आदित्य ठाकरेची अटक टाळण्यासाठी हैद्राबादवरुन आणला मांत्रिक!

शिवसेना नेते रामदास कदम यांचा आरोप


मुंबई : शिवसेनेतील अंतर्गत वाद आता काळी विद्या, जादूटोणा आणि तांत्रिक मांत्रिकांच्या आरोपांपर्यंत पोहोचलाय. आदित्य ठाकरेंची अटक टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर तंत्र-मंत्राचा खेळ रचला. हा शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलेला आरोप निव्वळ खळबळजनक नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणाला अंधश्रद्धेच्या खाईत ढकलणारा आहे.


तीन वर्षापूर्वी शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी वर्षा बंगल्यात शिंग पुरल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता. त्यावर एकनाथ शिंदे यांनी देखिल आपण वर्षावर प्रवेश केला तेव्हा तेथे टोपलीभर लिंबू सापडल्याचे सांगितले होते.



आता रामदास कदम यांनी थेट उद्धव ठाकरेंवरच गोळी झाडलीय. हैद्राबादहून खास मांत्रिक मागवून तो दोन दिवस मातोश्रीवर बसवला आणि पुढे पाच दिवस खोपोली येथील बंगल्यावर ठेवण्यात आला… याचं कारण? आदित्य ठाकरेंना दिशा सालियन प्रकरणात अटक होऊ नये, म्हणून!.. कदमांचा हा दावा गंभीर आहे आणि त्यांनी यावर फोटो, नाव, पुरावे देण्याची तयारीही जाहीर केलीय. शिवाय हे सगळं ठाकरे गटाचा खास खासदार करून गेला, असंही कदम म्हणालेत.



मग आता प्रश्न असा की, हे सगळं जर खोटं असेल, तर ठाकरे गट गप्प का? आणि जर खरं असेल, तर महाराष्ट्राच्या राजकारणाची वाट कोणत्या अंधाऱ्या रस्त्यावर जातेय?


भास्कर जाधवांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना रामदासभाई म्हणाले, मी पुराव्यासकट बोलतो, "बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल", आम्ही हवेत तलवारी चालवत नाही. तुम्हाला कावीळ झालेली असेल, म्हणून तुम्हाला सगळं पिवळं वाटतं.. असं म्हणून त्यांनी भास्कर जाधवांनाही झाप झाप झापलं.


याआधीही ठाकरे सेनेकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री भरत गोगावले यांच्यावरही अशाच स्वरूपाचे आरोप झाले होते.आता रामदास कदम यांनी थेट उद्धव ठाकरे यांनाच लक्ष केले आहे.


राजकारणात आरोप-प्रत्यारोप नेहमीच होत असतात, पण जेव्हा मांत्रिक, जादूटोणा, काळी विद्या, तांत्रिक शक्ती या गोष्टी चर्चेत येतात, तेव्हा एक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात नक्कीच उभा राहतो की, ‘लोकशाही चालवणारे नेते, तंत्रावर चालतात की मंत्रावर?’


महाराष्ट्रात नक्की चाललंय काय… रामदास कदम यांचे हे आरोप किती खरे आहेत? त्यांच्याकडे खरोखरच पुरावे आहेत का? हे लवकरच उघडकीस येईल की गुलदस्त्यातच राहिल?

Comments
Add Comment

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे

Rain Update : आठवड्याच्या शेवटी पावसाने धरला जोर, अनेक ठिकाणी कोसळधारा, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील