सासरचा मान घटस्फोटापर्यंत मिळणे हा प्रत्येक पत्नीचा अधिकार, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा

मुंबई (प्रतिनिधी) : पत्नी जर सासरी ऐशारामात राहिली असली तरी तिला तशाच प्रकारचे राहणीमान सासर सोडल्यानंतर मिळायलाच हवं, यासाठी घटस्फोटावर निर्णय होईपर्यंत पतीने तिला देखभाल खर्च हा द्यायलाच हवा, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे.


एका प्रकरणात घटस्फोटाचा निकाल लागेपर्यंत पतीने पत्नीला दरमहा १५ हजार रुपये देखभाल खर्च म्हणून द्यावा, असे आदेश वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयाने दिले आहेत. त्या आदेशांविरोधात पतीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पत्नी ही स्वतः कमावती आहे, आपले उत्पन्न हे खर्चाच्या तुलनेत फारच कमी आहे. तसेच आईवडील आपल्यावर निर्भर आहेत. या गोष्टींचा विचार करता कुटुंब न्यायालयाचे आदेश रद्द करावेत, अशी मागणी पतीने याचिकेद्वारे हायकोर्टाकडे केली होती.


याप्रकरणी पतीने कोर्टापुढे दावा केला होता की, आपले वेतन ५७हजार रुपये आहे. तर महिन्याचा खर्च हा ५३ हजार रुपये आहे. यातच आईवडिलांचीही देखभाल करावी लागेल. मात्र प्रत्यक्षात पतीचे वेतन दरमहा एक लाख रुपये असल्याचं पत्नीने पुराव्यांसह न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्याकरिता पतीची पेमेंट स्लिपही पत्नीच्या वतीने न्यायालयात सादर केली गेली. तर पत्नी ही एका खासगी शाळेत शिक्षिका आहे. तिला निव्वळ १९ हजार रुपये वेतन आहे. एवढ्या कमी पैशात आपण दैनंदिन खर्चही भागवू शकत नाही. त्यामुळे आपल्याला पतीकडून देखभाल खर्च मिळायलाच हवा, असा दावा तिने कोर्टापुढे केला होता.


पतीने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या एकलपीठासमोर नुकतीच सुनावणी झाली. ज्यात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हायकोर्टाने पतीची याचिका फेटाळून लावली. पत्नी जरी कमावती असली तरी तिला देखभाल खर्च हा द्यावाच लागेल. तिचे राहणीमान जसे सासरी होते, तशाच प्रकारे तिला पुढील आयुष्यदेखील जगता आले पाहिजे. जी पतीची जबाबदारी असून त्याकरिता पतीने पत्नीला घटस्फोटाचा निकाल लागेपर्यंत दरमहा देखभाल खर्च द्यायलाच हवा, असे हायकोर्टाने आपल्या निकालात नमूद केले आहे.

Comments
Add Comment

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे

शब्दापलीकडे कृती’ची महायुतीकडून वचनपूर्ती युवकांना रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध : राणे म्हणाले की, राज्यातील