Amitabh Bachchhan : सावधान! 'सायबर ठगी से बचें'...आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही

सरकारकडून सायबर फसवणुकीची कॉलर ट्यून झाली बंद...


नवी दिल्ली : बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांचा दमदार आवाज सर्वांना आवडतो. पण,गेल्या काही काळापासून जेव्हा जेव्हा आपण एखाद्याला फोन करायचो तेव्हा अमिताभ बच्चन यांच्या गंभीर आणि दमदार आवाजात एक सूचना ऐकू येत होती. "सायबर फसवणुकीपासून सावध रहा...". आता हा आवाज तुम्हाला त्रास देणार नाही. कारण सरकारने ही जागरूकता मोहीम थांबवली आहे. कोविड काळात सुरू झालेला हा ऑडिओ संदेश भारत सरकारच्या दूरसंचार मंत्रालयाचा एक उपक्रम होता. यामध्ये अमिताभ बच्चन यांच्या आवाजात नागरिकांना कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नका, त्यांचा ओटीपी शेअर करू नका आणि कोणत्याही कॉलवर बँकिंग तपशील देऊ नका असे सांगण्यात आले होते.

'सरकार को बोलो भाई, उन्होंने हमसे कहा सो किया'


सरकारचे हे पाऊल देशातील वाढत्या सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी होते जे अमिताभ बच्चन यांच्या लोकप्रियतेशी जोडलेले होते. या संदेशाचा उद्देश लोकांना जागरूक करणे हा असला तरी, सोशल मीडियावर अनेकांनी त्यावर नाराजी व्यक्त केली होती. विशेषतः जेव्हा हा संदेश आपत्कालीन कॉलच्या मध्यभागी येत असे, तेव्हा लोक अस्वस्थ व्हायचे. अशा परिस्थितीत, स्वतः अमिताभ बच्चन यांनाही ट्रोलिंगचा सामना करावा लागला. एका ट्रोलरला उत्तर देताना अमिताभ बच्चन म्हणाले होते की, 'सरकार को बोलो भाई, उन्होंने हमसे कहा सो किया' परंतु ही कॉलर ट्यून सरकारच्या विनंतीवरून होती आणि ती बंद करण्याचा निर्णय सुद्धा सरकारी पातळीवर घेतला गेला आहे, ट्रोलर्समुळे नाही.


जबरदस्त चित्रपट


अमिताभ हे काळाबरोबर चालणारे अभिनेते आहे. आज सोशल मीडियाचं युग आहे आणि मेगास्टार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप सक्रिय आहे. अनेक वेळा ते त्याच्या चाहत्यांच्या कमेंट्सनाही उत्तर देतात, जसे त्यांनी आत्ताच दिलं आहेत. दरम्यान अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, बिग बी शेवटी 'कल्की २८९८ एडी' आणि 'वेट्टैयान'मध्ये दिसले आहे. आता पुढं ते 'सेक्शन ८४' या आगामी चित्रपटांमध्ये दिसणार आहे, याशिवाय ते'ब्रह्मास्त्र' आणि 'कल्की २८९८ एडी'मध्ये झळकणार आहे.
Comments
Add Comment

जम्मू आणि हिमाचलमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता, हवामान खात्याने 'या' राज्यांना दिला इशारा

दिल्ली: हवामान खात्याने जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात हलका पाऊस आणि हिमवृष्टीचा इशारा दिला आहे. आयएमडीने

'देशातील नक्षलवादाचा ३१ मार्चपर्यंत समूळ नायनाट करणार'

रायपूर  : केंद्र सरकारच्या सुरक्षा-केंद्रित रणनीतीमुळे आणि पायाभूत सुविधांच्या विकासामुळे डाव्या

महाराष्ट्रात लवकरच मतदारयाद्यांची सखोल तपासणी

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने सध्या पाच राज्यांतील मतदारयाद्यांची सखोल तपासणीवर (एसआयआर) लक्ष केंद्रित

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे भारतीय कृषी उत्पादनांना तोटा नाही : शिवराज सिंह

भोपाळ : अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे भारतीय कृषी उत्पादनांना नुकसान होणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय कृषी

मंकी फिव्हरवर स्वदेशी लस विकसित, महाराष्ट्रातील दुर्गम भागातील नागरिकांना दिलासा

नवी दिल्ली : महाराष्ट्र,कर्नाटक आणि गोवा यांसह संपूर्ण पश्चिम घाट पट्ट्यात दरवर्षी दहशतीचे वातावरण निर्माण

अखंड भारताचा उदय होईल, भारत तोडण्याची भाषा करणारेच तुटतील : डॉ. मोहन भागवत

मुंबई : भारत तोडण्याचा विचार करणारे स्वतःच तुटतील; हा १९४७ चा भारत राहिलेला नाही. आगामी २०४७ मध्ये अखंड भारताच्या