‘माझी टीएमटी ॲप’ला प्रवाशांकडून वाढता प्रतिसाद

ठाणे  : प्रवाशांचा सुट्ट्या पैशाचा त्रास वाचावा यासाठी ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागामार्फत जानेवारी महिन्यापासून माझी टीएमटी ॲप्लिकेशन सुरु करण्यात आले आहे. या ॲप्लिकेशनचा वापर ६३ हजार ८४० प्रवाशांनी केला असून या ॲप्लिकेशनद्वारे दररोज ५ ते ६ हजार प्रवासी तिकीट काढत आहेत. यामुळे टिएमटीचे हे ॲप्लिकेशन प्रवाशांच्या पसंतीस पडत असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर तिकीट्यांच्या सुट्टे पैशांवरून प्रवासी आणि वाहकांमध्ये होणारे वाद टळत आहेत.


ठाणे शहरातील विविध भागात परिवहन सेवेच्या बस गाड्या प्रवासी वाहतूक करतात. या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. सुट्ट्या पैशांच्या कारणावरून अनेकदा प्रवासी आणि वाहकांमध्ये वाद होतात. वाहकाकडे सुट्टे पैसे उपलब्ध नसल्यामुळे त्यांना उर्वरित पैसे प्रवाशांना देताना अनेक अडचणी येतात. सुट्टे पैसे नसल्यामुळे काही वेळेस प्रवाशाचा बसथांबा आला तरी वाहकाला उर्वरित पैसे देणे शक्य होत नाही. त्यावरूनही प्रवासी आणि वाहकांमध्ये वाद होता.


यामुळेच तिकीटासाठी सुट्टे पैसे द्या, अशी सुचना वाहकाकडून बसमधील प्रवाशांना वारंवार सुचना केली जाते. परंतू, अनेकदा प्रवाशांकडे सुट्टे पैसे उपलब्ध नसतात. त्यामुळे वाहक आणि प्रवाशांमध्ये अनेकदा खटके उडताना दिसतात. यावर पर्याय म्हणून डिजीटल तिकीट सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात होती.


या मागणीनुसार ठाणे महापालिका परिवहन विभागामार्फत जानेवारीपासून ‘माझी टीएमटी’ ॲप्लिकेशन सुरु करण्यात आले. या मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे प्रवाशांना यूपीआय वापरून डिजिटल तिकिट काढता येत आहे. यामुळे प्रवाशांचा वाहकासोबत सुट्टे पैसे देण्यावरून होणारा वाद टळत आहे. प्रवाशांना ॲपवर बसमध्ये बसण्याचे ठिकाण आणि इच्छीत स्थळी उतरण्याचे ठिकाण, याची नोंद केल्यानंतर तिकीट दर दाखविले जाते.


त्यानुसार, प्रवाशांना तिकीटाचे दर ऑनलाईन स्वरुपात भरायचे असतात. या ॲप्लिकेशनवरुन प्रवाशांना ऑनलाईन तिकीट काढणे सोयीस्कर आणि सोपे झाले आहे. त्यामुळे मोठ्यासंख्येने प्रवासी या ॲप्लिकेशनचा वापर करत आहेत. जानेवारी ते जून या सहा महिन्याच्या कालावधीत ६३ हजार ८४० प्रवासी या ॲप्लिकेशनचा वापर केल्याची माहीती समोर आली आहे. या ॲप्लिकेशनवरुन दिवसाला ५ ते ६ हजार प्रवासी तिकीट काढत असल्याची माहिती ठाणे परिवहन सेवेचे व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांनी दिली.

Comments
Add Comment

ठाण्यात २४ तासांसाठी पाणीपुरवठा खंडित

ठाणे: 'ठाणे महानगरपालिकेने' (TMC) जाहीर केले आहे की, ठाणे शहराच्या काही भागांमध्ये २४ तासांसाठी पाणीपुरवठा खंडित

गणपत गायकवाड यांना मोठा दिलासा; कोळसेवाडी पोलीस ठाणे राडा प्रकरणात निर्दोष मुक्तता

कल्याण: माजी आमदार गणपत गायकवाड यांना एक मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. २०१४ मध्ये कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस

ठाणे, नवी मुंबई, पालघरमध्ये मुसळधार! हवामान खात्याने दिला रेड अलर्ट

सखल भागात राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन मुंबई: ठाण्यात सततच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

घोडबंदरवासियांची वाहतूक कोंडीतून होणार मुक्तता, उपमुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडवर

जड वाहने रात्री १२ नंतर सोडण्याचे शिंदे यांचे आदेश ठाणे: घोडबंदर रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत

अंबरनाथ, बदलापुरात यंत्रणा कुचकामी

रासायनिक कंपन्यांकडून पाण्याच्या प्रवाहांमध्ये विषारी रसायने अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूरवासीयांना पाणी व

कल्याणमध्ये मराठीची सक्ती आहे का, विचारत महिलेची अरेरावी

१५ ऑक्टोबरपर्यंत मराठी न आल्यास दुकानातून खरेदी न करण्याचे आवाहन कल्याण : कल्याण, प. येथील 'पटेल आर मार्ट'मध्ये