मंत्री नितेश राणे यांनी केली वर्सोवा जेट्टीची पाहणी

स्थानिक मासेमार बांधवांच्या विविध मागण्यांसाठी नितेश राणे यांची सकारात्मक भूमिका


मुंबई : मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी अंधेरी येथील वर्सोवा मच्छीमार जेट्टीची पाहणी करून विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी मत्स्य आयुक्त किशोर तावडे, भाजपा मुंबई उत्तर-पश्चिम जिल्हाध्यक्ष ग्यानमूर्ती शर्मा, राजश्री भानजी, चारुल भानजी, राजहंस टपके, जयराज चंदी, शारदा पाटील, पराग भावे आदी उपस्थित होते.


वर्सोवा जेट्टीसंदर्भात आराखडा तयार असून त्यानुसार लवकरच जेट्टीचा विकास करण्यात येईल. स्थानिक मच्छीमार बांधवांच्या समस्यांसंदर्भात प्रस्ताव आमच्याकडे द्या. त्यानुसार समस्या मार्गी लावल्या जातील, अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी यावेळी दिली. मंत्री नितेश राणे यांनी स्थानिक कोळी बांधवांच्या समस्या जाणून घेऊन सकारात्मक चर्चा केली. मासळी बाजारासाठी शेड व बंद शीतगृह सुरू करण्याच्या मच्छीमार बांधवांच्या मागणीची दखल घेऊन त्यावर लवकरात लवकर तोडगा काढला जाईल, असे आश्वासन यावेळी मंत्री नितेश राणे यांनी दिले.

Comments
Add Comment

अशोक हांडे यांनी महापालिका शाळेतील ती व्यक्त केली खंत...म्हणाले ,तर मोठा कलाकार झालो असतो!

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या संगीत व कला अकादमीचे शिक्षक हे खूप प्रतिभावान आहेत. शैक्षणिक

गोरेगाव–मुलुंड जोड रस्ता प्रकल्प: दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यानचे काम प्रगतीपथावर

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्‍प (GMLR) अंतर्गत दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या होणार घोषणा, कोहली-रोहितचे पुनरागमन निश्चित!

मुंबई: टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर्स रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहेत. रोहित

शेकापच्या जयंत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, महामोर्चाची तयारी ?

मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. विमानतळा दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची

BMC ची मोठी भेट: आता हॉस्पिटलमध्ये 'मोफत' आणि 'कॅशलेस' उपचार!

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने (BMC) आरोग्याच्या सोयी चांगल्या करण्यासाठी एक खूप चांगली गोष्ट सुरू केली आहे. या नव्या

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम विशेष फेरी

मुंबई : राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल