इंग्लंड विरुद्ध पहिल्या डावात ४७१ धावा करुनही भारताच्या नावावर लाजीरवाणा विक्रम

लीड्स : भारताने इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात सर्वबाद ४७१ धावा केल्या. यानंतर इंग्लंडने तीन बाद २०९ धावा केल्या. इंग्लंडचा संघ फलंदाजी करत आहे. आतापर्यंत दोन दिवसांचा खेळ झाला आहे. काही तासांतच तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होईल आणि इंग्लंडचे फलंदाज मैदानात पुन्हा येतील. पण याआधी भारताविषयी एक नवी आकडेवारी समोर आली आहे.

इंग्लंड विरुद्ध पहिल्या डावात ४७१ धावा करुनही भारताच्या नावावर लाजीरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. एका डावात तीन फलंदाजांनी शतके केल्यानंतरची संघांची एकूण धावसंख्या या श्रेणीत भारताने तळाचे स्थान मिळवले.



तीन खेळाडूंनी शतके केल्यानंतर सर्वात कमी धावसंख्येत सर्वबाद झालेला संघ

  1. ४७१ भारत विरुद्ध इंग्लंड, हेडिंग्ले २०२५

  2. ४७५ दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, सेंच्युरियन २०१६

  3. ४९४ ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, हेडिंग्ले १९२४

  4. ४९७ वेस्ट इंडिज विरुद्ध भारत, कोलकाता २००२


भारत पहिल्या डावात सर्वबाद ४७१ धावा

टीम इंडियाकडून सलामीवीर यशस्वी जयस्वाल (१०१ धावा), कर्णधार शुभमन गिल (१४७ धावा) आणि यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (१३४ धावा) या तिघांनी शतके केली. केएल राहुलने ४२ आणि रवींद्र जडेजाने ११ धावांचे योगदान दिले. मोहम्मद सिराज तीन धावा करुन नाबाद राहिला तर शार्दुल ठाकूर आणि प्रसिद्ध कृष्णा या दोघांनी प्रत्येकी एक धाव काढली. साई सुदर्शन, करुण नायर आणि जसप्रीत बुमराह हे तिघे शून्यावर बाद झाले. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने चार जणांना बाद केले. जोश टंगनेही चार जणांना बाद करत त्याला उत्तम साथ दिली. शोएब बशीर आणि ब्रायडन कार्से या दोघांनी प्रत्येकी एक बळी घेतला. भारताने पहिल्या डावात सर्वबाद ४७१ धावा केल्या.
Comments
Add Comment

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

भारत – ऑस्ट्रेलिया T20 थरार सुरू: पहिला सामना २९ ऑक्टोबरला!

Ind vs AUS T20 : दिवाळीनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघांच्या चाहत्यांचे लक्ष आता T20 क्रिकेटवर वळले आहे. २९ ऑक्टोबर

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.