‘खारघरला दारूमुक्त शहर घोषित करा’

पनवेल  : खारघर येथील सेक्टर ६ मध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या गोल्डन कॉईन वाईन मार्ट या वाईन शॉप विरोधात खारघरमधील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, या वाईन शॉप विरोधात आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांना निवेदन सादर केले.


निवेदन देताना आमदार ठाकूर यांच्यासोबत भाजपचे खारघर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, डॉ. वैभव बदाणे, त्रिवेणी सालकर, किर्ती मेहरा, संतोषी चौहान, जुमा चक्रवती, कॅ. कलावत, तुकाराम कंठाले, संदीप पाटील, मोहन म्हात्रे, शैलेंद्र त्रिपाठी आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, खारघरमध्ये नागरिकांनी सुरुवातीपासून दारू दुकाने व बारला कायम विरोध दर्शविला आहे. दारूबंदी संदर्भात अनेक आंदोलने, निदर्शने या आधीही झाली असून, 'संघर्ष संस्था, खारघर' या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून खारघरला दारूमुक्त शहर घोषित करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.


विशेष म्हणजे, संबंधित वाईन शॉपसाठी स्थानिक सोसायटी किंवा पनवेल महानगरपालिकेची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता व्यवसाय सुरू केल्याचे नागरिकांच्या म्हणण्यातून निदर्शनास आले. त्यामुळे या वाईन शॉपला जर परवानगी दिली गेली असेल, तर ती त्वरित रद्द करण्यात यावी,अशी जोरदार मागणी करण्यात आली.


खारघर परिसरातील शिक्षणप्रधान वातावरण लक्षात घेता, दारू दुकाने बार येथील सामाजिक रचनेला बाधा पोहोचवू शकतात, त्यामुळे एज्युकेशन हब म्हणूनच खारघर शहराची ओळख कायम रहावी, यासाठी सर्व खारघर वासियांचा आणि लोकप्रतिनिधी म्हणून आमचा दारुबंदीला पाठिंबा, असेही अधोरेखित करण्यात आले.

Comments
Add Comment

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून,

मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग