अंधश्रद्धेतून महिलेचा खून, आरोपीस अटक

कळवा : कळवा स्टेशन जवळील सीमा हाईट्स या इमारती मध्ये मजुरीचे काम करणाऱ्या महिलेची हत्या करून, तिचे दागिने चोरून नेणाऱ्या तीन आरोपींना कळवा पोलीस आणि गुन्हे शाखा यांनी बिहार राज्यातून अटक केली आहे. याबाबत माहिती देताना सहाय्यक पोलीस आयुक्त उत्तम कोळेकर यांनी सांगितले की, पंधरा दिवसांपूर्वी तीन आरोपी हे कळवा झोपडपट्टी येथे राहिले, हत्या करण्याच्या उद्धेशानेच ते बिहार येथून आले होते.


भारतात अजून अंधश्रद्धा खूप आहे. बिहार सारखे राज्य सुद्धा अजून मागास आहे, बिहारमधील खगडिया या जिल्ह्यातील गावात अशी अंधश्रद्धा आहे की जर दागिने चोरी करायला सुरुवात करायची असेल तर त्या अगोदर एका महिलेची हत्या करायची, तो एक शुभशकून मानला जातो, आणि यासाठी ते तीनही आरोपी बिहार मधून इथे आले. १४ जूनला त्यांनी शांताबाई चव्हाण या बिगारी काम करणाऱ्या महिलेला सीमा हाईट्स या बिल्डिंग येथे कामानिमित्त नेले आणि तिची चाकूने वार करून हत्या केली.


जाताना त्यांनी तिच्या गळ्यातील आणि कानातील दागिने काढून घेऊन ते विकले होते. कळवा पोलिसांनी आणि गुन्हे शाखेने एकत्रित तपास करत कोणताही पुरवा नसताना तांत्रिक विश्लेषणाद्वारे, सिसिटीव्ही तपासात हे आरोपी बिहारला पळून गेल्याचे शोधून काढले.


पोलिसांची तीन पथके बिहार राज्यातील खगडिया येथे पोहचली आणि तिन वेगवेगळ्या ठिकाणाहून या तिनही आरोपिंना त्यांनी ताब्यात घेतले, त्यातील एकाच्या घरातून एक गावठी कट्टा आणि तीन जिवंत काडतूसे त्यांनी हस्तगत केली. या तिघांना कळवा पोलीस स्टेशन येथे आणल्यावर त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले आणि हत्या झालेल्या महिलेचे दागिने विकून त्यांच्या अकाऊंटला जमा झालेले बावीस हजार रुपये जप्त केले, न्यायालयाने यातील दोन आरोपींना १ जुलैपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे.

Comments
Add Comment

Kalyan Crime : कल्याण हादरले! १७ व्या मजल्यावरून क्रेन कोसळली; तरुण मजुराचा जागीच मृत्यू, तर दुसरा मृत्यूशी देतोय झुंज

कल्याण : कल्याण शहरात एका गगनचुंबी इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी भीषण अपघात घडला आहे. येथील विकास

ई-चलन न भरल्यास उमेदवारी अर्ज होणार बाद!

वाहतूक शाखेकडे इच्छुक उमेदवाराने भरले तब्बल दीड लाखांचे ई-चलन ठाणे : पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास

ठाणे ‘सिव्हिल’ने तरुणीला दिले नवे आयुष्य

अपघातग्रस्त तरुणीवर जबड्याची जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी ठाणे : नेरळ परिसरात झालेल्या अपघातात गंभीर जखमी

वनविभागाच्या कारवाईमुळे कल्याणमधील ४०० कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर

आपत्कालीन सेवांचा मार्ग खुंटला कल्याण : मांडा–टिटवाळा पूर्वेकडील विद्यामंदिर शाळेजवळील रस्ता पुन्हा चर्चेचा

मुरबाडमधील शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा होण्यास सुरुवात

मुरबाड : मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघाने सन २०२४-२५ या हंगामासाठी ज्या शेतकऱ्यांची भातविक्रीसाठी ऑनलाईन

कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपमध्ये प्रवेश

उल्हासनगरात उबाठा सेनेला धक्का उल्हासनगर : उल्हासनगरमधील उबाठा गटाला मोठा राजकीय धक्का बसला असून कल्याण