ठाण्यात बॅनरबाजीचा झगमगाट

माजी नगरसेवकांच्या प्रचारातून निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नाराजी


ठाणे : गेल्या साडेतीन वर्षांपासून ठाणे महापालिकेमध्ये कोणताही अधिकृत नगरसेवक नसतानाही महापालिका प्रशासनाचा कारभार सुरळीतपणे सुरू आहे. मात्र निवडणुका न झालेल्या काळात देखील अनेक माजी नगरसेवक आणि राजकीय पदाधिकारी ‘आमच्याच प्रयत्नातून काम’ झाल्याचा दावा करत ठिकठिकाणी बॅनर लावून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे शहरात बॅनरबाजीचा अक्षरशः सुळसुळाट झाला आहे.


माजी नगरसेवकांनी लावलेल्या या बॅनर्सवर सार्वजनिक कामांचे श्रेय स्वतःकडे वळवण्याचा स्पष्ट प्रयत्न दिसून येतो. ‘पाणी योजना पूर्ण – आमच्या प्रयत्नातून’, ‘रस्ता काँक्रीटीकरण – आमच्या पाठपुराव्याचा परिणाम’, अशा आशयाचे बॅनर्स नागरिकांच्या नजरेस पडत आहेत. विशेष म्हणजे, या बॅनर्समध्ये महापालिका प्रशासनाचा उल्लेखही नसतो, जणू सर्व निर्णय हे त्यांच्या 'सांगण्यावरूनच' झाले आहेत, असा त्याचा आभास निर्माण केला जातो.


मात्र या बॅनरबाजीमुळे संबंधित पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते मात्र दुखावले जात आहेत. ‘नगरसेवक नसतानाही केवळ पुढील निवडणुकीत उमेदवारी हवी म्हणून प्रसिद्धीच्या हव्यासापोटी या प्रकारे एकहाती श्रेय लाटले जात आहे", अशी नाराजी काही कार्यकर्त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली.


ठाणे शहरात कळवा, मुंब्रा, कोपरीपासून ते वागळे इस्टेट आणि घोडबंदर परिसरात अशा प्रकारच्या बॅनर्सचा सुकाळ झाला आहे. महापालिका निवडणुका जवळ येत असल्याने राजकीय इच्छुक मंडळी ‘सक्रिय असल्याचे’ दाखवण्यासाठी नागरी कामांचे श्रेय घेताना दिसत आहेत. मात्र प्रत्यक्षात प्रशासक आणि अधिकारी यांच्या माध्यमातूनच सर्व योजना राबवल्या जात आहेत.


महापालिकेतील सत्ताविरहित कालावधीत नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने अनेक निर्णय घेतले आहेत.

Comments
Add Comment

भिवंडीत श्वानदंश झालेल्या मुलाचा मृत्यू

भिवंडी : श्वानदंश झालेल्या १२ वर्षीय हमीद खान याचा उपचारादरम्यान मृत्यूची घटना भिवंडीत घडली आहे. १० जानेवारीला

ठाण्यातील भव्य त्रिमंदिर भाविकांसाठी खुले; तीन दिवसांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनास सुरुवात

ठाणे : ठाणे शहरात उभारण्यात आलेले भव्य त्रिमंदिर अखेर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या

ठाणे-घोडबंदर रोडचे रुंदीकरण होणार?

मीरा-भाईंदर (वार्ताहर): ठाणे-घोडबंदर रस्ता ६० मीटर रुंद करण्यासाठी आवश्यक असणारी भूसंपादनाची प्रक्रिया

कोयना प्रकल्पग्रस्त सुविधांपासून वंचित

ठाणे ( प्रतिनिधी): साडेसहा दशकांपूर्वी सातारा जिल्ह्यातील कोयना धरण प्रकल्पात बाधित झालेल्या सुमारे ८०हून अधिक

ठाणे शहरात उभारणार १९ ई-वाहन चार्जिंग स्टेशन्स

ठाणे (प्रतिनिधी) : महापालिका क्षेत्रातील इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शहरात ई-वाहन वापराला

सायबर दृष्टी सेलचा डिजिटल साक्षरता प्रवास

कल्याण (प्रतिनिधी) : बी. के. बिर्ला नाईट कॉलेज, कल्याण येथील सायबर दृष्टी सेल यांच्या विद्यमाने नागरिकांमध्ये