Nitesh Rane : 'तुमच्या दररोज वर येणाऱ्या गॅस सिलेंडरवर बोला'...अबू आझमींच्या वक्तव्यावरुन मंत्री नितेश राणेंचा टोला

आम्ही उद्या हज यात्रेवर प्रश्न उपस्थित केला तर? - मंत्री नितेश राणे


सिंधुदुर्ग : भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी अबू आझमींनी वारीच्या पालख्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून संताप व्यक्त केला आहे. राज्यातील हिंदी भाषेच्या शाळेतील बहुपर्यायी निर्णयावरुन आपली भूमिका मांडली. तसेच, समाजवादी पक्षाचे प्रमुख आमदार अबू आझमी यांनी वारीसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन जोरदार टीका देखील केली. पालख्यांमुळे वाहतूक कोंडी होते, पण आम्ही तक्रार करत नाही असे म्हणत अबू आझमी (Abu azami) यांनी पंढरीच्या वारीतील पालखीचा आणि रस्त्यावरील नमान पठणाचा संबंध जोडला होता. त्यावरुन, आता वाद निर्माण होत असून अबू आझमींच्या वक्तव्यावरुन त्यांच्यावर सगळीकडून टीका होत आहे. मंत्री नितेश राणेंनी देखील अबू आझमींवर चांगलाच पलटवार करत, आम्ही हज यात्रेवर प्रश्न उपस्थित केले तर? असे म्हटले आहे.




हिंदू राष्ट्राला तोडण्याचे प्रयत्न


आपल्या हिंदू राष्ट्राला तोडण्याचे फार मोठे षडयंत्र आहे. इस्लामिक राष्ट्र बनविण्याचे मनसुबे आखले जातं आहेत त्याला आपण खत पाणी टाकतोय का? आमच्या सरकारने हिंदी सक्ती केलेली नाही, पण मराठी सक्ती निश्चित आहे. हिंदी नको असेल तर संस्कृत घ्या पण हिंदू राष्ट्राला तोडण्याचे प्रयत्न होत असतील. तर इस्लामिक राष्ट्र बनविण्याच्या प्रयत्नाला तुम्ही हातभर लावताय का याचा विचार करुन आंदोलन करावं, अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरुन होत असलेल्या आंदोलनावर दिली आहे. हिंदूंमध्ये भांडण म्हणजे जिहाद्यांना मदत असल्याचंही त्यांनी म्हटलं.




वारी वर बोलण्याची हिमंत कोणी करू नये


वारीच्या पालख्यांसंदर्भात अबू आझमींनी केलेल्या वक्तव्यावरूनही राणेंनी संताप व्यक्त केला. दर शुक्रवारी जे गॅस सिलेंडर वरती येतात त्यावर आझमी सारखे कारटे काहीच बोलताना दिसत नाही. आमच्या महाकुंभवर, आमची वारी सुरू झाली तर त्यावर आक्षेप घ्यायचा. आमची वारी वर्षभर असत नाही पण तुमच्या दररोज वर येणाऱ्या गॅस सिलेंडरवर बोला, त्यावर अबू आझमीने आपलं थोबाड उघडावं, अशा शब्दात नितेश राणेंनी अबू आझमीच्या वक्तव्यावरुन चांगलाच पलटवार केला आहे. तसेच, हे आम्ही इथे खपवून घेणार नाही, आम्ही उद्या हज यात्रेवर प्रश्न उपस्थित केला तर चालेल का? असा सवालही नितेश राणेंनी उपस्थित केला. तर, वारी वर बोलण्याची हिमंत कोणी करू नये, आमची वारी अशीच सुरु राहणार असल्याचेही मंत्री नितेश राणेंनी म्हटलंय.



संजय राऊतच मोठे गद्दार


सर्वात मोठा गद्दार म्हणजे संजय राऊत आहे. यावर पुस्तक लिहिण्याची गरज आहे. उबाठा (शिवसेना) आणि उद्धव ठाकरेंची जी अवस्था झालीय, त्याला संजय राजाराम राऊतच जबाबदार आहे. राऊताने स्वतःला आरशात पहावं आणि मग आरोप करावे, अशा शब्दात मंत्री राणेंनी संजय राऊतांवरही जोरदार टीका केली.

Comments
Add Comment

Rohit Sharma - Ravi Shastri : 'रोहितने आपल्या खेळीतून टीकाकारांच्या गालावर चपराक लगावली!' – लॉर्ड्समधील शतकानंतर रवी शास्त्रींची रोखठोक प्रतिक्रिया

मुंबई : इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स कसोटीत रोहित शर्माने (Rohit Sharma) खेळलेल्या १३८ धावांच्या शानदार शतकी खेळीनंतर भारतीय

Kuldeep Yadav : भारतीय संघाच स्थान नाही, शेवटी कुलदीपने घेतला मोठा निर्णय; आता 'या' देशासाठी खेळणार...

मुंबई : भारतीय फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) यॉर्कशायर काउंटी क्लबसोबत करार केला. तो या हंगामात संघासाठी आठ

Babasaheb Patil : अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची घोषणा; ६ जिल्ह्यातील ५०० शेतकऱ्यांचे कर्ज माफ मुंबई (Mumbai): राज्याचे माजी

BJP vs CONGRESS in MUMBAI : मुंबईत भाजप आणि काँग्रेसची एकमेकांविरोधात आंदोलने; अमित साटम यांचे नेतृत्व

काँग्रेसच्या आंदोलनात वडेट्टीवार आणि सपकाळ सहभागी https://prahaar.in/2026/07/22/inducted-into-the-indian-navy-the-indigenous-anti-submarine-warfare-vessel-malvan-now-joins-the-navys-fleet/ मुंबई :

Ahilyanagar Crime News : खंडणीप्रकरणी पोलीस हवालदार निलंबित, जिल्ह्यात खळबळ

Ahilyanagar Crime News : अहिल्यानगर जिल्ह्यातील एका हवालदारावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शेअर मार्केट घोटाळाप्रकरणी

INS Malvan : भारतीय नौदलाची ताकद वाढली; नौदलाच्या ताफ्यात आता स्वदेशी पाणबुडीविरोधी युद्धनौका 'मालवण' दाखल

- नौदलाची सागरी सुरक्षा आणि पाणबुडीविरोधी क्षमता होणार आणखी बळकट नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात आणखी