Amitabh Bachchhan : सावधान! 'सायबर ठगी से बचें'...आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही

सरकारकडून सायबर फसवणुकीची कॉलर ट्यून झाली बंद...


नवी दिल्ली : बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांचा दमदार आवाज सर्वांना आवडतो. पण,गेल्या काही काळापासून जेव्हा जेव्हा आपण एखाद्याला फोन करायचो तेव्हा अमिताभ बच्चन यांच्या गंभीर आणि दमदार आवाजात एक सूचना ऐकू येत होती. "सायबर फसवणुकीपासून सावध रहा...". आता हा आवाज तुम्हाला त्रास देणार नाही. कारण सरकारने ही जागरूकता मोहीम थांबवली आहे. कोविड काळात सुरू झालेला हा ऑडिओ संदेश भारत सरकारच्या दूरसंचार मंत्रालयाचा एक उपक्रम होता. यामध्ये अमिताभ बच्चन यांच्या आवाजात नागरिकांना कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नका, त्यांचा ओटीपी शेअर करू नका आणि कोणत्याही कॉलवर बँकिंग तपशील देऊ नका असे सांगण्यात आले होते.

'सरकार को बोलो भाई, उन्होंने हमसे कहा सो किया'


सरकारचे हे पाऊल देशातील वाढत्या सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी होते जे अमिताभ बच्चन यांच्या लोकप्रियतेशी जोडलेले होते. या संदेशाचा उद्देश लोकांना जागरूक करणे हा असला तरी, सोशल मीडियावर अनेकांनी त्यावर नाराजी व्यक्त केली होती. विशेषतः जेव्हा हा संदेश आपत्कालीन कॉलच्या मध्यभागी येत असे, तेव्हा लोक अस्वस्थ व्हायचे. अशा परिस्थितीत, स्वतः अमिताभ बच्चन यांनाही ट्रोलिंगचा सामना करावा लागला. एका ट्रोलरला उत्तर देताना अमिताभ बच्चन म्हणाले होते की, 'सरकार को बोलो भाई, उन्होंने हमसे कहा सो किया' परंतु ही कॉलर ट्यून सरकारच्या विनंतीवरून होती आणि ती बंद करण्याचा निर्णय सुद्धा सरकारी पातळीवर घेतला गेला आहे, ट्रोलर्समुळे नाही.


जबरदस्त चित्रपट


अमिताभ हे काळाबरोबर चालणारे अभिनेते आहे. आज सोशल मीडियाचं युग आहे आणि मेगास्टार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप सक्रिय आहे. अनेक वेळा ते त्याच्या चाहत्यांच्या कमेंट्सनाही उत्तर देतात, जसे त्यांनी आत्ताच दिलं आहेत. दरम्यान अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, बिग बी शेवटी 'कल्की २८९८ एडी' आणि 'वेट्टैयान'मध्ये दिसले आहे. आता पुढं ते 'सेक्शन ८४' या आगामी चित्रपटांमध्ये दिसणार आहे, याशिवाय ते'ब्रह्मास्त्र' आणि 'कल्की २८९८ एडी'मध्ये झळकणार आहे.
Comments
Add Comment

दिल्ली विमानतळावरुन एकाच फॉर्च्युनरमधून मोदी आणि पुतिन रवाना

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन गुरुवारी संध्याकाळी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले. नवी

Rasgulla Fight Cancels Bihar Wedding : रसगुल्ल्यामुळे झाला कुस्ती हल्ला! लग्नात दिसेल ते फेकून मारलं; नवरदेव-नवरीची गाठ पडण्याआधीच पाहुण्यांमध्ये 'डब्ल्यू डब्ल्यू इ'!

बिहार : लग्न समारंभ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाचा आणि संस्मरणीय क्षण असतो. हा क्षण खास

भाडेकरूंना दिलासा! घरभाड्याबाबत नवा निर्णय लवकरच होणार लागू, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली: वाढत्या महागाईमुळे घरांच्या किमतीमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ झाली असल्याने देशातील लाखो लोक

Doctor Death News : युवा डॉक्टरांचे स्वप्न भंगले; भरधाव कारची ट्रकला धडक, वेगामुळे झालेल्या अपघातात चौघांचा दुर्दैवी अंत

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यामध्ये बुधवारी (३ डिसेंबर २०२५) रोजी एक हृदय पिळवटून टाकणारी आणि

८७ बेकायदेशीर 'लोन ॲप'वर कारवाई : केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

नवी दिल्ली : डिजिटल फसवणुकीचे वाढते प्रमाण आणि अवैध ऑनलाइन कर्ज व्यवहारांच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक लूट

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी बांधकामात मशि‍दीचा अडथळा

कोलकाता: सर्वाधिक व्यस्त विमानतळांपैकी एक असणाऱ्या कोलकात्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ