Fact Check: इराणवर हल्ल्यासाठी अमेरिकेकडून भारतीय एअरस्पेसचा वापर? भारताने फेटाळला दावा

भारताने फेटाळला दावा


नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या इराण आणि इस्त्रायलच्या वादात आता अमेरिकेने उडी घतली आहे. अमेरिकेने इराणच्या तीन अणु केंद्रांवर रविवारी(दि.२२) पहाटे हल्ला केला. दरम्यान, अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी इराणवर हल्ले करण्यासाठी भारतीय एअरस्पेसचा वापर केल्याचा काही सोशल मीडिया हँडलने दावा केला होता. जो भारताने रविवारी खोटा असल्याचे सांगत फेटाळून लावला आहे.


अमेरिकेने इंडियन एअरस्पेसचा वापर केल्याचा दावा करण्यात आला आहे. हा दावा खोटा असल्याचा सरकारकडून सांगण्यात आले आहे. एका अधिकृत निवेदनात, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) च्या फॅक्ट चेक युनिटने हे दावे "खोटे" असल्याचे खोडून काढले आणि स्पष्ट केले की, "अनेक सोशल मीडिया अकाउंट्सनी असा दावा केला आहे की अमेरिकेने ऑपरेशन 'मिडनाईट हॅमर' दरम्यान इराणविरुद्ध हल्ल्यांसाठी भारतीय एअर स्पेसचा वापर केला होता. हा दावा खोटा आहे."


पीआयबीने अमेरिकेच्या जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल डॅन केन यांच्या पत्रकार परिषदेचा हवाला दिला , ज्यात त्यांनी अमेरिकन विमानांनी घेतलेल्या पर्यायी मार्गांची तपशीलवार माहिती दिली आणि हे सर्व दावे निराधार असल्याचे फेटाळून लावले.





दरम्यान, अमेरिकेने रविवारी (२२ जून) पहाटेच्या सुमारास इराणच्या, फोर्दो, नतांज आणि इस्फहान या तीन अणुकेंद्रांवर हवाई हल्ले केले. यानंतर, इराणची अणु ठिकाणं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. दरम्यान, ज्या कारवाईअंतर्गत इराणवर हा हल्ला करण्यात आला, त्या कारवाईला मिडनाईट हॅमर, असे नाव देण्यात आले होते, अशी माहिती अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिली आहे.


अमेरिकेच्या संरक्षण विभागाने म्हटले आहे, "राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार अमेरिकेने इराणमधील तीन अणुस्थळांवर हल्ला केला. आम्ही इराणी अणुकार्यक्रम उद्ध्वस्त केला. मिडनाईट हॅमर ऑपरेशनअंतर्गत नागरिकांना अथवा इराणी सैनिकांना लक्ष्य करण्यात आले नाही." याच बरोबर, "इराणने अमेरिकेविरुद्ध कोणत्याही प्रकारच्या प्रत्युत्तराचा विचार केला, तर त्याला आणखी कठोर उत्तर दिले जाईल," असा इशाराही अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिला आहे.

Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात