Accident News: वर्सोवा खाडीत तेलाचा टँकर कोसळला, चालकाचा बुडून मृत्यू

मुंबई अहमदाबाद महामार्गावर पुलाची संरक्षक भिंत तोडून भीषण अपघात


भाईंदर: मुंबई अहमदाबाद महामार्गावरून गुजरातच्या दिशेने जाणारा तेलाचा टँकर काशिमिरा जवळील वर्सोवा खाडीवरील पुलाची संरक्षक भिंत तोडून खाली पाण्यात कोसळल्यामुळे टँकर चालकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी १२ वाजता घडली आहे.


मुंबईवरून निघालेला तेलाचा टँकर अहमदाबादच्या दिशेने जात असताना काशिमिरा भागातील वरसोवा खाडीवरील पुलाची संरक्षक भिंतीला धडक देऊन थेट पाण्यात कोसळला. या दुर्घटनेत टँकर चालकाचा बुडून मृत्यू झाला असून पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने तो टँकर बाहेर काढला आहे. चालकाव्यतिरिक्त टँकरमध्ये अन्य कोण होते का? याचाही तपास पोलीस करत आहेत. बुडून मृत्यू झालेल्या चालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय भीमसेन जोशी रुग्णालयात नेण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Mantralaya Water : 'मंत्रालयातील पाणी पूर्णपणे सुरक्षित'; टाक्यांची स्वच्छता, वॉटर प्युरिफायर सर्व्हिसिंग पूर्ण, BMCचा अहवाल दिलासा देणारा

मुंबई : मंत्रालयातील पाणीपुरवठ्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनंतर सार्वजनिक बांधकाम

Monsoon Update : राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा; कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात अलर्ट

मुंबई(Mumbai) : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचे स्वरूप विस्कळीत राहिले होते. मात्र आता राज्यातील अनेक

Chandrashekar Bawankule : नायब तहसीलदार ते अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा

 महसूल विभागाच्या सेवा नियमांत ५० वर्षांनी बदल; मुख्यमंत्र्यांकडून प्रस्तावाला मान्यता मुंबई : महसूल

MIDC Maharashtra : वैभववाडी 'MIDC'ला मूर्त रूप, पायाभूत सुविधांची कामे तातडीने सुरू करण्याचे मंत्री उदय सामंतांचे निर्देश

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत मंत्रालयात बैठक मुंबई :

Mumbai Police : CJPच्या आंदोलनानंतर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; ८ पोलीस ठाण्यांत ९०० हून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील CJP आंदोलनानंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत शहरातील आठ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

NITI Aayog Investment Index : नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

५६.६ गुणांसह गुजरात पहिले; तामिळनाडूचा तिसरा क्रमांक मुंबई(Mumbai) : देशातील राज्यांमध्ये गुंतवणुकीला पोषक वातावरण,