महापालिकेच्या शाळांमध्ये १० संगणक प्रयोगशाळांचे लोकार्पण

  53

डिजिटल साक्षरतेच्या दिशेने फाऊंडेशनचे महत्त्वपूर्ण पाऊल


मुंबई  : मुंबई स्थित स्नेह आशा फाऊंडेशनतर्फे डिजिटल साक्षरतेच्या दिशेने महत्वाचे पाऊल उचलत बृहन्मुंबई महानगरपालिका आणि ठाणे महापालिकाक्षेत्रातील विविध शाळांमध्ये १० अद्ययावत संगणक प्रयोगशाळांचे उद्घाटन करण्यात आले. तसेच या प्रसंगी संस्थेतर्फे शिष्यवृत्ती योजनेच्या तिसऱ्या बॅचमध्ये निवड झालेल्या १२ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आज करण्यात आला.


वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांमध्ये महाराष्ट्र राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री आशीष शेलार, अभिनेता सलमान खान, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, उद्योजक निरंजन हिरानंदानी, एमसीजीएमचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी, व बांधकाम व्यावसायिक बोमन ईरानी आदी उपस्थित होते. त्याचबरोबर यामध्ये शासकीय अधिकारी, शिक्षण तज्ज्ञ, कॉर्पोरेट क्षेत्रातील पदाधिकारी, देणगीदार, समाजसेवक व नामवंत व्यक्तींचा मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


स्नेहआशा संस्थेच्या डिजिटल साक्षरता कार्यक्रमाच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या या संगणक प्रयोगशाळांमध्ये एकूण ६००हून अधिक उच्च-क्षमता संगणक बसवण्यात आले असून या उपक्रमाचा ६ वी ते १० वी इयत्तांमधील १५,००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना थेट लाभ होणार आहे. संगणक साक्षरता, कोडिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा विश्लेषण यासारख्या आधुनिक कौशल्यांचे प्रशिक्षण या माध्यमातून दिले जाणार आहे.


या कार्यक्रमात शिष्यवृत्ती योजनेच्या तिसऱ्या बॅच अंतर्गत निवड झालेल्या १२ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सदर योजना ‘सरस्वती’, ‘शक्ती’ आणि ‘लक्ष्मी’ अशा तीन उपघटकांमध्ये कार्यान्वित असून विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, मार्गदर्शन, संगणक साहित्य, कोचिंग व करिअर सल्ला यांचा समावेश असलेले व्यापक पाठबळ पुरवले जाते."समाजातील शेवटच्या घटकापर्यंत डिजिटल ज्ञान पोहोचवण्यासाठी स्थापन केलेली संस्था ही केवळ करिअरची संधी नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि आत्मभान जागवणारे माध्यम ठरणार आहे.


Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही