मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत. अशातच लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी मेट्रो ५ चा विस्तार करण्याचा निर्णय राज्य सरकाने घेतला असून ठाणे-कल्याण-भिंवडी या ठिकाणी मेट्रो ५ चा विस्तार करण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल ट्रेनची गर्दी कमी होईल असा विश्वास राज्य सरकारच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे. तसेच हा विस्तार उल्हासनगर, आणि अंबरनाथ पर्यंत  केला जाईल अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी महत्वाची बैठक देखील बोलवली होती.


भिवंडी शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन परिवहन सेवेच्या गरजा भागविण्यासाठी कल्याण - भिवंडी मेट्रो लाईन प्रकल्प राबविण्यात येत आहे. भिंवडी शहरात मोठ्या प्रमाणात मालवाहतूक होत असते त्यामुळे स्थानिकांना कायमच वाहतून कोंडीचा सामना करावा लागतो. वाहतूक समस्या आणि प्रवाशी यांच्यावरती कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी मेट्रोसह रस्त्याचे रुंदीकरण आणि नवीन उड्डाणपूल स्वतंत्र प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यांसदर्भात आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले "मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (MMRDA) राबविण्यात येत असलेल्या मेट्रो लाईन-5 या प्रकल्पांच्या माध्यमातून ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर परिसरातील लाखो नागरिकांना जलद, सुरक्षित सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध होणार आहे. विकसनशील शहरे आणि औद्योगिक केंद्रे यांच्यासाठी सार्वजनिक वाहतूक आणि रस्ते ही दोन्ही माध्यमे परस्परपूरक असून त्यांची अंमलबजावणी समांतर पद्धतीने केल्यास विकासाची गती वाढेल. त्यामुळे नागरिकांना अधिक फायदेशीर सेवा मिळू शकणार आहे." असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.


तसेच या प्रकल्पांमुळे औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. तसेच मेट्रो प्रकल्पाचा विस्तार उल्हासनगर पर्यंत वाढवला जाईल. त्यासंदर्भात विशेष समिती नेमून अभ्यास करतील त्यामुळे अंबरनाथ, उल्हासनगर परिसरात राहणाऱ्या लाखो रहिवाशांचा प्रवास जलद गतीने होणार आहे.












Comments
Add Comment

Vakola Unauthorized Shops : वाकोलातील पदपथांवरील ३७ अनधिकृत दुकानांवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) पदपथांवर पादचाऱ्यांना सुलभपणे मार्गक्रमण करता यावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून

Har Ghar Tiranga : प्रत्येक विभागात निघणाऱ्या तिरंगा रॅलीत मुंबईकरांनी सहभागी व्हावे

- मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून मुंबईकरांना आवाहन मुंबई (विशेष प्रतिनिधी) केंद्र शासनाच्या मार्गदर्शक

Mumbai Water Cut : मुंबईकरांवरील कपात कायम, पण जलतरण तलावांचा पाणी पुरवठा पूर्वव्रत

- तलावांमधील पाणी अद्यापही ९० टक्क्यांच्या पुढे जाईना मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेला पाणी पुरवठा

Mumbai Landslide-prone Locations : मुंबईत ४६ दरडीची ठिकाणे ही अतिधोकादायक

- मुंबई महापालिकेला येथील रहिवाशांना बाहेर काढायचा अधिकार काय? - जिल्हाधिकारी तोंडावर बोट ठेवून गप्प बसले,

Zeeshan Siddique : ‘तुला जिवंत सोडणार नाही’; NCP नेते झीशान सिद्दीकींना जीवे मारण्याची धमकी, फरार गँगस्टरकडून ऑडिओ मेसेज

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते आणि आमदार झीशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,