ठाण्यात अवघ्या २० लाखांत स्वप्नातले घर

  57

म्हाडाकडून तब्बल ६२४८ घरांसाठी लॉटरी


ठाणे  : ठाण्यामध्ये घर घेण्याचा विचार करत करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. म्हाडा (महाराष्ट्र हाऊसिंग अ‍ॅण्ड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी) कडून ठाण्यात २० लाख रूपयांच्या आत घर मिळणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी प्रथानमंत्री आवास योजना अंतर्गत घरांच्या किमती ठरवल्या जाणार आहेत. शिरगाव आणि खोनी भागात असणाऱ्या ६२४८ घरांच्या किमतीमध्ये बदल करण्यात आला आहे. फस्ट कम फस्ट सर्व्ह या अंतर्गत ठाण्यामध्ये म्हाडा कोकण बोर्ड ६२४८ घरांची विक्री करणार आहे.


ठाण्यातील शिरगांव येथील म्हाडाच्या ५२३६ घरांच्या सुधारित किंमतीला मान्यता दिली आहे. १९ लाख २८ हजार रूपयांमध्ये घर मिळणार आहे. खोणी येथे १.१२ घरांच्या किंमतीमध्ये १ लाख रूपयांनी कपात करण्यात आली आहे. आता येथील म्हाडाचे घर १९ लाख ११ हजार रूपयांना मिळेल, असे म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल (आयएएस) यांनी सांगितले.


ठाण्यामध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी ही चांगली संधी असेल, असे म्हाडा कोकण बोर्डाच्या अधिकारी रेवती गायकवाड यांनी सांगितले. या योजनेसाठी कोणतीही डेडलाईन नाही, सर्व घरांची विक्री होईपर्यंत ही योजना चालूच राहणार आहे, असेही गायकवाड यांनी सांगितले. प्रत्येकाचं घराचे स्वप्न पूर्ण व्हावं. गरीब आणि मध्यमवर्गीय असणाऱ्यांना फायदा व्हावा, हा म्हाडाचा मुख्य उद्देश आहे, असे म्हाडाच्या अधिकाऱ्याने सांगितले.


म्हाडाच्या नियमांनुसार, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कॅटेगरीमधील लोकांना या घराचा लाभ घेता येऊ शकतो. ६ लाख ते ९ लाख रूपयांच्या घरात कमावणारा प्रत्येकजण एलआयजी श्रेणी अंतर्गत घरासाठी अर्ज करू शकतो. ९ लाख ते १२ लाख रूपयांचे वार्षिक उत्पन्न असणारा प्रत्येकजण एमआयजी अंतर्गत अर्ज करू शकतो. तर १२ लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असणारा प्रत्येकजण एचआयजीसाठी अर्ज करू शकतो.

Comments
Add Comment

उबाठा गटाचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

रामदास कांबळे यांची युवासेना कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती जाहीर ठाणे: मुंबई महानगरपालिकेतील सायन कोळीवाडा

भारत महासत्ता न होण्यासाठी तरुणाईला अंमली पदार्थांच्या आहारी लोटण्याचा परकीय शक्तींचा डाव

आयआरएस समीर वानखेडे यांचे वक्तव्य कल्याण  : ''आपला भारत देश हा महासत्ता होण्याच्या दिशेने अतिशय विश्वासाने आणि

पोलीस अधिकारी संभाजी देशमुख यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदक

कल्याण : पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय कामगीरीमुळे राज्य गुप्त वार्ता विभागातील पोलीस अधिकारी संभाजी देशमुख

ठाणेकरांनो, पाण्याचा जपून वापरा करा

मंगळवारी ८ तास पाणीपुरवठा बंद डोंबिवली  : केडीएमसीच्या कल्याण (पूर्व) परिसरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील

श्रीकृष्णनाथ पांचाळ ठाण्याचे जिल्हाधिकारी

मुंबई : जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची महाराष्ट्र सरकारने बदली केली असून ठाण्याचे

मध्य रेल्वेची ऐन सकाळी ठप्प झालेली वाहतूक सुरळीत, रेल्वे रुळाला तडे गेल्याने नोकरदारांचे झाले हाल

कर्जत: मध्य रेल्वेची लोकल वाहतूक आज सकाळी काही तासांसाठी विस्कळीत झालेली पाहायला मिळाली. पण रेल्वे प्रशासनाच्या