बाबा वेंगाच्या भीतीने जपान हादरले, पर्यटकांनी बुकिंग केली रद्द

टोकियो : जपानमध्ये आता एक मोठ संकट येण्याच्या बातमीने संपूर्ण देशात भीतीचे वातावरण पसरले आहे . बुलगेरीयचे प्रसिद्ध ज्योतिषी बाबा वेंगा यांनी दिनांक ५ जुलैला जपानमध्ये मोठे संकट येण्याचे भाकीत व्यक्त केले आहे. ज्याचा परिणाम जपानमधील पर्यटनावर झालेला दिसत आहे , जपानमधील ८० टक्क्यांपेक्षा जास्त पर्यटकांनी त्यांच्या बुकिंग्स रद्द केल्या आहेत .



बाबा वेंगाच्या भविष्यवाणीने पर्यटक का करत आहेत बुकिंग रद्द?
बाबा वेंगा हे एक प्रसिद्ध ज्योतिषी आहेत , यांनी आतापर्यंत अनेक भाकीतं केली आहेत . विशेष म्हणजे यातील काही भाकीतं खरी देखील झाली आहेत ,त्यांच्या भाकीतानुसार जपानमध्ये एक मोठी नैसर्गिक आपत्ती येणार आहे . पण ती आपत्ती काय असेल हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही. बाबा वेंगा यांनी हे भाकीत प्रत्यक्ष जारी केले नसले तरी त्यांचे काही शिष्य ही बातमी वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पसरवत आहेत . त्यामुळे जपानमध्ये येणाऱ्या पर्यंटकांमध्ये भीती पसरली आहे, आणि याच भीतीपोटी अनेक पर्यंटकांनी जपानमध्ये येण्यासाठी केलेले बुकिंग रद्द केले आहे .


सोशल मीडियावरही जोरदार चर्चा
सोशल मीडियावर बाबा वेंगाचे हे भाकीत आता मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे , वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर युजर्स याबाबत पोस्ट शेअर करत आहे . सोशल मीडियावरील अशा पोस्ट्समुळे भीतीचे वातावरण आणखी वाढत आहे.


जपान सरकार काय म्हणाले ?
जपान सरकारने या भविष्यवाणीला अफवा म्हणून फेटाळून लावले आहे आणि नागरिकांना घाबरू नये असे आवाहन केले आहे. जपानच्या हवामान आणि भूकंप संशोधन संस्थेने स्पष्ट केले आहे की, भूकंप किंवा इतर नैसर्गिक आपत्तींची भविष्यवाणी करणे वैज्ञानिकदृष्ट्या शक्य नाही. सरकारने पर्यटकांना सुरक्षित प्रवासाची हमी दिली आहे आणि स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.


बाबा वेंगाची आतापर्यंतची भाकिते
बाबा वेंगा यांनी ९/११ च्या हल्ल्यापासून ते चेर्नोबिल आपत्तीपर्यंत अनेक घटनांची भविष्यवाणी केल्याचा दावा केला जातो. त्यांच्या काही भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या असल्या, तरी अनेक तज्ज्ञ या भविष्यवाण्यांना संदिग्ध मानतात. बाबा वेंगाच्या अनुयायांचा असा विश्वास आहे की त्यांच्या भविष्यवाण्या ८५ टक्के खऱ्या ठरतात. मात्र, तज्ञांचा गट याला केवळ एक योगायोग मानत आहे.


तज्ज्ञांचे मत काय ?
भूकंपतज्ज्ञ आणि वैज्ञानिकांनी बाबा वेंगाच्या भविष्यवाणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की जपान हा भूकंपप्रवण क्षेत्रात येतो आणि तिथे सतत लहान-मोठे भूकंप होतच असतात. मात्र, विशिष्ट तारखेला मोठी आपत्ती येण्याचा दावा अवैज्ञानिक आहे. जपानमधील भूकंप संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. हिरोशी सातो यांनी सांगितले, “आम्ही सतत भूकंपीय हालचालींवर लक्ष ठेवतो आणि सध्या कोणतीही असामान्य गतिविधी दिसलेली नाही.”


पर्यटन उद्योगावर मोठा परिणाम
जपानचा पर्यटन उद्योग हा अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. २०२४ मध्ये जपानने सुमारे ३ कोटी परदेशी पर्यटकांचे स्वागत केले होते, २०२५ मध्ये हा आकडा वाढण्याची अपेक्षा होती. मात्र, या भविष्यवाणीमुळे पर्यटकांमध्ये घसरण झालेली पाहायला मिळत आहे, ज्यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि स्थानिक व्यवसायांना मोठा फटका बसला आहे. काही टूर ऑपरेटर्सनी सांगितले की, हजारो पर्यटकांनी बुकिंग रद्द केल्यामुळे त्यांचे लाखो डॉलर्सचे नुकसान झाले आहे.

Comments
Add Comment

Ukraine's attack on Russia : रशियाच्या हृदयावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला! मॉस्कोवर ड्रोनचा वर्षाव, तेल शुद्धीकरण प्रकल्पाला मोठे नुकसान

रशिया-युक्रेन युद्धाला चार वर्षांहून अधिक काळ उलटल्यानंतर युक्रेनने मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन

Donald Trump vs Giorgia Meloni : डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर जॉर्जिया मेलोनी यांचे सडेतोड प्रत्युत्तर; "माझी लोकप्रियता तुमच्यावर अवलंबून नाही"

अमेरिकेचे अध्यक्ष (US President) डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी फ्रान्समध्ये झालेल्या जी-7 (G7 Summit) परिषदेदरम्यान इटलीच्या

काँगोमध्ये इबोलाचा कहर: ८९६ बाधित, २३२ जणांचा मृत्यू

युगांडाला यूएनकडून ४ दशलक्ष डॉलर्सची मदत किंशासा : डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (डीआरसी)मध्ये इबोला विषाणूचा

Pakisthan : पाकिस्तानामध्ये दोन बॉम्बस्फोट, ७ ठार तर अनेक जखमी

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या (Pakisthan)अशांत खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बन्नू जिल्ह्यात शनिवारी रस्त्याच्या कडेला

PM Narendra Modi : भारत-फ्रान्स संबंध अधिक मजबूत; पॅरिसमध्ये PM मोदींचे मोठे वक्तव्य

पॅरिस : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी फ्रान्स (France) दौऱ्यादरम्यान पॅरिस (Paris) येथे भारतीय समुदायाशी संवाद

Pakistan Take Action In Bay of Bengal : चीनच्या मदतीने ५५ वर्षांनंतर बंगालच्या खाडीत पाकिस्तानची पुनरागमनाची तयारी; भारताची चिंता वाढणार?

इस्लामाबाद : १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील पराभवानंतर बंगालच्या खाडीतून जवळपास पूर्णपणे माघार घेतलेल्या