पुण्यात उबाठाला धक्का, महादेव बाबर करणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

पुणे: पुण्यातल्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर येत आहे. उबाठा गटाचे माजी आमदार महादेव बाबर (Mahadev Babar) अजित दादांच्या पक्षात प्रवेश करणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते उद्या आपल्या काही सहकार्यांसोबत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांना मोठा धक्काच बसणार आहे.


महादेव बाबर हडपसर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. ते उद्या अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील. त्यांचा मुंबईत राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे.


महादेव बाबर यांच्या पक्षप्रवेशाने पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे. महादेव बाबर यांच्या सोबत निलेश मगर, योगेश सासणे तसेच मोठ्या संख्येने उबाठा गटातील अनेक मंत्री राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेला हा मोठा धक्का आहे.



महादेव बाबर यांच्या नाराजीचं नेमकं कारण काय?


महादेव बाबर हे ठाकरे गटात तर होते, पण हवे तितके सक्रिय नव्हते. त्यांना हडपसर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवायची होती. पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ही जागा आपले शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासाठी राखून ठेवली. त्यामुळे महादेव बाबर नाराज झाले होते. नाराज महादेव बाबर यांनी महाविकास आघाडीचे काम देखील केलं नव्हतं. याचा फटका प्रशांत जगताप यांना निवडणुकीत बसला होता आणि त्यांचा पराभव देखील झाला होता.


विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली होती. या भेटीनंतर महादेव बाबर शिंदे गटात प्रवेश करणार अशी चर्चा होती. मात्र बाबर यांच्या प्रवेशाला शिंदे गटातील हडपसरमधील स्थानिक नेत्यांचा विरोध होता. त्यामुळे ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून, आपले नशीब आजमावणार आहेत.


Comments
Add Comment

पंतप्रधान मोदींचा मुंबईत जोरदार 'प्रहार'! 'नाव न घेता' उद्धव ठाकरेंना दिला मोठा 'झटका'

मेट्रो प्रकल्प रोखला; मुंबई हल्ल्यावरून काँग्रेसवरही केला घणाघात नवी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या

शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाची पुढील 'सर्वोच्च' सुनावणी १२ नोव्हेंबरला होणार

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील पक्ष म्हणजेच शिवसेना असा निर्णय

फडणवीस सरकारच्या २ सप्टेंबरच्या GR ला स्थगिती देण्याची मागणी कोर्टाने फेटाळली, मराठ्यांना दिलासा

मुंबई : ठोस पुरावे सादर केल्यास त्यांची छाननी करुन खात्री पटल्यानंतर संबंधित मराठा व्यक्तीला कुणबी असल्याचे

मनसे वरुन मविआत वादावादी

मुंबई : महाराष्ट्रातल्या युतीत मोठा भाऊ म्हणून बाळासाहेब ठाकरेंना कायम मान मिळाला. पण त्यांचेच पुत्र असलेल्या

'अनिल परबांनी आठ हजार रहिवाशांना धमकावून घरे रिकामी केली'

मुंबई : विलेपार्ले येथील एका एसआरए योजनेतील आठ हजार रहिवाशांना घरे रिकामी करण्यासाठी अनिल परब यांनी धमकावले,

कधी सुरू होणार महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ?

मुंबई : महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार ८ डिसेंबर २०२५ पासून सुरू होणार आहे. विधिमंडळ