Nitesh Rane : 'तुमच्या दररोज वर येणाऱ्या गॅस सिलेंडरवर बोला'...अबू आझमींच्या वक्तव्यावरुन मंत्री नितेश राणेंचा टोला

आम्ही उद्या हज यात्रेवर प्रश्न उपस्थित केला तर? - मंत्री नितेश राणे


सिंधुदुर्ग : भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी अबू आझमींनी वारीच्या पालख्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून संताप व्यक्त केला आहे. राज्यातील हिंदी भाषेच्या शाळेतील बहुपर्यायी निर्णयावरुन आपली भूमिका मांडली. तसेच, समाजवादी पक्षाचे प्रमुख आमदार अबू आझमी यांनी वारीसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन जोरदार टीका देखील केली. पालख्यांमुळे वाहतूक कोंडी होते, पण आम्ही तक्रार करत नाही असे म्हणत अबू आझमी (Abu azami) यांनी पंढरीच्या वारीतील पालखीचा आणि रस्त्यावरील नमान पठणाचा संबंध जोडला होता. त्यावरुन, आता वाद निर्माण होत असून अबू आझमींच्या वक्तव्यावरुन त्यांच्यावर सगळीकडून टीका होत आहे. मंत्री नितेश राणेंनी देखील अबू आझमींवर चांगलाच पलटवार करत, आम्ही हज यात्रेवर प्रश्न उपस्थित केले तर? असे म्हटले आहे.




हिंदू राष्ट्राला तोडण्याचे प्रयत्न


आपल्या हिंदू राष्ट्राला तोडण्याचे फार मोठे षडयंत्र आहे. इस्लामिक राष्ट्र बनविण्याचे मनसुबे आखले जातं आहेत त्याला आपण खत पाणी टाकतोय का? आमच्या सरकारने हिंदी सक्ती केलेली नाही, पण मराठी सक्ती निश्चित आहे. हिंदी नको असेल तर संस्कृत घ्या पण हिंदू राष्ट्राला तोडण्याचे प्रयत्न होत असतील. तर इस्लामिक राष्ट्र बनविण्याच्या प्रयत्नाला तुम्ही हातभर लावताय का याचा विचार करुन आंदोलन करावं, अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरुन होत असलेल्या आंदोलनावर दिली आहे. हिंदूंमध्ये भांडण म्हणजे जिहाद्यांना मदत असल्याचंही त्यांनी म्हटलं.




वारी वर बोलण्याची हिमंत कोणी करू नये


वारीच्या पालख्यांसंदर्भात अबू आझमींनी केलेल्या वक्तव्यावरूनही राणेंनी संताप व्यक्त केला. दर शुक्रवारी जे गॅस सिलेंडर वरती येतात त्यावर आझमी सारखे कारटे काहीच बोलताना दिसत नाही. आमच्या महाकुंभवर, आमची वारी सुरू झाली तर त्यावर आक्षेप घ्यायचा. आमची वारी वर्षभर असत नाही पण तुमच्या दररोज वर येणाऱ्या गॅस सिलेंडरवर बोला, त्यावर अबू आझमीने आपलं थोबाड उघडावं, अशा शब्दात नितेश राणेंनी अबू आझमीच्या वक्तव्यावरुन चांगलाच पलटवार केला आहे. तसेच, हे आम्ही इथे खपवून घेणार नाही, आम्ही उद्या हज यात्रेवर प्रश्न उपस्थित केला तर चालेल का? असा सवालही नितेश राणेंनी उपस्थित केला. तर, वारी वर बोलण्याची हिमंत कोणी करू नये, आमची वारी अशीच सुरु राहणार असल्याचेही मंत्री नितेश राणेंनी म्हटलंय.



संजय राऊतच मोठे गद्दार


सर्वात मोठा गद्दार म्हणजे संजय राऊत आहे. यावर पुस्तक लिहिण्याची गरज आहे. उबाठा (शिवसेना) आणि उद्धव ठाकरेंची जी अवस्था झालीय, त्याला संजय राजाराम राऊतच जबाबदार आहे. राऊताने स्वतःला आरशात पहावं आणि मग आरोप करावे, अशा शब्दात मंत्री राणेंनी संजय राऊतांवरही जोरदार टीका केली.

Comments
Add Comment

Anant Ambani : हिप्पोंना मारु नका, वनतारामध्ये पाठवा; अनंत अंबानी यांची कोलंबिया सरकारला विनंती

मुंबई : उद्योगपती अनंत अंबानी यांचे प्राणीप्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात

Mumbai News : मुंबईत पाण्याचा निचरा करण्यासाठी ५४७ पंपांची आणि फिरते डीवॉटरिंग पंप असणाऱ्या १० वाहनांची व्यवस्था

मुंबईत यंदा पाणी साचण्याची फक्त ८० ठिकाणे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची

BMC News : 'मध्य वैतरणा प्रकल्प राबवताना तुमचे पर्यावरण प्रेम कुठे होते?'

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने गारगाई पाणी प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी स्थायी समिती व महापालिका

single-window clearance : लाईव्ह इव्हेंट्स परवानगीसाठी ‘एक खिडकी’ सुविधा

मुंबई : राज्यातील लाईव्ह मनोरंजन क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लाईव्ह

Godavari to Narmada : असा होणार गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचा समारोप समारंभ

मुंबई : जलव्यवस्थापन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि जनसहभागातून प्रभावी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या

Seeds Act : राज्याचा स्वतंत्र बियाणे कायदा करणार

मुंबई : शेतकऱ्यांना स्वतःचे बियाणे साठवणे, वापरणे, देवाणघेवाण करणे आणि (ब्रँडेड नाव न वापरता) विक्री करण्यास