पंचवटीसह द्वारका परिसरात सलग पाचव्या दिवशी पाणीटंचाई

नागरिक त्रस्त : निलगिरी बाग केंद्रावर तांत्रिक बिघाड जैसे थे


नाशिक : निलगिरी बाग जलशुद्धीकरण केंद्राला जोडणाऱ्या जलवाहिनीत चाचणीनंतर हवेचा दाब निर्माण झाला. त्यामुळे ५० दशलक्ष लिटर्स क्षमतेचे हे केंद्र पूर्ण क्षमतेने चालले नाही. अवघे २५ दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा झाल्याने पंचवटीसह पूर्व विभागातील काठे गल्ली व परिसरात पाणीपुरवठा पाचव्या दिवशी विस्कळीत झाला आहे.


स्मार्ट सिटी कंपनीमार्फत गेल्या शनिवारी हाती घेण्यात आलेल्या जुने गंगापूर पंपिंग स्टेशन येथील जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण न झाल्याने पाणी टंचाई कायम आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम मंगळवारी (दि. २४) पहाटे पूर्ण होत असतानाच निलगिरी बाग जलशुद्धीकरण केंद्रावरील जलवाहिनीत हवेचा दाब निर्माण झाल्याने पंचवटीसह पूर्व विभागातील काठे गल्ली भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. जलशुद्धीकरण केंद्रे तसेच जलवाहिन्यांच्या दुरुस्तीच्या कामांसाठी महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग व स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने शनिवारी (दि.२१) शटडाउन घेण्यात आला होता. बारा बंगला ते निलगिरी बाग जलशुद्धीकरण केंद्राला जोडणारी ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी जुन्या गंगापूर पंपिंग स्टेशन येथे लिकेज झाल्याने दुरुस्ती करण्यात आली. मात्र, काही तासांतच पुन्हा त्याच ठिकाणी ही जलवाहिनी लिकेज झाली. त्यामुळे शनिवार, रविवारपाठोपाठ सोमवारीदेखील सिडको व इंदिरानगरचा काही भाग वगळता उर्वरित शहरात पाणीपुरवठा होऊ शकला नव्हता. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम मंगळवारी (दि. २४) पहाटेपर्यंत सुरू होते. परंतु, जलकुंभ भरण्यास विलंब झाल्याने सकाळचा पाणीपुरवठा सलग चौथ्या दिवशी बंदच राहिला. अनेक भागांत पाणी न आल्याने टँकरची मागणी नोंदविली गेली. विशेष करून, गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रावरून होणारा पाणीपुरवठा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाला. तीन तास उशिराने पाणी सोडण्यात आले.


जुने नाशिक भागात पाण्याची सर्वाधिक बोंब झाली. सिडको, इंदिरानगर भागात विल्होळी जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा करण्यात आला.



नागरिकांना पाणीपुरवठ्याबाबत झालेल्या त्रासाबद्दल महापालिकेतर्फे दिलगिरी व्यक्त करण्यात येत आहे. लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल.
- रवींद्र धारणकर, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग
Comments
Add Comment

Maharashtra Heavy Rain : राज्यात पावसाचा कहर! १७ NDRF आणि 6 SDRF पथके तैनात; लोणावळ्यात तब्बल ६७० मिमी पावसाची नोंद

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीस ८ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात

इंद्रायणीच्या पुरामुळे आळंदीत वारकऱ्यांची गैरसोय; मुंबई डबेवाले करणार भोजन व निवासाची व्यवस्था

Mumbai  : खेड, मावळ, पिंपरी-चिंचवड आणि लोणावळा परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे

Heavy Rain in Mumbai Pune : पावसाचा कहर! मुंबई-ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट तर पुण्यात १२ जुलैपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी उद्या

Flood in Indrayani : इंद्रायणीला पूर; वारकऱ्यांसाठी सरकारचे महत्त्वाचे आवाहन! आळंदीत न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त आळंदीकडे निघालेल्या वारकरी आणि भाविकांसाठी राज्य

TET Exam Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! चारही आरोपींना १८ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

भिवंडी : राज्यभरात गाजत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात मोठी घडामोड झाली