यू झाला . त्यानंतर घाबरलेल्या आरोपी महेंद्र मोहिजेने देखील विष पिऊन आपली जीवनयात्रा संपवली . या घटनेनंतर अल्लीपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली . पोलीस अधीक्षक अनुराग जैन आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक राहुल चौहान यांनी घटनास्थळाची पाहणी केली . यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी वर्धा जिल्हा रुग्णालयात पाठवले गेले .
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महेंद्र मोहिजे हा साधना मोहिजे यांचा पुतण्या होता, तर नितीन मोहिजे त्याचा चुलत भाऊ होता . शेतीच्या मालकीहक्कावरून आणि मिळणाऱ्या उत्पन्नाच्या वाटपावरून अनेक दिवसांपासून हे वाद सुरू होते. त्या वादातून महेंद्र मोहिजेने हे पाऊल उचलले . घटनास्थळी हजर असलेल्या आणि शेजारी राहणाऱ्या लोकांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत . अधिक तपास अल्लीपूर पोलीस करत आहेत .