Fact Check: इराणवर हल्ल्यासाठी अमेरिकेकडून भारतीय एअरस्पेसचा वापर? भारताने फेटाळला दावा

भारताने फेटाळला दावा


नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या इराण आणि इस्त्रायलच्या वादात आता अमेरिकेने उडी घतली आहे. अमेरिकेने इराणच्या तीन अणु केंद्रांवर रविवारी(दि.२२) पहाटे हल्ला केला. दरम्यान, अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी इराणवर हल्ले करण्यासाठी भारतीय एअरस्पेसचा वापर केल्याचा काही सोशल मीडिया हँडलने दावा केला होता. जो भारताने रविवारी खोटा असल्याचे सांगत फेटाळून लावला आहे.


अमेरिकेने इंडियन एअरस्पेसचा वापर केल्याचा दावा करण्यात आला आहे. हा दावा खोटा असल्याचा सरकारकडून सांगण्यात आले आहे. एका अधिकृत निवेदनात, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) च्या फॅक्ट चेक युनिटने हे दावे "खोटे" असल्याचे खोडून काढले आणि स्पष्ट केले की, "अनेक सोशल मीडिया अकाउंट्सनी असा दावा केला आहे की अमेरिकेने ऑपरेशन 'मिडनाईट हॅमर' दरम्यान इराणविरुद्ध हल्ल्यांसाठी भारतीय एअर स्पेसचा वापर केला होता. हा दावा खोटा आहे."


पीआयबीने अमेरिकेच्या जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल डॅन केन यांच्या पत्रकार परिषदेचा हवाला दिला , ज्यात त्यांनी अमेरिकन विमानांनी घेतलेल्या पर्यायी मार्गांची तपशीलवार माहिती दिली आणि हे सर्व दावे निराधार असल्याचे फेटाळून लावले.





दरम्यान, अमेरिकेने रविवारी (२२ जून) पहाटेच्या सुमारास इराणच्या, फोर्दो, नतांज आणि इस्फहान या तीन अणुकेंद्रांवर हवाई हल्ले केले. यानंतर, इराणची अणु ठिकाणं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. दरम्यान, ज्या कारवाईअंतर्गत इराणवर हा हल्ला करण्यात आला, त्या कारवाईला मिडनाईट हॅमर, असे नाव देण्यात आले होते, अशी माहिती अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिली आहे.


अमेरिकेच्या संरक्षण विभागाने म्हटले आहे, "राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार अमेरिकेने इराणमधील तीन अणुस्थळांवर हल्ला केला. आम्ही इराणी अणुकार्यक्रम उद्ध्वस्त केला. मिडनाईट हॅमर ऑपरेशनअंतर्गत नागरिकांना अथवा इराणी सैनिकांना लक्ष्य करण्यात आले नाही." याच बरोबर, "इराणने अमेरिकेविरुद्ध कोणत्याही प्रकारच्या प्रत्युत्तराचा विचार केला, तर त्याला आणखी कठोर उत्तर दिले जाईल," असा इशाराही अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिला आहे.

Comments
Add Comment

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या