Auto Rickshaw Rent Hike: आता शेअर रिक्षाचे भाडे वाढले! सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी एक चटका

कल्याण: गेल्या काही दिवसांपासून महागाई प्रचंड वाढली आहे. त्यातच आता सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी एक चटका बसणार आहे. कारण आता कल्याण आरटीओ क्षेत्रातील प्रवाशांना रिक्षा प्रवासासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ यांसारख्या शहरांमध्ये शेअर रिक्षाची भाडेवाढ लागू (Share Auto Rent Hike) करण्यात आली आहे. आजपासून (सोमवार, 23 जून 2025) ही नवी भाडेवाढ जाहीर केली जाणार आहे.


कल्याण आरटीओ क्षेत्रात २३ जून २०२५ पासून शेअर रिक्षाचे भाडे ३ ते ५ रुपयांनी वाढले आहे. तीन महिन्यापूर्वी जाहीर झालेली ही वाढ रिक्षांच्या मीटरच्या पुनर्मानांकनामुळे उशीरा लागू झाली. इंधन किमती आणि देखभाली खर्च वाढल्याने ही वाढ आवश्यक असल्याचे रिक्षा संघटना म्हणतात.



दरवाढीमागील कारण काय?


आधीच दैनंदिन गरजा आणि इंधनाच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. त्यात आता रिक्षा प्रवासाच्या वाढीव खर्चामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी ताण पडणार आहे. दुसरीकडे, रिक्षा संघटनांनी वाढत्या इंधनाच्या किमती आणि देखभालीचा खर्च लक्षात घेता, ही भाडेवाढ आवश्यक असल्याचे म्हटले आहे. तसेच प्रवाशांनी ती स्वीकारावी, असे आवाहन केले आहे.



भाडेवाढ तीन महिन्यांपूर्वीच जाहीर, लागू आजपासून


मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने ही भाडेवाढ तीन महिन्यांपूर्वीच जाहीर केली होती. मात्र, रिक्षांच्या मीटरचे पुनर्मानांकित (recalibrated) पूर्ण न झाल्यामुळे ती आतापर्यंत लागू झाली नव्हती. आता आरटीओ क्षेत्रातील सुमारे 95% रिक्षांचे मीटर पुनर्मानांकित झाल्याने, रिक्षा चालकांनी आजपासून नवीन दर आकारण्यास सुरुवात केली आहे.



किती असणार भाडेवाढ?


शेअर रिक्षाच्या भाड्यात अंतरानुसार 3 ते 5 रुपयांची वाढ झाली आहे, तर मीटरमध्येही प्रति प्रवासामागे 3 रुपयांची वाढ लागू करण्यात आली आहे. या भाडेवाढीमुळे नागरिक आणि प्रवाशांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.  दररोज कामावर जाण्यासाठी किंवा इतर प्रवासासाठी रिक्षावर अवलंबून असलेल्या हजारो प्रवाशांना आता या वाढीव आर्थिक बोज्याला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे सर्वसामान्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

मराठा आरक्षण मार्गातील सर्वात मोठा अडथळा दूर

हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ विरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली मुंबई : हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला

पवारांच्या आमदाराने जरांगेंकडून पुन्हा आंदोलन करवले- छगन भुजबळ

नागपूर : अंतरवली सराटी येथे 2 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या लाठीचार्जनंतर मनोज जरांगे यांचे आंदोलन पुन्हा सुरू

Pune Crime Firing : घायवळ गॅंगचा प्रकाश धुमाळांवर गोळीबार, २०० मीटरवर पोलिस स्टेशन तरी पोलिसांना यायला अर्धा तास का लागला?

पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी टोळ्यांचे थैमान थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. नुकतेच टोळीयुद्धाचे प्रकार घडून

Nanded Accident : ब्रेक फेल अन् ट्रकने उडवली जीप! दुचाक्यांचा चेंदामेदा; नेमकं काय घडलं? थरकाप उडवणारा अपघात

नांदेड : राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यात भर पडली आहे नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुखेड

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत