Tata Hospital : भारतात टाटा रुग्णालयामध्ये प्रथमच एमआयबीजी पद्धतीचा वापर, न्यूरोब्लास्टोमा रुग्णाचा जीव वाचला...


मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून न्यूरोब्लास्टोमा (Neuroblastoma) कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होतं आहे. यापूर्वी अनेक रुग्णांना या आजारामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.  मुंबईतील प्रसिद्ध असलेले टाटा रुग्णालयात १७ वर्षाच्या मुलाला न्यूरोब्लास्टोमा कर्करोग (Neuroblastoma cancer) आजाराने ग्रासलेले होते. त्यामुळे टाटा रुग्णालयात गेले अनेक महिन्यांपासून रुग्ण उपचार घेत होता. त्यामुळे टाटा रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णाला एमआयबीजी इंजेक्शन देऊन मुलाचे प्राण वाचवून नवीन आयुष्य दिले. अशा प्रकारचे एमआयबीजी इंजेक्शनचा वापर करुन रुग्णांवर उपचार करण्याची हि पहिलीच घटना आहे.


न्यूरोब्लास्टोमा आजार असलेल्या रुग्णांवर केमोथेरपी, (Chemotherapy) शस्त्रक्रिया, ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण, रेडिओथेरपी, ॲण्टी जीडी २ इम्युनोथेरपी आणि डिफरेंशीएशन उपचार केले जातात.  अशा रुग्णांवर ॲण्टी जीडी २ इम्युनोथेरपीचा वापर करुन उपचार केले जातात. परंतू हि उपचार पद्धती खुपच खर्चीक असल्याने ती रुग्णांना परवडत नाही. त्यामुळे न्यूरोब्लास्टोमा कर्करेाग असलेल्या रुग्णांवर एमआयबीजी पद्धतीने उपचार केले जातात.


न्यूरोब्लास्टोमा आजार असलेल्या रुग्णांना एमआयबीजी इंजेक्शन (MIBG injection) दिल्यानंतर गॅमा किरण उत्सर्जित होतात. या रेडिएशनच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीवर त्याचा परिणाम देखील होतो. त्यामुळे योग्य काळजी घेणे आवश्यक असते. एमआयबीजी इंजेक्शन रुग्णाला दिल्यानंतर रुग्णांना विशेष विलगीकरण कक्षात ठेवले जाते.  भारतात एमआयबीजी इंजेक्शनचा वापर ३०० मिलीक्युरीज मध्ये वापरण्याची परवानगी आहे. परंतू इंजेक्शनाची उच्च मात्रात वापर करुन रुग्णांवर उपचार केले जातात, त्यामुळे रुग्णही बरे झाल्याचे आढळून आले आहेत.


भारतामध्येही न्यरोब्लास्टोमा रुग्णांना एमआयबीजी इंजेक्शनची उच्च मात्रा देण्याचा निर्णय टाटा रुग्णालयाने (Tata Hospital) घेतला. न्यूरोब्लास्टोमा झालेल्या १७ वर्षीय रुग्णाला ५ मे रोजी ४०० मिलिक्युरीज मात्रा असलेली दोन एमआयबीजीची इंजेक्शन देण्यात आली. त्यानंतर त्याला विशेष विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. त्यानंतर पाच दिवसांनी रुग्णाला रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. डॉक्टरांच्या अपेक्षेनुसार इंजेक्शन दिल्यानंतर २१ दिवसांनी त्याच्या शरीरातील स्टेम सेल्स कमी झाल्याने २४ व्या दिवशी त्याला ऑटोलॉगस हेमॅटोपोएटिक स्टेम सेल्स देण्यात आले. त्यानंतर मुलाच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यामुळे टाटा रुग्णालयाचे संचालक डॉक्टर सुदीप गुप्ता यांनी भारतामध्ये एमआयबीजी इंजेक्शनाची पद्धत यशस्वी झाली आहे. असे सांगितले



Comments
Add Comment

Skill Centre : राज्यात लवकरच १०० महात्मा ज्योतिराव फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू होणार

मुंबई : कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राज्यात युवक-युवतींसाठी महात्मा ज्योतिराव फुले

Minister Shivendrasinharaje Bhosale : सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची घरे होणार अधिक प्रशस्त

चटई क्षेत्रफळात वाढ; सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा निर्णय मुंबई : राज्यातील शासकीय

Mathadi Workers : कंबरतोड ओझ्यापासून माथाडी कामगारांची सुटका

बाजार समित्यांसाठी राज्य सरकारचे नवे नियम; ५० किलोची मर्यादा बंधनकारक मुंबई : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार

Maharashtra Weather : महाराष्ट्रात उष्णतेची लाट जोर धरणार; तर या राज्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळणार

मुंबई : हिवाळा संपला आणि उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. उन्हाचा पारा इतका चढलाय की उष्माघाताने लोक आपल्या जीवाला

Shyam Steel in Maharashtra : श्याम स्टील आणि जेडब्ल्यू ग्लोबल उद्योग समूहाची राज्यात गुंतवणूक

मुंबई : राज्यात गुंतवणूक येऊन त्याचे उद्योगात रूपांतर करण्यासाठी अनेक धोरणात्मक सुधारणा करण्यात आल्या आहेत.

Niyojan Bhavan : वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नियोजन भवन इमारतीचे भूमिपूजन

मुंबई : मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बांधण्यात येणाऱ्या नियोजन भवन इमारतीचा भूमिपूजन सोहळा