अंधश्रद्धेतून महिलेचा खून, आरोपीस अटक

कळवा : कळवा स्टेशन जवळील सीमा हाईट्स या इमारती मध्ये मजुरीचे काम करणाऱ्या महिलेची हत्या करून, तिचे दागिने चोरून नेणाऱ्या तीन आरोपींना कळवा पोलीस आणि गुन्हे शाखा यांनी बिहार राज्यातून अटक केली आहे. याबाबत माहिती देताना सहाय्यक पोलीस आयुक्त उत्तम कोळेकर यांनी सांगितले की, पंधरा दिवसांपूर्वी तीन आरोपी हे कळवा झोपडपट्टी येथे राहिले, हत्या करण्याच्या उद्धेशानेच ते बिहार येथून आले होते.


भारतात अजून अंधश्रद्धा खूप आहे. बिहार सारखे राज्य सुद्धा अजून मागास आहे, बिहारमधील खगडिया या जिल्ह्यातील गावात अशी अंधश्रद्धा आहे की जर दागिने चोरी करायला सुरुवात करायची असेल तर त्या अगोदर एका महिलेची हत्या करायची, तो एक शुभशकून मानला जातो, आणि यासाठी ते तीनही आरोपी बिहार मधून इथे आले. १४ जूनला त्यांनी शांताबाई चव्हाण या बिगारी काम करणाऱ्या महिलेला सीमा हाईट्स या बिल्डिंग येथे कामानिमित्त नेले आणि तिची चाकूने वार करून हत्या केली.


जाताना त्यांनी तिच्या गळ्यातील आणि कानातील दागिने काढून घेऊन ते विकले होते. कळवा पोलिसांनी आणि गुन्हे शाखेने एकत्रित तपास करत कोणताही पुरवा नसताना तांत्रिक विश्लेषणाद्वारे, सिसिटीव्ही तपासात हे आरोपी बिहारला पळून गेल्याचे शोधून काढले.


पोलिसांची तीन पथके बिहार राज्यातील खगडिया येथे पोहचली आणि तिन वेगवेगळ्या ठिकाणाहून या तिनही आरोपिंना त्यांनी ताब्यात घेतले, त्यातील एकाच्या घरातून एक गावठी कट्टा आणि तीन जिवंत काडतूसे त्यांनी हस्तगत केली. या तिघांना कळवा पोलीस स्टेशन येथे आणल्यावर त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले आणि हत्या झालेल्या महिलेचे दागिने विकून त्यांच्या अकाऊंटला जमा झालेले बावीस हजार रुपये जप्त केले, न्यायालयाने यातील दोन आरोपींना १ जुलैपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे.

Comments
Add Comment

कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांचा पुन्हा हल्ला; ७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू, परिसरात संताप

कल्याण : काही दिवसांपूर्वीच कुत्र्याच्या चाव्यानंतर भीतीतून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती.

भटका कुत्रा चावला अन् तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

कल्याण : दहशतवादी संघटनांप्रमाणेच आता भटक्या कुत्रांचीही दहशत अनेक शहरात वाऱ्यासारखी परसरत आहेत. अनेक

ठाणाच्या नगरसेवकांचा वेगळाच थाट; ठाणे महापालिकेच्या दारात सजल्या आलिशान गाड्या

ठाणे : कार एक्स्पो नव्हे तर ठाण्याच्या महानगरपालिका मुख्यालयाच अंगण आलिशान गाड्यांनी व्यापून गेलं होत. निमित्त

डोंबिवलीत जलवाहिनी फुटली, हजारो लीटर पाण्याची नासाडी

डोंबिवली : डोंबिवलीत जेसीबीचा धक्का लागल्यामुळे जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाण्याची

Thane Municipal Corporation : ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ मध्ये ठाणे महापालिकेने पटकाविला तिसरा क्रमांक

ठाणे : राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरण बदल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’

Ravindra Chavan : भिवंडी पालिकेत बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई करणार : रवींद्र चव्हाण

काँग्रेसच्या सहकार्याने भाजपचे बंडखोर महापौर पदी मुंबई : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत