अलिबाग-वडखळ महामार्गावर खड्डेच खड्डे; लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

  44

अलिबाग : अतिवृष्टीमुळे अलिबाग-वडखळ या राष्ट्रीय महामार्गावर केलेली तात्पुरती मलमपट्टी उखडून गेल्याने या मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्याचा सर्वच वाहन चालकांना कमालीचा त्रास होण्याबरोबरच दुचाकीस्वारांचे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या मार्गाची तातडीने दुरुस्ती न झाल्यास स्थानिकांनी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.


अलिबाग-वडखळ राष्ट्रीय महामार्ग १६६-ए हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून, या मार्गावर मोठी विविध प्रकारच्या वाहनांची वर्दळ असते. मात्र हा मार्ग सर्व बाजुंनी दुर्लक्षित असून, या मार्गावर जागोजागी मोठे खड्डे पडले आहे. यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी होणारे अपघात गंभीर ठरत आहे.



दुचाकीस्वार विद्यार्थी, पालक, रुग्णवाहिका व गर्भवतींना याचा फटका बसत आहे. त्यामुळे स्थानिक चिंतेत आहेत. महामार्गाच्या या स्थितीच्या निषेधार्थ, वटपौर्णिमेदिवशी अलिबागच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील खड्ड्यांत काहींनी वटवृक्षाची रोपे लावली होती. त्यानंतरही संबंधित विभागाला जाग येत नसल्याचे पाहून अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी स्वखर्चाने काही भागांत पेव्हरब्लॉक बसविले. तरीही महामार्ग अधिकारी व जिल्हा प्रशासनास जाग येत नसल्याने प्रवाशांमध्ये संताप आहे. या मार्गावरून विविध खात्यांचे मंत्री, लोकप्रतिनिधी, तसेच जिल्हा प्रशासनाचे उच्च पदस्थ अधिकारी प्रवास करीत असतात. त्यांचेही याकडे दुर्लक्ष झाल्याने स्थानिक संताप व्यक्त करीत आहे. नेमेचि येतो पावसाळा. अन् खड्ड्यांचा आलाय कंटाला’अशी म्हणण्याची वेळ स्थानिकांवर आली आहे.


दरम्यान, नुकताच फेरफटका मारला असता, रिलायन्स पंप, तीनवीरा, पोयनाड नाका, धरमतर पूल, जेएसडब्लू कंपनीपासून ते अलिबागपर्यंत जागोजागी खड्डे पडल्याचे दिसून आले. या खड्ड्यांमधून वाहने हेलकावे खात जाताना दिसून येत होती. जेएसडब्ल्यू कंपनीपासून ते वडखळ दरम्यानच्या मार्गावर साचणारे पाणी जाण्यासाठी नालेच नसल्याने तेथील मार्ग नेहमीच पाण्याखाली असल्याचे दिसून आले. याकडेही कोणाचे लक्ष नसल्य़ाने या पाण्य़ातून एखादे वाहन वेगाने गेल्यास ते पाणी दुचाकीस्वारांच्या अंगावर उडत असल्याचेही दिसून आले. या मार्गावर काहीठिकाणी मोठ्या भेगा पडल्याने तेथे मार्ग खचायला सुरवात झाली आहे. त्यातून कोणत्याही क्षणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.


या अरुंद मार्गाच्या दुतर्फा वाढलेली झाडेझुडपे, संरक्षक कठड्यांची झालेली मोडतोड, पोयनाड नाका, पेझारी नाका, कार्लेखिंड येथे होणारी वाहतूक कोंडी, मार्गाच्या कडेला बसणारे फेरीवाले, अनधिकृत बांधकामे यांचाही त्रास या मार्गावरून येजा करणाऱ्या सर्वच प्रकारच्या वाहनांना होत असतो. त्यामुळे वाहतूक पोलिसाची गस्त महत्वाची असताना ते वाहतूक पोलिस कोठेच गस्त घालताना दिसत नाहीत.

Comments
Add Comment

Megablock: मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान आज मेगा ब्लॉक

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक

मरेपर्यंत अशा लोकांना समाजात मिळत नाही मान, होतो सतत अपमान

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी आपल्या 'चाणक्य नीती'मध्ये जीवनातील अनेक पैलूंबद्दल मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन

प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार मुंबई :

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल