Uttarakhand: रुद्रप्रयागमध्ये अलकनंदा नदीत कोसळली बस, बद्रीनाथ हायवेवर मोठा अपघात

  35

डेहराडून: उत्तराखंडमध्ये रुद्रप्रयाग-बद्रीनाथ हायवेवर घोलतीर जवळ भीषण रस्ते अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार एक बस अलकनंदा नदीत कोसळली यामुळे भीषण अपघात झाला आहे. घटनास्थळी बचावक कार्यासाठी रेस्क्यू टीम रवाना झाली आहे.





बसचा अपघात नेमका कसा झाला?


मिळालेल्या माहितीनुसार, १८ प्रवाशांना घेऊन जाणारी बस ब्रदीनाथला चालली होती. त्यावेळी चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं. ही बस नदीत कोसळली. स्थानिकांना ही बाब कळल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना कळवली. पोलीस आणि एसडीआरएफचं पथक या ठिकाणी आलं. UK ०८, PA ७४४४ या बसचा अपघात झाला आहे. या बसमध्ये चालकाहह एकूण २० जण बसलेले होते. या बसमध्ये उदयपूर (राजस्थान) आणि गुजरात येथील सोनी परिवार चारधाम यात्रेसाठी आला होता. याच बसचा अपघात झाला आहे.




एकाचा मृत्यू तर ७ जखमी 


एका व्यक्तीचा या घटनेत मृत्यू झाला आहे. विभागीय आयुक्त विनय शंकर पांडे यांनी माहिती दिली आहे की या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सात जण जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. इतर बेपत्ता प्रवाशांचा शोध पोलीस आणि एसडीआरएफकडून घेतला जातो आहे.


Comments
Add Comment

Bangluru News : बंगळूरूत रील बनवता बनवता तोल गेला अन्... थेट १३व्या मजल्यावरून खाली

२० वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू बंगळूरू : बंगळुरूमध्ये रील बनवताना एका २० वर्षीय तरुणीचा बांधकाम सुरू असलेल्या

Amitabh Bachchhan : सावधान! 'सायबर ठगी से बचें'...आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही

सरकारकडून सायबर फसवणुकीची कॉलर ट्यून झाली बंद... नवी दिल्ली : बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांचा दमदार आवाज

नववी नापास रिंकू सिंह झाला शिक्षण अधिकारी

लखनऊ : कोलकाता नाईट रायडर्स संघाने २०२५ च्या लिलावात तीन कोटी रुपये मोजून ज्या रिंकू सिंहला आपल्यासोबतच

CBSE 10th Board Exam New Rules : CBSC विद्यार्थ्यांना आधार! सीबीएसई दहावीची परीक्षा २०२६ पासून दोनवेळा घेणार; नव्या नियमांना मंजुरी

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डानं दहावीच्या परीक्षेसंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. CBSEच्या

Himachal Pradesh: हिमाचलमध्ये ढगफुटी झाल्याने हाहाकार! अचानक आलेल्या पुराने २ जणांचा मृत्यू, २० जण गेले वाहून

मंडी: हिमाचल प्रदेशात बुधवारी ढगफुटी झाल्याने अचानक पूर आला आणि मुसळधार पावसामुळे २ जणांचा मृत्यू झाला. तर २० जण

CBSE दहावीच्या बोर्ड परीक्षा आता वर्षातून दोनदा होणार

नवी दिल्ली : सीबीएसई दहावीच्या बोर्डाची परीक्षा २०२६ पासून आता वर्षातून दोनदा घेण्यात येणार आहे. केंद्रीय