शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

  24

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार वर्धा जिल्ह्यातील निमसडा गावात झाला आहे . आधी खून आणि नंतर आत्महत्येच्या घटनेने गावात खळबळ उडाली आहे .



गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या शेतीच्या वादाने काल नवीनच वळण घेतले. वर्धा जिल्ह्यातील निमसडा गावात मोहिजे कुटुंबात शेतीच्या वाटपावरून वाद सुरू होते . हा वाद इतका चिघळला की आरोपी महेंद्र मोहिजे याने त्याची चुलती साधना सुभाष मोहिजे (वय ५५) आणि त्यांचा मुलगा नितीन सुभाष मोहिजे (वय २७) यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले . त्यात या दोघांचाही मृत्यू झाला . त्यानंतर घाबरलेल्या आरोपी महेंद्र मोहिजेने देखील विष पिऊन आपली जीवनयात्रा संपवली . या घटनेनंतर अल्लीपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली . पोलीस अधीक्षक अनुराग जैन आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक राहुल चौहान यांनी घटनास्थळाची पाहणी केली . यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी वर्धा जिल्हा रुग्णालयात पाठवले गेले .


पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महेंद्र मोहिजे हा साधना मोहिजे यांचा पुतण्या होता, तर नितीन मोहिजे त्याचा चुलत भाऊ होता . शेतीच्या मालकीहक्कावरून आणि मिळणाऱ्या उत्पन्नाच्या वाटपावरून अनेक दिवसांपासून हे वाद सुरू होते. त्या वादातून महेंद्र मोहिजेने हे पाऊल उचलले . घटनास्थळी हजर असलेल्या आणि शेजारी राहणाऱ्या लोकांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत . अधिक तपास अल्लीपूर पोलीस करत आहेत .

Comments
Add Comment

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक