ठाण्यात बॅनरबाजीचा झगमगाट

माजी नगरसेवकांच्या प्रचारातून निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नाराजी


ठाणे : गेल्या साडेतीन वर्षांपासून ठाणे महापालिकेमध्ये कोणताही अधिकृत नगरसेवक नसतानाही महापालिका प्रशासनाचा कारभार सुरळीतपणे सुरू आहे. मात्र निवडणुका न झालेल्या काळात देखील अनेक माजी नगरसेवक आणि राजकीय पदाधिकारी ‘आमच्याच प्रयत्नातून काम’ झाल्याचा दावा करत ठिकठिकाणी बॅनर लावून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे शहरात बॅनरबाजीचा अक्षरशः सुळसुळाट झाला आहे.


माजी नगरसेवकांनी लावलेल्या या बॅनर्सवर सार्वजनिक कामांचे श्रेय स्वतःकडे वळवण्याचा स्पष्ट प्रयत्न दिसून येतो. ‘पाणी योजना पूर्ण – आमच्या प्रयत्नातून’, ‘रस्ता काँक्रीटीकरण – आमच्या पाठपुराव्याचा परिणाम’, अशा आशयाचे बॅनर्स नागरिकांच्या नजरेस पडत आहेत. विशेष म्हणजे, या बॅनर्समध्ये महापालिका प्रशासनाचा उल्लेखही नसतो, जणू सर्व निर्णय हे त्यांच्या 'सांगण्यावरूनच' झाले आहेत, असा त्याचा आभास निर्माण केला जातो.


मात्र या बॅनरबाजीमुळे संबंधित पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते मात्र दुखावले जात आहेत. ‘नगरसेवक नसतानाही केवळ पुढील निवडणुकीत उमेदवारी हवी म्हणून प्रसिद्धीच्या हव्यासापोटी या प्रकारे एकहाती श्रेय लाटले जात आहे", अशी नाराजी काही कार्यकर्त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली.


ठाणे शहरात कळवा, मुंब्रा, कोपरीपासून ते वागळे इस्टेट आणि घोडबंदर परिसरात अशा प्रकारच्या बॅनर्सचा सुकाळ झाला आहे. महापालिका निवडणुका जवळ येत असल्याने राजकीय इच्छुक मंडळी ‘सक्रिय असल्याचे’ दाखवण्यासाठी नागरी कामांचे श्रेय घेताना दिसत आहेत. मात्र प्रत्यक्षात प्रशासक आणि अधिकारी यांच्या माध्यमातूनच सर्व योजना राबवल्या जात आहेत.


महापालिकेतील सत्ताविरहित कालावधीत नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने अनेक निर्णय घेतले आहेत.

Comments
Add Comment

‘आपला दवाखान्या’चा वापर अन्य ‘उद्योगां’साठी

पगार थकला; आमदार संजय केळकर यांच्याकडे तक्रारी ठाणे  : ठाणे शहरात ४० ठिकाणी सुरू करण्यात आलेला 'आपला दवाखाना' हा

सोन्याचा हार कचऱ्यात गेला; कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शोधाशोध झाली आणि अखेर...

कल्याण : सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत असून सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. अशा काळात सोनं जपून ठेवणं

दोन वर्षीय चिमुकलीवर गुन्हा दाखल; पोलिसांवर प्रश्नचिन्ह

कल्याण : कल्याणनजीक असलेल्या मोहने येथे फटाके फोडण्याच्या वादातून काल दोन गटात झालेल्या राड्याप्रकरणी एका दोन

कल्याण ते नवी मुंबई मेट्रो प्रवास ४५ मिनिटांत होणार!

मुंबई : मुंबईसह सर्व उपनगरात मेट्रोचे जाळे पसरले आहे. काही प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे तर काही मेट्रो प्रकल्प

Mira Road News : मुंबईजवळच्या मीरा रोडमध्ये पुन्हा हिंसाचार! 'पार्किंग'च्या किरकोळ वादातून ३० वाहनांची तोडफोड; परिसरात तणाव

मीरा रोड : मुंबईला लागून असलेल्या मीरा रोड (Mira Road) परिसरात पुन्हा एकदा एका किरकोळ वादावरून परिस्थिती चिघळल्याची

काशिमीरा परिसरात मोठा राडा, २५ रिक्षांचे नुकसान, मुलींची छेडछाड; मंत्री प्रताप सरनाईकांनी व्यक्त केली बांगलादेशींच्या सहभागाची शंका

ठाणे : राज्यभरात दिवाळीचा जल्लोष सुरू असताना ठाणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मीरा रोडजवळील