सासरचा मान घटस्फोटापर्यंत मिळणे हा प्रत्येक पत्नीचा अधिकार, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा

  46

मुंबई (प्रतिनिधी) : पत्नी जर सासरी ऐशारामात राहिली असली तरी तिला तशाच प्रकारचे राहणीमान सासर सोडल्यानंतर मिळायलाच हवं, यासाठी घटस्फोटावर निर्णय होईपर्यंत पतीने तिला देखभाल खर्च हा द्यायलाच हवा, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे.


एका प्रकरणात घटस्फोटाचा निकाल लागेपर्यंत पतीने पत्नीला दरमहा १५ हजार रुपये देखभाल खर्च म्हणून द्यावा, असे आदेश वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयाने दिले आहेत. त्या आदेशांविरोधात पतीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पत्नी ही स्वतः कमावती आहे, आपले उत्पन्न हे खर्चाच्या तुलनेत फारच कमी आहे. तसेच आईवडील आपल्यावर निर्भर आहेत. या गोष्टींचा विचार करता कुटुंब न्यायालयाचे आदेश रद्द करावेत, अशी मागणी पतीने याचिकेद्वारे हायकोर्टाकडे केली होती.


याप्रकरणी पतीने कोर्टापुढे दावा केला होता की, आपले वेतन ५७हजार रुपये आहे. तर महिन्याचा खर्च हा ५३ हजार रुपये आहे. यातच आईवडिलांचीही देखभाल करावी लागेल. मात्र प्रत्यक्षात पतीचे वेतन दरमहा एक लाख रुपये असल्याचं पत्नीने पुराव्यांसह न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्याकरिता पतीची पेमेंट स्लिपही पत्नीच्या वतीने न्यायालयात सादर केली गेली. तर पत्नी ही एका खासगी शाळेत शिक्षिका आहे. तिला निव्वळ १९ हजार रुपये वेतन आहे. एवढ्या कमी पैशात आपण दैनंदिन खर्चही भागवू शकत नाही. त्यामुळे आपल्याला पतीकडून देखभाल खर्च मिळायलाच हवा, असा दावा तिने कोर्टापुढे केला होता.


पतीने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या एकलपीठासमोर नुकतीच सुनावणी झाली. ज्यात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हायकोर्टाने पतीची याचिका फेटाळून लावली. पत्नी जरी कमावती असली तरी तिला देखभाल खर्च हा द्यावाच लागेल. तिचे राहणीमान जसे सासरी होते, तशाच प्रकारे तिला पुढील आयुष्यदेखील जगता आले पाहिजे. जी पतीची जबाबदारी असून त्याकरिता पतीने पत्नीला घटस्फोटाचा निकाल लागेपर्यंत दरमहा देखभाल खर्च द्यायलाच हवा, असे हायकोर्टाने आपल्या निकालात नमूद केले आहे.

Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही