‘माझी टीएमटी ॲप’ला प्रवाशांकडून वाढता प्रतिसाद

  48

ठाणे  : प्रवाशांचा सुट्ट्या पैशाचा त्रास वाचावा यासाठी ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागामार्फत जानेवारी महिन्यापासून माझी टीएमटी ॲप्लिकेशन सुरु करण्यात आले आहे. या ॲप्लिकेशनचा वापर ६३ हजार ८४० प्रवाशांनी केला असून या ॲप्लिकेशनद्वारे दररोज ५ ते ६ हजार प्रवासी तिकीट काढत आहेत. यामुळे टिएमटीचे हे ॲप्लिकेशन प्रवाशांच्या पसंतीस पडत असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर तिकीट्यांच्या सुट्टे पैशांवरून प्रवासी आणि वाहकांमध्ये होणारे वाद टळत आहेत.


ठाणे शहरातील विविध भागात परिवहन सेवेच्या बस गाड्या प्रवासी वाहतूक करतात. या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. सुट्ट्या पैशांच्या कारणावरून अनेकदा प्रवासी आणि वाहकांमध्ये वाद होतात. वाहकाकडे सुट्टे पैसे उपलब्ध नसल्यामुळे त्यांना उर्वरित पैसे प्रवाशांना देताना अनेक अडचणी येतात. सुट्टे पैसे नसल्यामुळे काही वेळेस प्रवाशाचा बसथांबा आला तरी वाहकाला उर्वरित पैसे देणे शक्य होत नाही. त्यावरूनही प्रवासी आणि वाहकांमध्ये वाद होता.


यामुळेच तिकीटासाठी सुट्टे पैसे द्या, अशी सुचना वाहकाकडून बसमधील प्रवाशांना वारंवार सुचना केली जाते. परंतू, अनेकदा प्रवाशांकडे सुट्टे पैसे उपलब्ध नसतात. त्यामुळे वाहक आणि प्रवाशांमध्ये अनेकदा खटके उडताना दिसतात. यावर पर्याय म्हणून डिजीटल तिकीट सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात होती.


या मागणीनुसार ठाणे महापालिका परिवहन विभागामार्फत जानेवारीपासून ‘माझी टीएमटी’ ॲप्लिकेशन सुरु करण्यात आले. या मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे प्रवाशांना यूपीआय वापरून डिजिटल तिकिट काढता येत आहे. यामुळे प्रवाशांचा वाहकासोबत सुट्टे पैसे देण्यावरून होणारा वाद टळत आहे. प्रवाशांना ॲपवर बसमध्ये बसण्याचे ठिकाण आणि इच्छीत स्थळी उतरण्याचे ठिकाण, याची नोंद केल्यानंतर तिकीट दर दाखविले जाते.


त्यानुसार, प्रवाशांना तिकीटाचे दर ऑनलाईन स्वरुपात भरायचे असतात. या ॲप्लिकेशनवरुन प्रवाशांना ऑनलाईन तिकीट काढणे सोयीस्कर आणि सोपे झाले आहे. त्यामुळे मोठ्यासंख्येने प्रवासी या ॲप्लिकेशनचा वापर करत आहेत. जानेवारी ते जून या सहा महिन्याच्या कालावधीत ६३ हजार ८४० प्रवासी या ॲप्लिकेशनचा वापर केल्याची माहीती समोर आली आहे. या ॲप्लिकेशनवरुन दिवसाला ५ ते ६ हजार प्रवासी तिकीट काढत असल्याची माहिती ठाणे परिवहन सेवेचे व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांनी दिली.

Comments
Add Comment

आनंदाची बातमी शिळफाटा-कल्याण ते रांजनोली वाहतूककोंडी सुटणार

ठाणे : शिळफाटा-कल्याण ते रांजनोली या पट्ट्यात वाहतूक कोंडी ही रोजची समस्या झाली आहे. यावर उपाय करण्यासाठी

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, नगरसेवक संख्येत वाढ नाहीच, यंदाही 131 नगसेवक

मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून आज ठाणे महानगरपालिकेची

Bhiwandi Accident : भिवंडीत खड्ड्यांनी घेतला डॉक्टरचा बळी; आतापर्यंत जीवघेण्या खड्ड्यामुळे तिघांचे प्राण गेले, जबाबदार कोण?

भिवंडी : भिवंडी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. वंजारपट्टी नाका परिसरात उघडखाबड

ठाण्यात मुसळधार पावसामुळे गणपती कारखान्यात शिरलं पाणी

ठाण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना पावसाचा फटका गणपती मूर्तीला देखील बसला

पावसामुळे ठाण्यात ४ महिन्यांत २० जणांचा बळी!

ठाणे: गेल्या चार महिन्यांत ठाणे जिल्ह्यात पावसामुळे संबंधित घटनांमध्ये किमान २० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर या