इंग्लंड विरुद्ध पहिल्या डावात ४७१ धावा करुनही भारताच्या नावावर लाजीरवाणा विक्रम

लीड्स : भारताने इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात सर्वबाद ४७१ धावा केल्या. यानंतर इंग्लंडने तीन बाद २०९ धावा केल्या. इंग्लंडचा संघ फलंदाजी करत आहे. आतापर्यंत दोन दिवसांचा खेळ झाला आहे. काही तासांतच तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होईल आणि इंग्लंडचे फलंदाज मैदानात पुन्हा येतील. पण याआधी भारताविषयी एक नवी आकडेवारी समोर आली आहे.

इंग्लंड विरुद्ध पहिल्या डावात ४७१ धावा करुनही भारताच्या नावावर लाजीरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. एका डावात तीन फलंदाजांनी शतके केल्यानंतरची संघांची एकूण धावसंख्या या श्रेणीत भारताने तळाचे स्थान मिळवले.



तीन खेळाडूंनी शतके केल्यानंतर सर्वात कमी धावसंख्येत सर्वबाद झालेला संघ

  1. ४७१ भारत विरुद्ध इंग्लंड, हेडिंग्ले २०२५

  2. ४७५ दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, सेंच्युरियन २०१६

  3. ४९४ ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, हेडिंग्ले १९२४

  4. ४९७ वेस्ट इंडिज विरुद्ध भारत, कोलकाता २००२


भारत पहिल्या डावात सर्वबाद ४७१ धावा

टीम इंडियाकडून सलामीवीर यशस्वी जयस्वाल (१०१ धावा), कर्णधार शुभमन गिल (१४७ धावा) आणि यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (१३४ धावा) या तिघांनी शतके केली. केएल राहुलने ४२ आणि रवींद्र जडेजाने ११ धावांचे योगदान दिले. मोहम्मद सिराज तीन धावा करुन नाबाद राहिला तर शार्दुल ठाकूर आणि प्रसिद्ध कृष्णा या दोघांनी प्रत्येकी एक धाव काढली. साई सुदर्शन, करुण नायर आणि जसप्रीत बुमराह हे तिघे शून्यावर बाद झाले. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने चार जणांना बाद केले. जोश टंगनेही चार जणांना बाद करत त्याला उत्तम साथ दिली. शोएब बशीर आणि ब्रायडन कार्से या दोघांनी प्रत्येकी एक बळी घेतला. भारताने पहिल्या डावात सर्वबाद ४७१ धावा केल्या.
Comments
Add Comment

भारत विरुद्ध द. आफ्रिका टी-२० चा रणसंग्राम!

‘कटक’मध्ये पहिला सामना; ‘अहमदाबाद’मध्ये अंतिम लढत मुंबई : के. एल राहुलच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय मालिकेत

Smruti Mandhana | अखेर स्मृतीने मौन सोडले, पलाशसोबत लग्न न करण्याचा निर्णय!

मुंबई: मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या स्मृती आणि पलाशच्या लग्नाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. स्मृतीने

टीम इंडिया 'यशस्वी', रो'Hit' चा विक्रम, विशाखापट्टणममध्ये भारताने साजरा केला मालिका विजय

विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विशाखापट्टणम येथे झालेला निर्णायक एकदिवसीय सामना भारताने

भारताने दक्षिण आफ्रिकेचा डाव ४८ व्या षटकात गुंडाळला, जिंकण्यासाठी हव्या २७१ धावा

विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विशाखापट्टणम येथे निर्णायक एकदिवसीय सामना सुरू आहे. हा सामना

आयपीएलमध्ये विदेशी खेळाडूंना मिळणार केवळ १८ कोटीच!

लिलावापूर्वीच बीसीसीआयच्या नियमांचा अनेक खेळाडूंना फटका मुंबई  : आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावाची सध्या तयारी

इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची विराटला ७ वर्षांनी संधी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना ६ डिसेंबर