गंगापूर धरणातून विसर्ग वाढला ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नाशिक : नाशिक जिल्ह्यात गेले चार पाच दिवसात पावसाची संततधार कायम असल्याने , जिल्ह्यातील प्रमुख धरणांचा पाणीसाठा जलद गतीने वाढत आहे . पाण्याचा साठा वाढल्याने धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे .

गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने नद्या, नाले दुथडी भरुन वाहत आहे. आज दुपारपासून धरणातून ६,१६० क्युसेक वेगाने धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला आहे . यापूर्वी धरणातून ४ हजार क्यूसेक विसर्ग सुरू होता. धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्यात येईल, अशी माहिती धरण प्रशासनाकडून देण्यात आली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे .

गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली


गंगापूर धरणातून मोठ्या प्रमानात होणाऱ्या विसर्गामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे, रामकुंड परिसरातील पूल आणि छोटी-मोठी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आले आहे. गोदावरी नदीला पुराचा संभाव्य धोका लक्षात घेता, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. स्थानिक आपत्कालीन यंत्रणाही सतर्क ठेवण्यात आल्या आहे.

पेरणीची कामे खोळंबली


ऐन मे महिन्यात शेतीच्या मशागतीच्या वेळी पावसाने हजेरी लावली , मे महिन्यापूर्वी होणारी शेतीची मशागतीची कामे आणि पेरण्या पावसामुळे खोळंबल्या आहेत . शेतीची कामे रखडल्याने आता शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे . पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे . टोमॅटो लागवड व इतर धान्य उत्पादनासाठीच्या कोलमडलेल्या नियोजनातून सावरण्याच्या प्रयत्न शेतकरी करत आहे .
Comments
Add Comment

स्मृती-शफालीची वादळी खेळी

भारताचे श्रीलंकेसमोर २२२ धावांचे विशाल लक्ष्य तिरुवनंतपुरम (वृत्तसंस्था) : भारतीय महिला क्रिकेट संघाने

सोन्याला उत्पन्नाचा स्त्रोत बनवण्याची हीच वेळ आहे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांसाठी, सोने हे फक्त दागिने नसतात तर त्यांच्या भावना त्याच्याशी जोडलेल्या असतात.

भारतातील पेट्रोल पंपांची संख्या १ लाखांवर, ९० टक्के पंप सरकारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत जगातील तिसरा सर्वात मोठा इंधन किरकोळ बाजार बनला आहे. पेट्रोलियम योजना आणि

पॅराग्लायडिंग करताना अपघात, पर्यटकासह दोघे आकाशातून कोसळले, एकाचा मृत्यू

बीर बिलिंग : पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या हिमाचल प्रदेशातील 'बीर बिलिंग'मध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे.

सुपरस्टार थलापती विजयचा राजकारणासाठी फिल्मइंडस्ट्रीला रामराम; माझ्यासाठी महत्वाचे आहे कि....

मुंबई : दक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार थलापती विजयने अभिनय क्षेत्रातून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतला

३० कोटींच्या फसवणूक प्रकरणात विक्रम भट्ट अडचणीत, कोर्टाने जामीन अर्ज पुन्हा फेटाळला

मुंबई : दिग्दर्शक विक्रम भट्ट आणि त्यांची पत्नी श्वेतांबरी भट्ट यांना न्यायालयाकडून पुन्हा एकदा मोठा धक्का बसला