उसळीतील कोंथिबीर वडी

  269

सुग्रास सुगरण : गायत्री डोंगरे


महाराष्ट्रीय स्वयंपाकघरात कोथिंबीर वडी ही एक झणझणीत, कुरकुरीत आणि सगळ्यांच्या आवडीची पारंपरिक डिश आहे. बहुतेक वेळा वड्या खाऊन उरतात आणि मग त्या कशा वापरायच्या, असा प्रश्न पडतो. अशावेळी आजी-आईंच्या स्वयंपाकघरातून आलेली एक सुंदर कल्पना म्हणजे – उरलेल्या कोथिंबीर वड्यांची झणझणीत उसळ! ‘उसळीतील कोंथिबीर वडी’ ही गावाकडची आणि विस्मरणात गेलेली मस्त झणझणीत रेसिपी आहे.


साहित्य


५-६ उरलेल्या कोथिंबीर वड्या (कापून)
१ मध्यम कांदा (बारीक चिरून)
२ टेबलस्पून ओले खोबरे (ऐच्छिक)
१ टीस्पून आलं-लसूण पेस्ट
१ टीस्पून मोहरी
१/२ टीस्पून हळद
१ टीस्पून लाल तिखट
१ टीस्पून गोडा मसाला / गरम मसाला
१ टीस्पून गूळ
१ चमचा तेल
मीठ चवीनुसार
पाणी – १ कप
कोथिंबीर सजावटीसाठी


‍कृती 


कढईत तेल गरम करून मोहरी टाका. मोहरी तडतडली की आलं-लसूण पेस्ट टाका आणि ३० सेकंद परतवा. मग त्यात बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परतवा. हळद, तिखट, गोडा मसाला घालून नीट परतवा. १ कप पाणी आणि गूळ (ऐच्छिक आहे)घालून उकळी आणा. मीठ चवीनुसार टाका. उकळी आली की त्यात कापलेल्या कोथिंबीर वड्या घाला. मंद आचेवर ५-७ मिनिटं शिजू द्या, जेणेकरून वड्या रस्सा पिऊन मऊ होतील. वरून कोथिंबीर व खोबरं घाला. झाकण ठेवून २ मिनिटं वाफ येऊ द्या.


टीप : ही उसळ थोडी पातळ ठेवली तर कोथिंबीर वड्या रस्सा छान वाटतो. हवे असल्यास थोडे भरड दाणे घालून चव अजून वाढवता येते.

Comments
Add Comment

Attar VS Perfume : अत्तर की परफ्युम? परफ्युमसह दरवळतो अत्तराचा सुगंध

अत्तराचे नाव घेताच सगळीकडे सुगंध दरवळायला लागतो. अत्तराचे एक वेगळे महत्त्व आहे. अत्तराचे अनेक प्रकार असून

नितळ त्वचा अन् संतुलित आहार

सौंदर्य तुझं : प्राची शिरकर प्रत्येक ऋतूनुसार आपल्याला त्वचेची काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात अनेक प्रकारच्या

समाजसेवेचा तेजोमय दीपस्तंभ

वैशाली गायकवाड एखाद्या व्यक्तीच्या जीवनात जर सेवाभाव हा श्वासासारखा नैसर्गिक झाला, तर तिचं संपूर्ण अस्तित्वच

योगनिद्रा

मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके गील दोन लेखांत आपण शवासनामधील आदर्श शारीरिक स्थिती आणि त्याचप्रमाणे मनाच्या आधारे

Monsoon Hair Care : पावसामुळे केस झालेत राठ? केसांची ‘अशी’ घ्या काळजी...

ऋतू कोणताही असो, प्रत्येक ऋतूंमध्ये केसांची काळजी घ्यावीच लागते. पावसाळ्यात आरोग्याशी संबंधित समस्या वाढतात.

Vat Purnima 2025 : नवविवाहितेचा पारंपरिक शृंगार; वडाची फेरी आणि प्रेमाची गाठ!

हिंदू धर्मात वट पौर्णिमेचे व्रत फार महत्वाचे मानले जाते. सौभाग्यासाठी प्रत्येक विवाहित महिला वटसावित्रीचे