ENG vs IND: तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा डाव ४६५ धावांवर आटोपला, भारत २ बाद ९६ धावांवर

  32

लीड्स: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या लीड्स कसोटीचा तिसरा दिवस भारताच्या नावावर राहिला. पहिल्यांदा टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडचा पहिला डाव ४६५ धावांवर रोखला आणि ६ धावांनी आघाडी घेतली. यानंतर भारताने तिसऱ्या दिवशी २ बाद ९० धावा केल्या आहेत. यशस्वी जायसवाल ४ आणि साई सुदर्शन ३० धावा करून बाद झाले.

भारतीय संघाने शुभमन गिल, ऋषभ पंत आणि यशस्वी जायसवाल यांच्या शतकांच्या मदतीने पहिल्या डावात ४७१ धावा केल्या होत्या. याचे प्रत्युत्तर देण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडचा पहिला डाव ४६५ धावांवर आटोपला.

भारताचा दुसरा डाव आतापर्यंत


पहिल्या डावातील ६ धावांच्या आघाडीनंतर केएल राहुल आणि यशस्वीची जोडी मैदानावर पोहोचली. मात्र टीम इंडियाच्या दुसऱ्या डावाची सुरूवात चांगली राहिली नाही. १६ धावांवर भारताला पहिला झटका बसला. सलामीवीर यशस्वी जायसवाल ४ धावा करून बाद झाला. यानंतर साई सुदर्शन आणि केएल राहुल यांच्यात चांगली भागीदारी झाली. दोघांनी ६५हून अधिक धावा केल्या. मात्र साई सुदर्शन ३० धावा करून बाद झाला. मात्र दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने ९६ धावांची आघाडी घेतली होती. केएल राहुल ४७ तर शुभमन ६ धावांवर खेळत आहेत.
Comments
Add Comment

आगामी वर्ल्डकप खेळणे विराट आणि रोहितसाठी सोपे नसेल: गांगुली

कोलकाता : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. या दोघांचंही लक्ष्य

इंग्लंड विरुद्ध पहिल्या डावात ४७१ धावा करुनही भारताच्या नावावर लाजीरवाणा विक्रम

लीड्स : भारताने इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात सर्वबाद ४७१ धावा केल्या. यानंतर इंग्लंडने

लीड्स कसोटीत दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंड पिछाडीवर

लीड्स : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हेडिंग्ले लीड्स येथे सुरू

IND vs ENG: तीन फलंदाजांची शतके, तरीही टीम इंडियाच्या नावे लाजिरवाणा विक्रम!

टीम इंडिया ४७१ धावांवर सर्वबाद, कसोटी इतिहासातील सर्वात कमी ऑलआउट धावसंख्या लंडन: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG First Test Match)

IND vs ENG: ऋषभ पंतने शतक ठोकून रचला 'महाविक्रम', धोनी-साहाला टाकले मागे

लीड्स: भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात ऋषभ पंत (Rishabh Pant)ने आणखी एक शानदार शतक

भारताने पाडला धावांचा पाऊस, तीन फलंदाजांची शतकी खेळी

लीड्स : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हेडिंग्ले लीड्स येथे सुरू आहे.