Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत लाखोंच्या संख्येने वारकरी सहभागी होऊन विठ्ठल माउलींच्या नामाचा गजर करत त्यांच्या भक्तीत लीन होताना दिसतात. वर्षातून एकदा येणारी ही आषाढी वारी यावर्षी ६ जुलै रोजी आली आहे. त्यामुळे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागू लागल्या आहे. त्या दृष्टीने विठ्ठल मंदिर समितीचे नियोजन देखील झाले आहे. विठ्ठल भक्तांना आणि वारकऱ्यांना  चांगले दर्शन घेता यावे यासाठी मंदिर आता २४ तास सुरु ठेवण्यात येणार आहे.


अवघ्या दहा दिवसांवर आलेल्या आषाढी एकादशी निमित्त, वारकऱ्यांची आणि भाविकांची पंढरपूर मंदिरात होणारी मोठी गर्दी लक्षात घेता, श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे २४ तास मुखदर्शन, तर २२.१५ तास पदस्पर्श दर्शन आजपासून (दि.२७) सुरू करण्यात येणार असल्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.



श्रींचा पलंग काढला


आषाढी एकादशीला भाविकांची मंदिरात होणारी गर्दी लक्षात घेता, त्यांना सुलभ व जलद दर्शन मिळावे, म्हणून यात्रा कालावधीत चांगला मुहुर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना २४ तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते. त्यानुसार आज (दि.२७) चांगला दिवस असल्याने विधिवत पूजा करून श्रींचा पलंग काढण्यात आला आहे. विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीशी लोड; तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी तक्क्या देण्यात आला आहे. त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे २४ तास मुखदर्शन, तर २२.१५ तास पदस्पर्श दर्शन सुरू राहणार असल्याचे औसेकर यांनी सांगितले.


श्रींचा पलंग काढल्याने काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती आदी राजोपचार बंद होवून नित्यपुजा, महानैवेद्य व गंधाक्षता हे राजोपचार सुरू राहतील. दिनांक १६ जुलै (प्रक्षाळपुजा) पर्यंत २४ तास दर्शन उपलब्ध असणार आहे. श्रींचा पलंग काढताना पुजेवेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य शकुंतलाताई नडगिरे, ॲड माधवीताई निगडे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, विभाग प्रमुख संजय कोकीळ, अतुल बक्षी व पौरोहित्य करणारे कर्मचारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Gadchiroli Crime : संतापजनक घटना! चामोर्शीत ७ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; काही तासांतच आरोपीच्या मुसक्या आवळल्या

गडचिरोली : गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील चामोर्शी येथून एक अत्यंत संतापजनक बातमी समोर आली आहे. घरात पेंटिंगचे काम

Jaigad Port : रत्नागिरीतील जयगड बंदर पश्चिम महाराष्ट्राशी जोडणार

 कृषी, औद्योगिक आणि व्यापारी केंद्रांना जोडणी; स्वतंत्र द्रुतगती महामार्ग बांधणार मुंबई : कोकण किनारपट्टीवरील

छत्रपती संभाजीनगरमध्ये अन्न अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला, राज्यभर तीव्र निषेध

Chhatrapati Sambhajinagar : बंदी असलेल्या गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूच्या वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अन्न व

Sejal Pawar Controversy Video: प्रणीत मोरेच्या शोमधील महिला डॉक्टरच्या वक्तव्यावरून वाद; मृतदेहांबद्दलचे ते विधान अंगलट; सोशल मीडियावर संताप

मुंबई: 'बिग बॉस' फेम स्टँड-अप कॉमेडियन प्रणीत मोरेच्या (Pranit More) शोमधील एका व्हायरल व्हिडिओमुळे (Viral Video) आता नवा वाद

Water Storage Maharashtra : राज्यात फक्त २५ टक्के पाणीसाठा शिल्लक

पाऊस आठवडाभर लांबणार; धरणांमध्ये १० हजार ४२१.९० दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा मुंबई : मान्सूनने राज्यातील काही

पुणे यार्डात विशेष ब्लॉक; जळगाव-भुसावळमार्गे धावणाऱ्या ‘या’ गाड्या रद्द

trains cancelled : मध्य रेल्वे प्रशासनाकडून (Central Railway Administration) पुणे यार्डात पायाभूत सुविधांच्या उन्नतीकरणासह सिग्नलिंग