शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार वर्धा जिल्ह्यातील निमसडा गावात झाला आहे . आधी खून आणि नंतर आत्महत्येच्या घटनेने गावात खळबळ उडाली आहे .



गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या शेतीच्या वादाने काल नवीनच वळण घेतले. वर्धा जिल्ह्यातील निमसडा गावात मोहिजे कुटुंबात शेतीच्या वाटपावरून वाद सुरू होते . हा वाद इतका चिघळला की आरोपी महेंद्र मोहिजे याने त्याची चुलती साधना सुभाष मोहिजे (वय ५५) आणि त्यांचा मुलगा नितीन सुभाष मोहिजे (वय २७) यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले . त्यात या दोघांचाही मृत्यू झाला . त्यानंतर घाबरलेल्या आरोपी महेंद्र मोहिजेने देखील विष पिऊन आपली जीवनयात्रा संपवली . या घटनेनंतर अल्लीपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली . पोलीस अधीक्षक अनुराग जैन आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक राहुल चौहान यांनी घटनास्थळाची पाहणी केली . यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी वर्धा जिल्हा रुग्णालयात पाठवले गेले .


पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महेंद्र मोहिजे हा साधना मोहिजे यांचा पुतण्या होता, तर नितीन मोहिजे त्याचा चुलत भाऊ होता . शेतीच्या मालकीहक्कावरून आणि मिळणाऱ्या उत्पन्नाच्या वाटपावरून अनेक दिवसांपासून हे वाद सुरू होते. त्या वादातून महेंद्र मोहिजेने हे पाऊल उचलले . घटनास्थळी हजर असलेल्या आणि शेजारी राहणाऱ्या लोकांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत . अधिक तपास अल्लीपूर पोलीस करत आहेत .

Comments
Add Comment

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी