भारतासाठी आज ऐतिहासिक दिवस! अ‍ॅक्सिओम ४ आज अंतराळात झेपावणार

तांत्रिक कारणामुळे यापूर्वी ६ वेळा मोहीम ढकलली होती पुढे


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अ‍ॅक्सिओम ४ मिशन आता २५ जून रोजी प्रक्षेपित होणार असल्याची माहिती अमेरिकन नासाकडून देण्यात आली आहे. या मिशनमध्ये भारतासोबत हंगरी आणि पोलंड या देशांचाही सहभाग आहे. हे मिशन तिन्ही देशांसाठी ऐतिहासिक मानले जात आहे. भारतासाठी हे मिशन खास आहे, कारण अनेक वर्षांनंतर एक भारतीय अंतराळात झेप घेणार आहे.


अ‍ॅक्सिओम-४ मिशनचे प्रक्षेपण फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरमधून होणार आहे. नासाने सांगितले की, ही अंतराळ मोहीम २५ जून रोज भारतीय वेळेनुसार दुपारी १२.०० वाजता स्पेसएक्सच्या फाल्कन-९ रॉकेटद्वारे प्रक्षेपित केली जाईल. मात्र, यापूर्वी या अंतराळ मोहिमेचे प्रक्षेपण अनेकवेळा पुढे ढकलण्यात आले आहे. सुरुवातीला ही मोहीम २९ मे रोजी प्रक्षेपित होणार होती परंतु तांत्रिक अडचणींमुळे ती पुढे ढकलण्यात आली.


अ‍ॅक्सिओम-४ मिशनमध्ये भारताचे शुभांशू शुक्ला तसेच पोलंड, हंगेरी आणि अमेरिकेचे अंतराळवीर आहेत. ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे १९८४ नंतर अंतराळात जाणारे भारताचे दुसरे राष्ट्रीय अंतराळवीर आहेत. याआधी १९८४ च्या एप्रिल महिन्यात रशियाच्या यानातून भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा अंतराळात गेले होते. यामुळे भारतीयांचे लक्ष अ‍ॅक्सिओम-४ मिशनकडे आहे.

भारतीय हवाई दलाचे पायलट ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला तीन इतर क्रू मेंबर्ससोबत स्पेस मिशन, Axiom-4 चा भाग बनण्यासाठी तयार आहे. हे मिशन म्हणजे भारतासाठी एक मैलाचा दगड ठरेल. Axiom-4मिशनची क्रू आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा प्रवास करणार आहे. १४ दिवस ही मोहीम सुरू राहणार आहे. यात सूक्ष्म गुरुत्वाकर्षणातील वैज्ञानिक प्रयोग, शैक्षणिक प्रसार आणि व्यावसायिक उपक्रमांबाबत संशोधन होणार आहे.

मिशन अ‍ॅक्सिओम स्पेसच्या 'Axiom-4' मोहिमेअंतर्गत लाँच केले जाईल. ज्याला 'मिशन आकाश गंगा' असेही म्हटले जात आहे. Axiom-4 (अ‍ॅक्स-४) मध्ये,चार देशांचे चार अंतराळवीर १४ दिवसांसाठी अंतराळ स्थानकात जाणार आहेत.शुभांशू हे आयएसएसमध्ये जाणारे पहिले आणि अंतराळात जाणारे दुसरे भारतीय असतील. यापूर्वी राकेश शर्मा यांनी १९८४ मध्ये सोव्हिएत युनियनच्या अंतराळ यानातून अंतराळात प्रवास केला होता.
Comments
Add Comment

Carbide Gun Causes : खेळणं की 'घातक शस्त्र'? दिवाळीचा आनंद अंधारात! १५० रुपयांच्या कार्बाइड गनने १४ चिमुकल्यांची दृष्टी हिरावली

जबलपूर : यावर्षी अनेक घरांसाठी दिवाळीचा सण आनंद नव्हे, तर दुःख आणि मोठी चिंता घेऊन आला आहे. याचे कारण म्हणजे

बंगळुरू-हैदराबाद महामार्गावर भीषण बस अपघात, २० जणांचा मृत्यू; जयंत कुशवाहाचा थरकाप उडवणारा अनुभव

हैदराबाद : बंगळुरू-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी पहाटे भीषण अपघात घडला. प्रवाशांनी भरलेल्या बसने

देशभरात ऑनलाईन गेमिंग आणि बेटिंगवर बंदी येणार ?

नवी दिल्ली: देशात वाढत्या ऑनलाईन गेमिंग आणि जुगाराच्या प्रकरणांची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे.

दुचाकीच्या धडकेत बसला भीषण आग! २० जणांचा मृत्यू, चंद्राबाबू नायडूंनी व्यक्त केले दु:ख

आंध्र प्रदेशः हैदराबाद-बंगळूर महामार्गावर कर्नूल जिल्ह्यातील चिन्ना टेकुर गावाजवळ आज पहाटे आगीबाबत एक मोठी

भयंकर धक्कादायक! दिवाळीत 'कार्बाइड गन'मुळे १४ मुलांना कायमचे अंधत्व; १२५ हून अधिक जखमी!

भोपाळ : दरवर्षी दिवाळीला फटाक्यांचे वेगवेगळे ट्रेंड समोर येत असातात, यामध्ये चकरीपासून ते रॉकेटपर्यंत वेगवेगळे

सैन्यासाठी ७९,००० कोटींचे मोठे निर्णय!

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने आज भारतीय