पवई तलावातील सांडपाण्याचा प्रवेश मार्ग कायमचाच बंद

मुंबई : पवई तलावामध्ये येणारे सांडपाणी आदींवर अखेर बंद केले जाणार असून पवई तलावाच्या सुशोभीकरणाच्या शेवटच्या टप्प्यात आता बिना पावसाळी प्रवाहाचा अर्थात सांडपाण्याचा शोध घेवून त्याला अटकाव करणे आणि त्यातील पाणी दुसरीकडे वळवण्याचा कामाला सुरुवात केली जाणार आहे. यासाठी नव्याने मलनि:सारण वाहिनी टाकली जाणार असून या कामासाठी अखेर कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. यासाठी सुमारे ४६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.


महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार, महापालिका हद्दीतील नद्या तथा तलाव किंवा खाडी यामध्ये बिन पावसाळी प्रवाह तथा सांडपाणी आणि विना प्रक्रिया मलप्रवाह किंवा अर्धवट प्रक्रिया केलेले मलप्रवाह येवून नद्या तथा तलाव किंवा खाडीतील पाण्याचे प्रदुषण होत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना महापालिकेला करण्यास सांगितले होते. त्यानुसार एनजीटीने दिलेल्या आदेशांचे पालन करण्यासाठी पवई तलाव क्षेत्रातील मलनि:सारण वाहिन्यांबाबत निर्णय घेण्यात आला.


पवई तलावाच्या आसपासच्या परिसरात मलनि:सारण वाहिनीचे जाळे असलेल्या क्षेत्राचा व मलनि:सारण वाहिनीचे जाळे नसलेल्या क्षेत्रांचा वॉर्डनिहाय अणि एसटीपी कनेक्टीव्हीटी स्थिती असल्यास गटार नसलेल्या क्षेत्रासाठी मलनि:सारण जाळ्यांच्या स्थापनेसाठी कृती आराखडा बनवून उपचारासाठी एसटीपीशी त्याची जोडणी करून मलनि:सारण क्षेत्रातून सांडपाणी एसटीपीमध्ये वळवण्याचा निर्णय घेतला होता.


पवई तलावात १८ दशलक्ष लीटर सांडपाण्याचा प्रवाह येतो. त्यापैकी ८ दशलक्ष लीटर सांडपाणी हे सध्या बंद असलेल्या पवई उदंचन केंद्राच्या जागेवर प्रस्तावित आहे. ८ दशलक्ष लीटर सांडपाणी हे तेथील मलजल प्रक्रिया केंद्रात आणून त्यावर प्रक्रिया करुन ते पुन्हा तलावात टाकण्यात येईल.


तसेच, उर्वरित ८ दशलक्ष सांडपाणी हे आदि शंकराचार्य मार्गावरील अस्तित्वात असलेल्या मलनिस्सा:रण वाहिनीद्वारे भांडुप येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रात वळते करण्यात येणार आहे. उर्वरित २ दशलक्ष सांडपाणी हे पेरु बाग येथील उदंचन केंद्राकडे वळवून मलनिस्सारण वाहिनीद्वारे मिठी नदीवरील ९ दशलक्ष लीटर क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रात वळते करण्यात येणार आहे. यामुळे, पवई तलावात येणा-या सांडपाण्याच्या प्रवेशाला अटकाव करुन मलनि:सारण वाहिन्या वळवणे तसेच एकूण १३ इंटरसेप्ट गाळणी व द्वारांचे एकूण सहा वर्षांकरता देखभाल करणे आदी कामांसाठी स्वस्तिक कंस्ट्रक्शन कंपनी ही पात्र ठरली असून यासाठी विविध करांसह सुमारे ४६ कोटी रुपये खर्च
होणार आहे.

Comments
Add Comment

मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा

कृषी योजनांसाठी ८ महिन्यांत ३५ टक्के निधी खर्च; विधान परिषदेत दत्ता भरणे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत योजनांसाठी गेल्या आठ महिन्यांत एकूण ८०९८.४१ कोटी रुपयांची

बदलापूर प्रकरणाची विधान परिषदेत दखल; स्कूल बस नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश

मुंबई : बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या विनयभंग प्रकरणाचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असून, राज्य सरकारने

शेतकरी आणि मजुरांना बिबट्यांपासून मिळणार सुरक्षा; विधान परिषदेत सरकारचा मास्टर प्लॅन

मुंबई : राज्यात वाढलेला बिबट्यांचा वावर आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्याधुनिक

एआय तंत्रज्ञानाने रोखणार वाघ-बिबट्यांचे हल्ले; प्रवीण दरेकरांच्या सूचनेवर सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्रप्रकल्पात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI) सहाय्याने राबवण्यात आलेला

महाराष्ट्रात मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर होणार कारवाई - शिक्षण मंत्री दादाजी भुसे

सर्व माध्यमे, सर्व भाषिक आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये मराठी बंधनकारक मुंबई : "महाराष्ट्रातील सर्व