ENG vs IND: तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा डाव ४६५ धावांवर आटोपला, भारत २ बाद ९६ धावांवर

  780

लीड्स: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या लीड्स कसोटीचा तिसरा दिवस भारताच्या नावावर राहिला. पहिल्यांदा टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडचा पहिला डाव ४६५ धावांवर रोखला आणि ६ धावांनी आघाडी घेतली. यानंतर भारताने तिसऱ्या दिवशी २ बाद ९० धावा केल्या आहेत. यशस्वी जायसवाल ४ आणि साई सुदर्शन ३० धावा करून बाद झाले.

भारतीय संघाने शुभमन गिल, ऋषभ पंत आणि यशस्वी जायसवाल यांच्या शतकांच्या मदतीने पहिल्या डावात ४७१ धावा केल्या होत्या. याचे प्रत्युत्तर देण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडचा पहिला डाव ४६५ धावांवर आटोपला.

भारताचा दुसरा डाव आतापर्यंत


पहिल्या डावातील ६ धावांच्या आघाडीनंतर केएल राहुल आणि यशस्वीची जोडी मैदानावर पोहोचली. मात्र टीम इंडियाच्या दुसऱ्या डावाची सुरूवात चांगली राहिली नाही. १६ धावांवर भारताला पहिला झटका बसला. सलामीवीर यशस्वी जायसवाल ४ धावा करून बाद झाला. यानंतर साई सुदर्शन आणि केएल राहुल यांच्यात चांगली भागीदारी झाली. दोघांनी ६५हून अधिक धावा केल्या. मात्र साई सुदर्शन ३० धावा करून बाद झाला. मात्र दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने ९६ धावांची आघाडी घेतली होती. केएल राहुल ४७ तर शुभमन ६ धावांवर खेळत आहेत.
Comments
Add Comment

देशातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम बंगळुरूमध्ये उभारले जाणार

बंगळुरू: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बंगळुरूमधील बोम्मासंद्राच्या सूर्या सिटीमध्ये एक भव्य

संजू सॅमसन राजस्थान रॉयल्समधून बाहेर पडणार?

चेन्नईकडून खेळण्याची शक्यता, अश्विनही संघातून बाहेर पडण्याच्या विचारात चेन्नई  : संजू सॅमसनने राजस्थान

'या' पाकिस्तानी क्रिकेटरला बलात्काराच्या आरोपात ब्रिटनमध्ये अटक

नवी दिल्ली: पाकिस्तानचा २४ वर्षीय क्रिकेटर हैदर अलीला बलात्कार प्रकरणात ब्रिटनमध्ये अटक करण्यात आली आहे.

आशिया कप हॉकी स्पर्धेतून पाकिस्तान संघाची माघार; भारतात येऊन खेळण्यास नकार

नवी दिल्ली : आशिया कप क्रिकेट स्पर्धेतील भारत-पाक यांच्यातील तिढा सुटला असताना दुसऱ्या बाजूला आशिया कप हॉकी

मोहम्मद सिराज आयसीसी क्रमवारीत १५ व्या स्थानावर

इंग्लंड मालिकेमुळे सिराजची १२ स्थानाची झेप नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल येथील पाचव्या आणि शेवटच्या

आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच, गिल, जायसवाल आणि सुदर्शनला संधी मिळण्याची शक्यता

मुंबई : बीसीसीआय ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात आशिया कप २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे. यशस्वी