अंधश्रद्धेतून महिलेचा खून, आरोपीस अटक

कळवा : कळवा स्टेशन जवळील सीमा हाईट्स या इमारती मध्ये मजुरीचे काम करणाऱ्या महिलेची हत्या करून, तिचे दागिने चोरून नेणाऱ्या तीन आरोपींना कळवा पोलीस आणि गुन्हे शाखा यांनी बिहार राज्यातून अटक केली आहे. याबाबत माहिती देताना सहाय्यक पोलीस आयुक्त उत्तम कोळेकर यांनी सांगितले की, पंधरा दिवसांपूर्वी तीन आरोपी हे कळवा झोपडपट्टी येथे राहिले, हत्या करण्याच्या उद्धेशानेच ते बिहार येथून आले होते.


भारतात अजून अंधश्रद्धा खूप आहे. बिहार सारखे राज्य सुद्धा अजून मागास आहे, बिहारमधील खगडिया या जिल्ह्यातील गावात अशी अंधश्रद्धा आहे की जर दागिने चोरी करायला सुरुवात करायची असेल तर त्या अगोदर एका महिलेची हत्या करायची, तो एक शुभशकून मानला जातो, आणि यासाठी ते तीनही आरोपी बिहार मधून इथे आले. १४ जूनला त्यांनी शांताबाई चव्हाण या बिगारी काम करणाऱ्या महिलेला सीमा हाईट्स या बिल्डिंग येथे कामानिमित्त नेले आणि तिची चाकूने वार करून हत्या केली.


जाताना त्यांनी तिच्या गळ्यातील आणि कानातील दागिने काढून घेऊन ते विकले होते. कळवा पोलिसांनी आणि गुन्हे शाखेने एकत्रित तपास करत कोणताही पुरवा नसताना तांत्रिक विश्लेषणाद्वारे, सिसिटीव्ही तपासात हे आरोपी बिहारला पळून गेल्याचे शोधून काढले.


पोलिसांची तीन पथके बिहार राज्यातील खगडिया येथे पोहचली आणि तिन वेगवेगळ्या ठिकाणाहून या तिनही आरोपिंना त्यांनी ताब्यात घेतले, त्यातील एकाच्या घरातून एक गावठी कट्टा आणि तीन जिवंत काडतूसे त्यांनी हस्तगत केली. या तिघांना कळवा पोलीस स्टेशन येथे आणल्यावर त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले आणि हत्या झालेल्या महिलेचे दागिने विकून त्यांच्या अकाऊंटला जमा झालेले बावीस हजार रुपये जप्त केले, न्यायालयाने यातील दोन आरोपींना १ जुलैपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे.

Comments
Add Comment

भिवंडीत श्वानदंश झालेल्या मुलाचा मृत्यू

भिवंडी : श्वानदंश झालेल्या १२ वर्षीय हमीद खान याचा उपचारादरम्यान मृत्यूची घटना भिवंडीत घडली आहे. १० जानेवारीला

ठाण्यातील भव्य त्रिमंदिर भाविकांसाठी खुले; तीन दिवसांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनास सुरुवात

ठाणे : ठाणे शहरात उभारण्यात आलेले भव्य त्रिमंदिर अखेर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या

ठाणे-घोडबंदर रोडचे रुंदीकरण होणार?

मीरा-भाईंदर (वार्ताहर): ठाणे-घोडबंदर रस्ता ६० मीटर रुंद करण्यासाठी आवश्यक असणारी भूसंपादनाची प्रक्रिया

कोयना प्रकल्पग्रस्त सुविधांपासून वंचित

ठाणे ( प्रतिनिधी): साडेसहा दशकांपूर्वी सातारा जिल्ह्यातील कोयना धरण प्रकल्पात बाधित झालेल्या सुमारे ८०हून अधिक

ठाणे शहरात उभारणार १९ ई-वाहन चार्जिंग स्टेशन्स

ठाणे (प्रतिनिधी) : महापालिका क्षेत्रातील इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शहरात ई-वाहन वापराला

सायबर दृष्टी सेलचा डिजिटल साक्षरता प्रवास

कल्याण (प्रतिनिधी) : बी. के. बिर्ला नाईट कॉलेज, कल्याण येथील सायबर दृष्टी सेल यांच्या विद्यमाने नागरिकांमध्ये