अंधश्रद्धेतून महिलेचा खून, आरोपीस अटक

कळवा : कळवा स्टेशन जवळील सीमा हाईट्स या इमारती मध्ये मजुरीचे काम करणाऱ्या महिलेची हत्या करून, तिचे दागिने चोरून नेणाऱ्या तीन आरोपींना कळवा पोलीस आणि गुन्हे शाखा यांनी बिहार राज्यातून अटक केली आहे. याबाबत माहिती देताना सहाय्यक पोलीस आयुक्त उत्तम कोळेकर यांनी सांगितले की, पंधरा दिवसांपूर्वी तीन आरोपी हे कळवा झोपडपट्टी येथे राहिले, हत्या करण्याच्या उद्धेशानेच ते बिहार येथून आले होते.


भारतात अजून अंधश्रद्धा खूप आहे. बिहार सारखे राज्य सुद्धा अजून मागास आहे, बिहारमधील खगडिया या जिल्ह्यातील गावात अशी अंधश्रद्धा आहे की जर दागिने चोरी करायला सुरुवात करायची असेल तर त्या अगोदर एका महिलेची हत्या करायची, तो एक शुभशकून मानला जातो, आणि यासाठी ते तीनही आरोपी बिहार मधून इथे आले. १४ जूनला त्यांनी शांताबाई चव्हाण या बिगारी काम करणाऱ्या महिलेला सीमा हाईट्स या बिल्डिंग येथे कामानिमित्त नेले आणि तिची चाकूने वार करून हत्या केली.


जाताना त्यांनी तिच्या गळ्यातील आणि कानातील दागिने काढून घेऊन ते विकले होते. कळवा पोलिसांनी आणि गुन्हे शाखेने एकत्रित तपास करत कोणताही पुरवा नसताना तांत्रिक विश्लेषणाद्वारे, सिसिटीव्ही तपासात हे आरोपी बिहारला पळून गेल्याचे शोधून काढले.


पोलिसांची तीन पथके बिहार राज्यातील खगडिया येथे पोहचली आणि तिन वेगवेगळ्या ठिकाणाहून या तिनही आरोपिंना त्यांनी ताब्यात घेतले, त्यातील एकाच्या घरातून एक गावठी कट्टा आणि तीन जिवंत काडतूसे त्यांनी हस्तगत केली. या तिघांना कळवा पोलीस स्टेशन येथे आणल्यावर त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले आणि हत्या झालेल्या महिलेचे दागिने विकून त्यांच्या अकाऊंटला जमा झालेले बावीस हजार रुपये जप्त केले, न्यायालयाने यातील दोन आरोपींना १ जुलैपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे.

Comments
Add Comment

सर्पदंश झालेल्या मावशीचाही उपचारादरम्यान मृत्यू!

मृतांच्या नातेवाइकांचे मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन कल्याण (वार्ताहर) : साडेचार वर्षांच्या

बदलापूरमध्ये परप्रांतीय फेरीवाल्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोपले

बदलापूर : अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई सोमवारी पश्चिम

उघड्या नाल्याच्या चेंबरमध्ये पडून मुलाचा मृत्यू

डोंबिवली : उघड्या नाल्याच्या चेंबरमध्ये पडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना रविवार २८ तारखेला रात्री आठ

एका जाडजूड बॅगेने घेतला रेल्वे प्रवाशांचा जीव, मुंब्रा अपघात प्रकरणी हाती आली नवी माहिती

मुंब्रा : जून २०२५ मध्ये मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ अपघात झाला होता. काही प्रवासी रेल्वे रुळावर तसेच दोन

डोंबिवलीत प्रियकराने केली आत्महत्या, पण नेमकं कारण काय? खरंच प्रेयसीसोबत वाद झाला होता का?

प्रेमसंबंधातील वाद की काहीतरी वेगळं? डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील राहुलनगर परिसरात शनिवारी दुपारी घडलेल्या

ठाणे हायस्पीड रेल्वे स्टेशन होणार देशातील पहिले मल्टीमोडल इंटीग्रेटेड स्टेशन

आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन ठाणे : ठाण्यात सर्व वाहतूक सुविधांचे जंक्शन तयार होणार आहे. शहराचे आमूलाग्र