मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी एनएचआयला पत्र

व्हाईट टेपिंगच्या निकृष्ट कामामुळे अपघात


तलासरी : मुंबई-अहमदाबादबाद महामार्गांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत, माती रस्त्यावर आली आहे, पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून यामुळे अनेक अपघात होत असून अजून होण्याची शक्यता असल्याने महामार्ग व्हाईट टेपिंगच्या निकृष्ट कामामुळे अपघात होत आहेत, याची दखल घेऊन तलासरी पोलिसांना महामार्गा वरील पूल व रस्त्यावरील खड्डे बुजावीण्यांसाठी महामार्ग प्राधिकरणाला पत्र दिले आहे तलासरी पोलीस स्टेशन हद्दीत मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-४८ हा सुमारे २१ कि.मी.


गेलेला असुन आच्छाड ते धुंदलवाडी दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट कॉक्रिटीकरणाचे पैच/रॅम्प सोडण्यात आलेले आहेत. सध्या पावसाळयाला सुरुवात झालेली असुन मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-४८आच्छाड ते धुंदलवाडी पर्यंत महामार्गाची पाहणी केली असता नमुद ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अपघात होऊन, जिवीतहानी व गाडयांचे नुकसान होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्मान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


पोलिसांनी एनएचआयला लिहिलेल्या पत्रात आमगाव ब्रिज वर मुंबई चाहीनी व गुजरात वाहीनी या दोन्ही वाहीनीवर पडलेले खड्डे, मुंबई वाहीनीवर तलासरी पाडवीपाडा येथील कामेश्वर धाबा समोर पडलेले खड्डे सदर ठिकाणी सिमेंट कॉक्रिटीकरणाचे पेंच,रॅम्प असल्याने वारंवार अपघात होत आहेत.


जुने बीएसएनएल ऑफिस जवळुन सर्विस रोड तलासरी नाका पर्यंत पावसाचे पाणी येत असल्याने सदर पाणी येणार नाही या करीता उपाययोजना करणे. मुंबई बाजु जायका हॉटेल समोर खड्डे पडले असुन सदर ठिकाणी माती रस्त्यावर आल्याने एखादा अपघात होण्याची शक्याता नाकारता येत नाही. ह्या ठिकाणी दुरुस्ती करण्याच्या सूचना केल्या आहेत.


खड्डे तत्काळ बुजविण्यात यावेत



महामार्गावर खड्डे दुरुस्तीचे व महामार्ग सुरक्षिततेचे काम शासनाने आपणास दिलेले आहे. त्याअर्थी महामार्गाच्या दुरुस्तीची व प्रवासांच्या सुरक्षिततेची जबाबदारी तुमचीच आहे महामार्गावरील रोड खचणे, रोलींग तुटुन अपघात होणे, ही शक्यता नाकारता येत नाही. सदर खड्डयांमुळे झालेल्या अपघातात एखादा दखलपात्र य अदखलपात्र अपराध होण्याची शक्यता आहे. तरी आपण सदर महामार्गावर पडलेले खड्डे तात्काळ बुजविण्यात यावेत. तसेच अपघात होणार नाहीत याबाबत योग्य त्या उपायोजना कराव्यात, असे नमूद केले आहे.


Comments
Add Comment

Bullet Train : बुलेट ट्रेनचे राज्यातील काम जोरात, तंत्रज्ञांनी पालघर जिल्ह्यात केली कमाल

पालघर : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर आहे. केंद्रातल्या मोदी सरकार आणि राज्यातल्या फडणवीस

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन: पालघरमध्ये तिसऱ्या डोंगराळ बोगद्याचे काम फत्ते; अवघ्या ५ महिन्यांत महाराष्ट्रातील 'हे' मोठे आव्हान पूर्ण

पालघर : देशातील पहिल्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या (high-Speed Railway Project) म्हणजेच 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन'च्या

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात ठार १३ जणांवर अंत्यसंस्कार, पीडित कुटुंबांचे पालकत्व शासन स्वीकारणार

डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धनिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातातील १३ मृतांवर आज अत्यंत

Palghar Accident : काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य! एकाच रांगेत १२ मृतदेह, बापूगावात महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या

Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक