तसेच एसटी महामंडळाची मालवाहतूक सेवा सुरु झाल्यानंतर गोदामे उभारण्याचा निर्णय महामंडळाने घेतला होता. त्यामुळे महामंडळाने ३०० हून अधिक जाग्याची पाहणी केली. २०१९ मध्ये आंब्यांच्या सिझनमध्ये पेट्यांची वाहतूक सुरु केली होती. त्यामुळे एसटी महामंडळाला जास्त फायदा होऊ शकतो असा विश्वास व्यक्त करण्यात आला होता.
त्याचबरोबर २०२१ - २०२२ दरम्यान एसटी मालवाहतूकीची आर्थिक स्थिती बऱ्यापैकी होती. मात्र मे २०२४ मध्ये साधारणपणे १.५० कोटीचा महसूल मिळवणाऱ्या मालवाहतुकीला २०२५ मध्ये केवळ ४८००० हजार रुपयांचा फायदा झाला. एसटी महामंडळाला आर्थिक स्थितीची नुकासान पाहता गोदाम उभारण्यात येणार नाही. यापूर्वी महामंडळाने ७२ जागांची निश्चिती केली होती. असं एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.तसेच २०२० मध्ये ५ लाख टन मालवाहतूक सेवा पुरवून ३७ कोटी एसटीने कमवले होते. सन २०२९ ते २०२१ च्या कालावधीत शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून मालवाहतूकीला चांगला प्रतिसाद मिळाला होता.