गंगापूर धरणातून विसर्ग वाढला ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नाशिक : नाशिक जिल्ह्यात गेले चार पाच दिवसात पावसाची संततधार कायम असल्याने , जिल्ह्यातील प्रमुख धरणांचा पाणीसाठा जलद गतीने वाढत आहे . पाण्याचा साठा वाढल्याने धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे .

गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने नद्या, नाले दुथडी भरुन वाहत आहे. आज दुपारपासून धरणातून ६,१६० क्युसेक वेगाने धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला आहे . यापूर्वी धरणातून ४ हजार क्यूसेक विसर्ग सुरू होता. धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्यात येईल, अशी माहिती धरण प्रशासनाकडून देण्यात आली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे .

गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली


गंगापूर धरणातून मोठ्या प्रमानात होणाऱ्या विसर्गामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे, रामकुंड परिसरातील पूल आणि छोटी-मोठी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आले आहे. गोदावरी नदीला पुराचा संभाव्य धोका लक्षात घेता, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. स्थानिक आपत्कालीन यंत्रणाही सतर्क ठेवण्यात आल्या आहे.

पेरणीची कामे खोळंबली


ऐन मे महिन्यात शेतीच्या मशागतीच्या वेळी पावसाने हजेरी लावली , मे महिन्यापूर्वी होणारी शेतीची मशागतीची कामे आणि पेरण्या पावसामुळे खोळंबल्या आहेत . शेतीची कामे रखडल्याने आता शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे . पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे . टोमॅटो लागवड व इतर धान्य उत्पादनासाठीच्या कोलमडलेल्या नियोजनातून सावरण्याच्या प्रयत्न शेतकरी करत आहे .
Comments
Add Comment

मच्छिमारांसाठी पॅकेजची मागणी

श्रीवर्धन : पाच महिने उलटूनही समुद्र शांत नसल्याने रायगडातील मच्छिमारांचा मत्स्यहंगाम मंदावलेला असून सलग

‘बिबट्या कसा पकडायचा?’ ऑस्ट्रेलियन तज्ज्ञांचा पुण्यात मास्टरक्लास

पुणे : पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मानव-बिबटयामधील संघर्ष टिपेला पोहोचला आहे. मोकाट फिरण्याऱ्या बिबट्याचा शोध

'जिजामाता नगरवासियांच्या पुनर्वसनाचा विषय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडणार'

मुंबई :  मागील तीस वर्षांपासून काळाचौकी येथील जिजामाता नगरवासियांचे पुनर्वसन विकासकाच्या आडमुठेपणाच्या

म्युझिकल नाईटमध्ये ‘वध 2’ स्टार्सची झगमगती एन्ट्री

संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांनी वाढवली म्युझिकल इव्हेंटची शोभा ‘वध 2’, ज्यात नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांची

Anil Ambani ED Case | अनिल अंबानी पुन्हा एकदा अडचणीत; EDकडून आणखी ११२० कोटींची मालमत्ता जप्त

मुंबई : उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. येस बँक घोटाळा त्यांना भोवला आहे. रिलायन्स होम

Operation Sagar Bandhu | ‘ऑपरेशन सागर बंधू’ जोरात; श्रीलंकेत भारताचे मदतकार्य वेगाने सुरू

नवी दिल्ली : श्रीलंकेत चक्रीवादळ ‘दितवाह’मुळे मोठ्या प्रमाणात विनाश झाला . मुसळधार पावसाने आणि भूस्खलनामुळे