मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत. अशातच लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी मेट्रो ५ चा विस्तार करण्याचा निर्णय राज्य सरकाने घेतला असून ठाणे-कल्याण-भिंवडी या ठिकाणी मेट्रो ५ चा विस्तार करण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल ट्रेनची गर्दी कमी होईल असा विश्वास राज्य सरकारच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे. तसेच हा विस्तार उल्हासनगर, आणि अंबरनाथ पर्यंत  केला जाईल अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी महत्वाची बैठक देखील बोलवली होती.


भिवंडी शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन परिवहन सेवेच्या गरजा भागविण्यासाठी कल्याण - भिवंडी मेट्रो लाईन प्रकल्प राबविण्यात येत आहे. भिंवडी शहरात मोठ्या प्रमाणात मालवाहतूक होत असते त्यामुळे स्थानिकांना कायमच वाहतून कोंडीचा सामना करावा लागतो. वाहतूक समस्या आणि प्रवाशी यांच्यावरती कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी मेट्रोसह रस्त्याचे रुंदीकरण आणि नवीन उड्डाणपूल स्वतंत्र प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यांसदर्भात आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले "मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (MMRDA) राबविण्यात येत असलेल्या मेट्रो लाईन-5 या प्रकल्पांच्या माध्यमातून ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर परिसरातील लाखो नागरिकांना जलद, सुरक्षित सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध होणार आहे. विकसनशील शहरे आणि औद्योगिक केंद्रे यांच्यासाठी सार्वजनिक वाहतूक आणि रस्ते ही दोन्ही माध्यमे परस्परपूरक असून त्यांची अंमलबजावणी समांतर पद्धतीने केल्यास विकासाची गती वाढेल. त्यामुळे नागरिकांना अधिक फायदेशीर सेवा मिळू शकणार आहे." असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.


तसेच या प्रकल्पांमुळे औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. तसेच मेट्रो प्रकल्पाचा विस्तार उल्हासनगर पर्यंत वाढवला जाईल. त्यासंदर्भात विशेष समिती नेमून अभ्यास करतील त्यामुळे अंबरनाथ, उल्हासनगर परिसरात राहणाऱ्या लाखो रहिवाशांचा प्रवास जलद गतीने होणार आहे.












Comments
Add Comment

Poison Capsule Case: विषारी कॅप्सूल वाटप प्रकरणात सायको किलरचा मास्टरप्लॅन; AI ला विचारले नको ते प्रश्न 

मुंबई: मुंबईतील (Mumbai) मोहरम मिरवणुकीदरम्यान विषारी कॅप्सूल वाटप (Poison Capsule Case) करण्याच्या संशयित कटाचा मुंबई

लोकल प्रवाशाच्या हत्येनंतर रेल्वे पोलिसांचा निर्णय; स्थानकांवर बॅगांची होणार तपासणी

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकल रेल्वेत प्रवाशाच्या हत्येनंतर रेल्वे पोलिसांनी

'निवडक प्रकल्पांमुळे पालघर जिल्हा होणार राज्याच्या विकासाचे ग्रोथ इंजिन'

वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, विमानतळ आणि सागरी सेतूची मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली पाहणी पालघर : राज्याच्या पायाभूत

Mumbai News: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील साठा ७.०८ टक्क्यांवर

मुंबई : मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांतील पाणीसाठा अद्याप चिंताजन

Bhendi Bazaar Fire : दक्षिण मुंबईत मध्यरात्री खळबळ! भेंडी बाजारजवळ बीएमसीच्या भूमिगत केबलला आग; परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार परिसरात रविवारी उशिरा रात्री भूमिगत बीएससी (BSC) केबलला अचानक आग लागल्याने

मढ-वर्सोवा पूलाच्या बांधकाम आता जोरात; विविध पर्यावरणीय परवानगी प्राप्त

कांदळवन विभागाला भरणार साडेबारा कोटींचे शुल्क मुंबई : मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या के/पश्चिम व पी/उत्तर