दिनेश कार्तिकने केली टीम इंडियाची डॉबरमॅनशी तूलना, विधानाने खळबळ

लीड्स: इंग्लंडच्या दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाचा लीड्स कसोटीमध्ये 5 विकेट्सने निराशाजनक पराभव पत्करावा लागला. यामुळे इंग्लंड विरुद्ध  सुरू असलेल्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया ही 0-1 ने पिछाडीवर आहे. मात्र, या पराभवानंतर आणखीन एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. ती गोष्ट म्हणजे टीम इंडियाची तुलना ही चक्क डॉबरमॅन कुत्र्याशी करण्यात आली असून, ही तुलना भारताचा माजी क्रिकेटपट्टू दिनेश कार्तिक यानेच केली आहे. त्याच्या या विधानामुळे नवा वाद पेटू शकतो. काय आहे संपूर्ण प्रकरण?  जाणून घेऊया...

सध्या भारत इंग्लंड दौऱ्यावर असून, इथे भारत विरुद्ध इंग्लंड असे ५ कसोटी सामने खेळले जात आहेत. यामधील पहिला सामना नुकताच झाला असून, या सामन्यात भारतीय फलंदाजांनी 5 शतके झळकावूनही संघाला विजय खेचून आणता आला नाही.  आता याच कसोटीच्या निकालानंतर टीम इंडिया विषयी दिनेश कार्तिकने केलेले धक्कादायक विधान अमोर आले आहे. त्याने टीम इंडियाची तुलना ही चक्क डॉबरमॅन कुत्र्याशी केली. स्काय स्पोर्ट्सवर याबद्दल बोलताना दिनेश कार्तिक दिसून आला. मात्र त्याने अशी तुलना नेमकी का केली? काय आहे प्रकरण? जाणून घेऊया.

दिनेश कार्तिकने काय म्हटलं?





इंग्लंडच्या ब्रॉडकास्टर चॅनल, स्काय स्पोर्ट्सवर, माजी भारतीय यष्टीरक्षक दिनेश कार्तिकन क्रिकेट विश्लेषक म्हणून उपस्थित राहिला होता. त्या दरम्यानचा एक व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल झाला आहे.  ज्यामध्ये तो म्हणतो, टीम इंडियाची फलंदाजी डॉबरमॅन कुत्र्यासारखी आहे, ज्याचे डोके चांगले आहे, मधला भाग ठीक आहे, परंतु ज्याला शेपूट नाही. त्याचं हे बोलण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या विधानामुळे चांगलीच खळबळ माजली असून नवा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.

दिनेश कार्तिकने भारतीय फलंदाजीची तुलना डॉबरमॅन कुत्र्याशी का केली?


दिनेश कार्तिक सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये भारतीय फलंदाजीची तुलना डॉबरमॅन कुत्र्याशी का करतो यामागे देखील एक कारण आहे. दिनेश कार्तिकने व्हिडिओमध्ये जे विधान केले,  त्यात टीम इंडियाचं डोकं (हेडला) चांगलं म्हटलं आहे. भारतीय फलंदाजी क्रमातील हेड म्हणजे टॉप ऑर्डर. जर आपण लीड्समध्ये खेळलेल्या भारताच्या दोन्ही डावांवर नजर टाकली तर टॉप ऑर्डरची कामगिरी चांगली झाल्याचे दिसून आलं. या कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये, टॉप ऑर्डरमधील फलंदाजांनी विकेटवर टिकून रहात शतक झळकावलं, यशस्वी आणि गिलने पहिल्या डावात शतक झळकावले असेल, तर केएल राहुलने दुसऱ्या डावात शतक झळकावले. त्यानंतर त्याने मधला भाग ओके असल्याचे म्हंटले, म्हणजे टीम इंडियाच्या मिडल ऑर्डर फळीचा तो उल्लेख करतो.  तिथे ऋषभ पंतने धावफलकावर खूप धावा केल्या. त्याने दोन्ही डावात शतक झळकावले. त्याच्याशिवाय जडेजा आणि करुण नायर यांनीही काही चांगल्या धावा केल्या. पण ज्याप्रकारे डॉबरमन कुत्र्यांना शेपटी नसते. अगदी त्या प्रकारे टीम इंडियाच्या शेवटच्या फळीने अत्यंत निराशाजनक कामगिरी केल्याच तो स्पष्ट करतो. भारताच्या खालच्या फलंदाजाच्या  खराब कामगिरीमुळे संघाचा  स्कोअरबोर्ड काही धावांनी कमी पडला. लीड्स कसोटीच्या पहिल्या डावात ६ विकेटवर ४५३ धावा करणारी टीम इंडिया नंतर फक्त ४७१ धावांवर ऑलआउट झाली. तर दुसऱ्या डावात ६ विकेट्स गमावून ३३५ धावा करणाऱ्या टीम इंडियाचा सर्व खेळ पुढे अवघ्या ३६४ धावांवर आटोपला.
Comments
Add Comment

India Women's Cricket Team : आशियाई स्पर्धेसाठी भारताच्या महिला क्रिकेट संघाची घोषणा, हरमन कर्णधार

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) महिला निवड समितीने सप्टेंबर २०२६ मध्ये जपानमधील ऐची-नागोया येथे

FIFA World Cup 2026 : मेस्सी गोलमध्ये अव्वल, पण पॉवर रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर! 'हा' जर्मन स्टार अव्वल

फिफा विश्वचषक २०२६ स्पर्धेने आता बाद फेरीत प्रवेश केला असून प्रत्येक सामना निर्णायक ठरत आहे. अशातच फिफाने

FIFA World Cup 2026 : जर्मनीला मोठा धक्का! पॅराग्वेने पेनल्टी शूटआऊटमध्ये केला पराभव; विश्वचषकातून धक्कादायक एक्झिट

फिफा विश्वचषक २०२६ मध्ये सर्वात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. चार वेळचा विश्वविजेता जर्मनीला पॅराग्वेने पेनल्टी

T20 Cricket : एलए ऑलिम्पिकसाठी क्रिकेटच्या पात्रता निकषांना आयओसीची मंजुरी

नवी दिल्ली : लॉस एंजेलिस ऑलिम्पिक २०२८ साठी क्रिकेटच्या पात्रता प्रणालीला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाकडून पराभवानंतर भारताचं टी-20 वर्ल्डकपमधील आव्हान संपलं; 'या' चुका ठरल्या निर्णायक

आयसीसी (ICC) महिला टी-20 (T20) वर्ल्डकपमध्ये (World Cup) ऑस्ट्रेलियाने (Australia) भारताचा ६ विकेट्सनी पराभव करत स्पर्धेतील भारताचं

IND vs IRE T20I : आयर्लंडविरुद्ध भारताचा टी-20 मालिकेत धक्कादायक पराभव; कुठे चुकली टीम इंडिया?

IND vs IRE T20I : भारताचा टी-20 (T20) कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरचा पहिलाच परदेश दौरा निराशाजनक ठरला. बेलफास्टमध्ये झालेल्या