आषाढीनिमित्त पश्चिम रेल्वे चालवणार उधना ते मिरज दरम्यान विशेष गाड्या

मुंबई  : पंढरपूर येथील आषाढी एकादशी उत्सवादरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने उधना आणि मिरज दरम्यान दोन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रेन क्रमांक ०९०७९ उधना-मिरज स्पेशल ही गाडी शुक्रवार, ०४ जुलै रोजी सकाळी ११:२५ वाजता उधना येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता मिरजला पोहोचेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्र. ०९०८० मिरज-उधना विशेष गाडी शनिवार, ५ जुलै रोजी सकाळी ९:१० वाजता मिरजहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी ४ वाजता उधना येथे पोहोचेल.


ही गाडी बारडोली,व्यारा, नंदुरबार, दोंडाईचा, अमळनेर, धरणगाव, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी आणि पंढरपूर स्थानकावर दोन्ही दिशेने थांबेल. ट्रेन क्रमांक ०९०८१ उधना-मिरज स्पेशल ही ट्रेन शनिवार, ५ जुलै रोजी सकाळी ११:२५ वाजता उधना येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता मिरजला पोहोचेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्र. ०९०८२ मिरज-उधना विशेष ही गाडी रविवार, ६ जुलै रोजी सकाळी ९:१० वाजता मिरजहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता उधना येथे पोहोचेल. ही गाडी बारडोली, व्यारा, नंदुरबार, दोंडाईचा, अमळनेर, धरणगाव, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी आणि पंढरपूर स्थानकावर दोन्ही दिशेने थांबेल. या ट्रेनमध्ये स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लास कोच असतील. ०९०७९ आणि ०९०८१ या ट्रेन क्रमांकांसाठी बुकिंग २३ जून पासून पीआरएस काउंटर आणि आयआरसीटीसी वेबसाइटवर सुरू होणार असल्याचे पश्चिम रेल्वेने कळवले आहे.

Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण