जिल्हा परिषदेची शाळा सकाळी १०.३० वाजता भरणार आहे आणि संध्याकाळी ५ वाजता सुटणार आहे. तर अर्धवेळीची शाळा नऊ ते दुपारी दीड वाजेपर्यंत असणार आहे. शाळेच्या दिवशी ६० मिनिटांची सुट्टी असणार आहे. तर पहिल्या व दुसऱ्या सत्रात १०-१० मिनिटांच्या दोन सुट्ट्या असणार आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांची नियमित वेळ सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ अशी असणार आहे. अर्ध्यावेळेची शाळा सकाळी ९ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत भरेल, असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. शाळेच्या कामकाजादिवशी ६० मिनिटांची मोठी सुटी तर पहिल्या व दुसऱ्या सत्रात १० मिनिटांच्या दोन सुट्या राहतील. दुबार पद्धतीने शाळा भरत असल्यास दहा मिनिटांची लहान आणि ३५ मिनिटांची मोठी सुटी असणार आहे.
नवी दिल्ली : भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला, पोलिश अंतराळवीर स्लावोज उझ्नान्स्की, हंगेरियन अंतराळवीर टिबोर कापू आणि अमेरिकेचा अंतराळवीर पेगी ...
अशा आहेत वर्षभरातील सुट्ट्या
- जुलै : आषाढी एकदशी, मोहर्रम, नागपंचमी
- ऑगस्ट : रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिन, गणेश चतुर्थी
- सप्टेंबर : गौरी विसर्जन, ईद-ए- मिलाद, अनंत चतुर्दशी, घटस्थापना
- ऑक्टोबर : गांधी जयंती आणि दिवाळी
- नोव्हेंबर : गुरूनानक जयंती
- डिसेंबर : ख्रिसमस- नाताळ
- जानेवारी : मकरसंक्रांती, शब्बे- ए- मेराज, प्रजासत्ताक दिन
- फेब्रुवारी : शब्बे-ए-बरात, महाशिवरात्री, श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती
- मार्च : धुलिवंदन, रंगपंचमी, शब्बे-ए-कदर, गुढी पाडवा, रमजान ईद, रामनवमी, महावीर जयंती
- एप्रिल : गुड फ्रायडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
- मे : महाराष्ट्र दिन, उन्हाळा सुट्टी