‘खारघरला दारूमुक्त शहर घोषित करा’

पनवेल  : खारघर येथील सेक्टर ६ मध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या गोल्डन कॉईन वाईन मार्ट या वाईन शॉप विरोधात खारघरमधील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, या वाईन शॉप विरोधात आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांना निवेदन सादर केले.


निवेदन देताना आमदार ठाकूर यांच्यासोबत भाजपचे खारघर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, डॉ. वैभव बदाणे, त्रिवेणी सालकर, किर्ती मेहरा, संतोषी चौहान, जुमा चक्रवती, कॅ. कलावत, तुकाराम कंठाले, संदीप पाटील, मोहन म्हात्रे, शैलेंद्र त्रिपाठी आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, खारघरमध्ये नागरिकांनी सुरुवातीपासून दारू दुकाने व बारला कायम विरोध दर्शविला आहे. दारूबंदी संदर्भात अनेक आंदोलने, निदर्शने या आधीही झाली असून, 'संघर्ष संस्था, खारघर' या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून खारघरला दारूमुक्त शहर घोषित करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.


विशेष म्हणजे, संबंधित वाईन शॉपसाठी स्थानिक सोसायटी किंवा पनवेल महानगरपालिकेची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता व्यवसाय सुरू केल्याचे नागरिकांच्या म्हणण्यातून निदर्शनास आले. त्यामुळे या वाईन शॉपला जर परवानगी दिली गेली असेल, तर ती त्वरित रद्द करण्यात यावी,अशी जोरदार मागणी करण्यात आली.


खारघर परिसरातील शिक्षणप्रधान वातावरण लक्षात घेता, दारू दुकाने बार येथील सामाजिक रचनेला बाधा पोहोचवू शकतात, त्यामुळे एज्युकेशन हब म्हणूनच खारघर शहराची ओळख कायम रहावी, यासाठी सर्व खारघर वासियांचा आणि लोकप्रतिनिधी म्हणून आमचा दारुबंदीला पाठिंबा, असेही अधोरेखित करण्यात आले.

Comments
Add Comment

Eknath Shinde : रायगड किल्ल्यावरून परतताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातग्रस्त बाईक स्वाराला दिला मदतीचा हात

विचारपूस करत ताफ्यातील रुग्णवाहिकेतून नजीकच्या रुग्णालयात केले दाखल रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५३

Eknath Shinde: रायगड किल्ल्यावरील पाण्याचे दुर्भिक्ष दूर करणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही; शिवछत्रपतींचा ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा मुंबई :

Dam Water Levels : रायगड जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा अलिबाग : रायगड जिल्ह्यात मागील

RTI : माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्र शासनाचे नवे नियम लागू

रायगड : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारांसाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल लागू केले

Nitesh Rane : रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांच्या समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करा

मुंबई,  : रायगड जिल्ह्यातील आरसीएफ कंपनीच्या मरीन आउटफॉल लाईनमुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक

Ashish Shelar : रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी समन्वित कृती आराखडा तयार करून कामांना गती द्या

मुंबई,: रायगड किल्ल्याच्या संवर्धन व विकासासाठी राज्य शासनाकडून निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही.