हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटीमुळे पाच जणांचा मृत्यू

कुल्लू : हिमाचल प्रदेशमधील कुल्लू आणि कांगडा जिल्ह्यांसह काही भागांमध्ये ढगफुटी, मुसळधार पाऊस आणि पूर यामुळे प्रचंड नुकसान झाले. आतापर्यंत या संकटामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच पाच जण बेपत्ता आहेत. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. हवामान विभागाकडून हिमाचल प्रदेशला रविवार २९ जून साठीही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

उना, बिलासपूर, सोलन, शिमला, सिरमौर, कांगडा, चंबा, कुल्लू आणि मंडी या हिमाचलमधील जिल्ह्यांमध्ये दोन - तीन दिवस मुसळधार पावसाची तसेच जमीन खचण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. महत्त्वाचे काम नसल्यास मुसळधार पाऊस पडत असताना घराबाहेर पडणे टाळा, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.



हिमाचल प्रदेशमधील तीन ठिकाणी ढगफुटी झाली आहे आणि नऊ ठिकाणी पूर आला आहे. या अचानक आलेल्या संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे, असे मुख्यमंत्री सुखविंदर सुखू म्हणाले म्हणाले.

आतापर्यंत २५० लोकांना वाचवण्यात आले आहे. ज्या पाच जणांचा मृत्यू झाला आहे, त्यातील चार जणांची ओळख पटली असल्याचे पोलिसांनी सांगितले. जंगलातून एकाला वाचवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. अचानक आलेल्या संकटामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.
Comments
Add Comment

केरळच्या पर्यटकांवर अरुणाचलमध्ये काळाचा घाला; गोठलेल्या तलावात पडून एकाचा मृत्यू दुसऱ्याचा शोध सुरु

अरुणाचल प्रदेश : थंड हवेचा अनुभव घेण्यासाठी अरुणाचल प्रदेशात आलेल्या केरळमधील पर्यटकांच्या सहलीला दुर्दैवी

Hapur News : लग्न समारंभात राडा! हापूरमध्ये माशांच्या स्टॉलवर पाहुण्यांनी टाकला 'दरोडा, व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

हापूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) हापूर जिल्ह्यात एका विवाह सोहळ्यात आनंदाच्या वातावरणाऐवजी धक्कादायक आणि

Virat Ramayana Temple : जगातील सर्वात मोठ्या शिवलिंगाची आज स्थापना! २१० टन वजन, ३३ फूट उंची; बिहारमधील 'विराट रामायण मंदिर' ठरणार आकर्षणाचे केंद्र

मोतिहारी : बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यातील मोतिहारी येथे आज एक सुवर्णक्षण अनुभवायला मिळणार आहे. येथील विराट

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी