ठाण्यात अवघ्या २० लाखांत स्वप्नातले घर

  63

म्हाडाकडून तब्बल ६२४८ घरांसाठी लॉटरी


ठाणे  : ठाण्यामध्ये घर घेण्याचा विचार करत करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. म्हाडा (महाराष्ट्र हाऊसिंग अ‍ॅण्ड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी) कडून ठाण्यात २० लाख रूपयांच्या आत घर मिळणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी प्रथानमंत्री आवास योजना अंतर्गत घरांच्या किमती ठरवल्या जाणार आहेत. शिरगाव आणि खोनी भागात असणाऱ्या ६२४८ घरांच्या किमतीमध्ये बदल करण्यात आला आहे. फस्ट कम फस्ट सर्व्ह या अंतर्गत ठाण्यामध्ये म्हाडा कोकण बोर्ड ६२४८ घरांची विक्री करणार आहे.


ठाण्यातील शिरगांव येथील म्हाडाच्या ५२३६ घरांच्या सुधारित किंमतीला मान्यता दिली आहे. १९ लाख २८ हजार रूपयांमध्ये घर मिळणार आहे. खोणी येथे १.१२ घरांच्या किंमतीमध्ये १ लाख रूपयांनी कपात करण्यात आली आहे. आता येथील म्हाडाचे घर १९ लाख ११ हजार रूपयांना मिळेल, असे म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल (आयएएस) यांनी सांगितले.


ठाण्यामध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी ही चांगली संधी असेल, असे म्हाडा कोकण बोर्डाच्या अधिकारी रेवती गायकवाड यांनी सांगितले. या योजनेसाठी कोणतीही डेडलाईन नाही, सर्व घरांची विक्री होईपर्यंत ही योजना चालूच राहणार आहे, असेही गायकवाड यांनी सांगितले. प्रत्येकाचं घराचे स्वप्न पूर्ण व्हावं. गरीब आणि मध्यमवर्गीय असणाऱ्यांना फायदा व्हावा, हा म्हाडाचा मुख्य उद्देश आहे, असे म्हाडाच्या अधिकाऱ्याने सांगितले.


म्हाडाच्या नियमांनुसार, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कॅटेगरीमधील लोकांना या घराचा लाभ घेता येऊ शकतो. ६ लाख ते ९ लाख रूपयांच्या घरात कमावणारा प्रत्येकजण एलआयजी श्रेणी अंतर्गत घरासाठी अर्ज करू शकतो. ९ लाख ते १२ लाख रूपयांचे वार्षिक उत्पन्न असणारा प्रत्येकजण एमआयजी अंतर्गत अर्ज करू शकतो. तर १२ लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असणारा प्रत्येकजण एचआयजीसाठी अर्ज करू शकतो.

Comments
Add Comment

ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, नगरसेवक संख्येत वाढ नाहीच, यंदाही 131 नगसेवक

मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून आज ठाणे महानगरपालिकेची

Bhiwandi Accident : भिवंडीत खड्ड्यांनी घेतला डॉक्टरचा बळी; आतापर्यंत जीवघेण्या खड्ड्यामुळे तिघांचे प्राण गेले, जबाबदार कोण?

भिवंडी : भिवंडी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. वंजारपट्टी नाका परिसरात उघडखाबड

ठाण्यात मुसळधार पावसामुळे गणपती कारखान्यात शिरलं पाणी

ठाण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना पावसाचा फटका गणपती मूर्तीला देखील बसला

पावसामुळे ठाण्यात ४ महिन्यांत २० जणांचा बळी!

ठाणे: गेल्या चार महिन्यांत ठाणे जिल्ह्यात पावसामुळे संबंधित घटनांमध्ये किमान २० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुरू केले ‘लाडकी सून’ अभियान

ठाणे: 'लाडकी बहीण' योजनेच्या यशामुळे उत्साहित होऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी

भिवंडीत साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी आला स्पायडरमॅन !

ठाणे : भिवंडीत भाजी मार्केटमध्ये साचलेले पाणी काढण्यासाठी चक्क स्पायडरमॅन आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर