आदित्य ठाकरेची अटक टाळण्यासाठी हैद्राबादवरुन आणला मांत्रिक!

शिवसेना नेते रामदास कदम यांचा आरोप


मुंबई : शिवसेनेतील अंतर्गत वाद आता काळी विद्या, जादूटोणा आणि तांत्रिक मांत्रिकांच्या आरोपांपर्यंत पोहोचलाय. आदित्य ठाकरेंची अटक टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर तंत्र-मंत्राचा खेळ रचला. हा शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलेला आरोप निव्वळ खळबळजनक नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणाला अंधश्रद्धेच्या खाईत ढकलणारा आहे.


तीन वर्षापूर्वी शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी वर्षा बंगल्यात शिंग पुरल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता. त्यावर एकनाथ शिंदे यांनी देखिल आपण वर्षावर प्रवेश केला तेव्हा तेथे टोपलीभर लिंबू सापडल्याचे सांगितले होते.



आता रामदास कदम यांनी थेट उद्धव ठाकरेंवरच गोळी झाडलीय. हैद्राबादहून खास मांत्रिक मागवून तो दोन दिवस मातोश्रीवर बसवला आणि पुढे पाच दिवस खोपोली येथील बंगल्यावर ठेवण्यात आला… याचं कारण? आदित्य ठाकरेंना दिशा सालियन प्रकरणात अटक होऊ नये, म्हणून!.. कदमांचा हा दावा गंभीर आहे आणि त्यांनी यावर फोटो, नाव, पुरावे देण्याची तयारीही जाहीर केलीय. शिवाय हे सगळं ठाकरे गटाचा खास खासदार करून गेला, असंही कदम म्हणालेत.



मग आता प्रश्न असा की, हे सगळं जर खोटं असेल, तर ठाकरे गट गप्प का? आणि जर खरं असेल, तर महाराष्ट्राच्या राजकारणाची वाट कोणत्या अंधाऱ्या रस्त्यावर जातेय?


भास्कर जाधवांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना रामदासभाई म्हणाले, मी पुराव्यासकट बोलतो, "बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल", आम्ही हवेत तलवारी चालवत नाही. तुम्हाला कावीळ झालेली असेल, म्हणून तुम्हाला सगळं पिवळं वाटतं.. असं म्हणून त्यांनी भास्कर जाधवांनाही झाप झाप झापलं.


याआधीही ठाकरे सेनेकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री भरत गोगावले यांच्यावरही अशाच स्वरूपाचे आरोप झाले होते.आता रामदास कदम यांनी थेट उद्धव ठाकरे यांनाच लक्ष केले आहे.


राजकारणात आरोप-प्रत्यारोप नेहमीच होत असतात, पण जेव्हा मांत्रिक, जादूटोणा, काळी विद्या, तांत्रिक शक्ती या गोष्टी चर्चेत येतात, तेव्हा एक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात नक्कीच उभा राहतो की, ‘लोकशाही चालवणारे नेते, तंत्रावर चालतात की मंत्रावर?’


महाराष्ट्रात नक्की चाललंय काय… रामदास कदम यांचे हे आरोप किती खरे आहेत? त्यांच्याकडे खरोखरच पुरावे आहेत का? हे लवकरच उघडकीस येईल की गुलदस्त्यातच राहिल?

Comments
Add Comment

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या