ENG vs IND: तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा डाव ४६५ धावांवर आटोपला, भारत २ बाद ९६ धावांवर

लीड्स: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या लीड्स कसोटीचा तिसरा दिवस भारताच्या नावावर राहिला. पहिल्यांदा टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडचा पहिला डाव ४६५ धावांवर रोखला आणि ६ धावांनी आघाडी घेतली. यानंतर भारताने तिसऱ्या दिवशी २ बाद ९० धावा केल्या आहेत. यशस्वी जायसवाल ४ आणि साई सुदर्शन ३० धावा करून बाद झाले.

भारतीय संघाने शुभमन गिल, ऋषभ पंत आणि यशस्वी जायसवाल यांच्या शतकांच्या मदतीने पहिल्या डावात ४७१ धावा केल्या होत्या. याचे प्रत्युत्तर देण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडचा पहिला डाव ४६५ धावांवर आटोपला.

भारताचा दुसरा डाव आतापर्यंत


पहिल्या डावातील ६ धावांच्या आघाडीनंतर केएल राहुल आणि यशस्वीची जोडी मैदानावर पोहोचली. मात्र टीम इंडियाच्या दुसऱ्या डावाची सुरूवात चांगली राहिली नाही. १६ धावांवर भारताला पहिला झटका बसला. सलामीवीर यशस्वी जायसवाल ४ धावा करून बाद झाला. यानंतर साई सुदर्शन आणि केएल राहुल यांच्यात चांगली भागीदारी झाली. दोघांनी ६५हून अधिक धावा केल्या. मात्र साई सुदर्शन ३० धावा करून बाद झाला. मात्र दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने ९६ धावांची आघाडी घेतली होती. केएल राहुल ४७ तर शुभमन ६ धावांवर खेळत आहेत.
Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत