इंग्लंड विरुद्ध पहिल्या डावात ४७१ धावा करुनही भारताच्या नावावर लाजीरवाणा विक्रम

  52

लीड्स : भारताने इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात सर्वबाद ४७१ धावा केल्या. यानंतर इंग्लंडने तीन बाद २०९ धावा केल्या. इंग्लंडचा संघ फलंदाजी करत आहे. आतापर्यंत दोन दिवसांचा खेळ झाला आहे. काही तासांतच तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होईल आणि इंग्लंडचे फलंदाज मैदानात पुन्हा येतील. पण याआधी भारताविषयी एक नवी आकडेवारी समोर आली आहे.

इंग्लंड विरुद्ध पहिल्या डावात ४७१ धावा करुनही भारताच्या नावावर लाजीरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. एका डावात तीन फलंदाजांनी शतके केल्यानंतरची संघांची एकूण धावसंख्या या श्रेणीत भारताने तळाचे स्थान मिळवले.



तीन खेळाडूंनी शतके केल्यानंतर सर्वात कमी धावसंख्येत सर्वबाद झालेला संघ

  1. ४७१ भारत विरुद्ध इंग्लंड, हेडिंग्ले २०२५

  2. ४७५ दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, सेंच्युरियन २०१६

  3. ४९४ ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, हेडिंग्ले १९२४

  4. ४९७ वेस्ट इंडिज विरुद्ध भारत, कोलकाता २००२


भारत पहिल्या डावात सर्वबाद ४७१ धावा

टीम इंडियाकडून सलामीवीर यशस्वी जयस्वाल (१०१ धावा), कर्णधार शुभमन गिल (१४७ धावा) आणि यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (१३४ धावा) या तिघांनी शतके केली. केएल राहुलने ४२ आणि रवींद्र जडेजाने ११ धावांचे योगदान दिले. मोहम्मद सिराज तीन धावा करुन नाबाद राहिला तर शार्दुल ठाकूर आणि प्रसिद्ध कृष्णा या दोघांनी प्रत्येकी एक धाव काढली. साई सुदर्शन, करुण नायर आणि जसप्रीत बुमराह हे तिघे शून्यावर बाद झाले. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने चार जणांना बाद केले. जोश टंगनेही चार जणांना बाद करत त्याला उत्तम साथ दिली. शोएब बशीर आणि ब्रायडन कार्से या दोघांनी प्रत्येकी एक बळी घेतला. भारताने पहिल्या डावात सर्वबाद ४७१ धावा केल्या.
Comments
Add Comment

लीड्स कसोटीत दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंड पिछाडीवर

लीड्स : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हेडिंग्ले लीड्स येथे सुरू

IND vs ENG: तीन फलंदाजांची शतके, तरीही टीम इंडियाच्या नावे लाजिरवाणा विक्रम!

टीम इंडिया ४७१ धावांवर सर्वबाद, कसोटी इतिहासातील सर्वात कमी ऑलआउट धावसंख्या लंडन: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG First Test Match)

IND vs ENG: ऋषभ पंतने शतक ठोकून रचला 'महाविक्रम', धोनी-साहाला टाकले मागे

लीड्स: भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात ऋषभ पंत (Rishabh Pant)ने आणखी एक शानदार शतक

भारताने पाडला धावांचा पाऊस, तीन फलंदाजांची शतकी खेळी

लीड्स : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हेडिंग्ले लीड्स येथे सुरू आहे.

BCCI च्या वय पडताळणी प्रक्रियेत बदल

मुंबई : ज्युनियर क्रिकेटमध्ये वयाची फसवणूक रोखण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या वय पडताळणी कार्यक्रमात भारतीय

शुभमन गिलवर होणार दंडात्मक कारवाई

लीड्स : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हेडिंग्ले लीड्स येथे सुरू आहे.