लीड्स: भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना लीड्सच्या हेडिंग्ले क्रिकेट मैदानावर होत आहे. आज सामन्याचा चौथा दिवस आहे. मात्र या दिवसाची सुरूवात चांगली राहिली नाही. सुरूवातीला गिल ८ धावांवरच बाद झाला. टीम इंडियाचे तीन विकेट पडले होते. मात्र यानंतर पंत आणि केएल राहुल यांनी भारताचा डाव सांभाळला. भारताने ऋषभ पंत आणि केएलच्या जबरदस्त भागीदारीच्या जोरावर भारताने दुसऱ्या डावात ३००हून अधिक धावांची आघाडी घेतली आहे.
केएल राहुल आणि करूण नायर खेळत आहेत. पंत ११८ धावा करून बाद झाला तर केएल राहुल शतकी खेळी करून नाबाद आहे. पंतने पहिल्या डावातही शतकी खेळी केली होती. पंतने पहिल्या डावात १३४ धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात पंतने १४० बॉलमध्ये १५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ११८ धावा केल्या.
या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात ४७१ धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव ४६५ धावांवर आटोपला. म्हणजेच पहिल्या डावाच्या आधारावर टीम इंडियाला केवळ ६ धावांची आघाडी मिळाली होती.