ENG vs IND : ११८ धावांची तुफानी खेळी करत ऋषभ पंत झाला बाद, भारताकडे तीनशे पार आघाडी

लीड्स: भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना लीड्सच्या हेडिंग्ले क्रिकेट मैदानावर होत आहे. आज सामन्याचा चौथा दिवस आहे. मात्र या दिवसाची सुरूवात चांगली राहिली नाही. सुरूवातीला गिल ८ धावांवरच बाद झाला. टीम इंडियाचे तीन विकेट पडले होते. मात्र यानंतर पंत आणि केएल राहुल यांनी भारताचा डाव सांभाळला. भारताने ऋषभ पंत आणि केएलच्या जबरदस्त भागीदारीच्या जोरावर भारताने दुसऱ्या डावात ३००हून अधिक धावांची आघाडी घेतली आहे.


केएल राहुल आणि करूण नायर खेळत आहेत. पंत ११८ धावा करून बाद झाला तर केएल राहुल शतकी खेळी करून नाबाद आहे. पंतने पहिल्या डावातही शतकी खेळी केली होती. पंतने पहिल्या डावात १३४ धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात पंतने १४० बॉलमध्ये १५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ११८ धावा केल्या.


या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात ४७१ धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव ४६५ धावांवर आटोपला. म्हणजेच पहिल्या डावाच्या आधारावर टीम इंडियाला केवळ ६ धावांची आघाडी मिळाली होती.

Comments
Add Comment

क्रिकेटच्या 'थाला'ला हाऊसिंग बोर्डाची नोटीस; केवळ १५ दिवसांची मुदत

क्रिकेटचा थाला अशी ओळख असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला झारखंड राज्य गृहनिर्माण

वेस्ट इंडिज-भारताच्या सामन्याचा पावसावर ठरणार निकाल

रन रेटवर ठरणार उपांत्य फेरीचा दावेदार नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर ८ फेरीचे सामने अंतिम टप्प्यात असून

अर्शदीपने मोडला बोल्टचा विक्रम

बुमराहलाही टाकले मागे नवी दिल्ली : भारतीय संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने टी-२० विश्वचषकात आपल्या

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले

मुंबईत कबड्डी स्पर्धांसाठी मैदाने होणार अल्प दरात उपलब्ध

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून