आषाढीनिमित्त पश्चिम रेल्वे चालवणार उधना ते मिरज दरम्यान विशेष गाड्या

मुंबई  : पंढरपूर येथील आषाढी एकादशी उत्सवादरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने उधना आणि मिरज दरम्यान दोन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रेन क्रमांक ०९०७९ उधना-मिरज स्पेशल ही गाडी शुक्रवार, ०४ जुलै रोजी सकाळी ११:२५ वाजता उधना येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता मिरजला पोहोचेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्र. ०९०८० मिरज-उधना विशेष गाडी शनिवार, ५ जुलै रोजी सकाळी ९:१० वाजता मिरजहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी ४ वाजता उधना येथे पोहोचेल.


ही गाडी बारडोली,व्यारा, नंदुरबार, दोंडाईचा, अमळनेर, धरणगाव, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी आणि पंढरपूर स्थानकावर दोन्ही दिशेने थांबेल. ट्रेन क्रमांक ०९०८१ उधना-मिरज स्पेशल ही ट्रेन शनिवार, ५ जुलै रोजी सकाळी ११:२५ वाजता उधना येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता मिरजला पोहोचेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्र. ०९०८२ मिरज-उधना विशेष ही गाडी रविवार, ६ जुलै रोजी सकाळी ९:१० वाजता मिरजहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता उधना येथे पोहोचेल. ही गाडी बारडोली, व्यारा, नंदुरबार, दोंडाईचा, अमळनेर, धरणगाव, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी आणि पंढरपूर स्थानकावर दोन्ही दिशेने थांबेल. या ट्रेनमध्ये स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लास कोच असतील. ०९०७९ आणि ०९०८१ या ट्रेन क्रमांकांसाठी बुकिंग २३ जून पासून पीआरएस काउंटर आणि आयआरसीटीसी वेबसाइटवर सुरू होणार असल्याचे पश्चिम रेल्वेने कळवले आहे.

Comments
Add Comment

'उबाठा' गटाला पुन्हा खिंडार? निम्म्याहून अधिक खासदार शिवसेनेच्या वाटेवर

- कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच 'धमाका' होणार; एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यांनातर घडामोडींना वेग मुंबई :

महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक २०२६ एकमताने मंजूर

मुंबई : राज्यातील पर्यावरण संरक्षण, आर्थिक शिस्त आणि औद्योगिक विकास यांचा समतोल साधण्याच्या दृष्टीने

‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा

नक्षलग्रस्त भागात सागवान तस्करांचा धुमाकूळ; वनमंत्र्यांकडून सखोल चौकशीचे आदेश

मुंबई : नक्षलग्रस्त भागातील मौल्यवान सागवान लाकडाची तस्करी करणार्‍या संघटित टोळ्यांना राजकीय पाठबळ मिळत आहे,

मालाडमध्ये प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनात घोटाळा- चौकशी समिती गठीत; अहवाल प्राप्त होईपर्यंत प्रकल्पाला स्थगिती

मुंबई : मालाड पूर्वमधील प्रकल्प बाधितांच्या (पीएपी) पुनर्वसनात घोटाळा झाल्याची बाब बुधवारी विधानसभेत चर्चेला

मुंबईतील जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनात त्रुटी ठेवणार नाही; मंत्री पंकजा मुंडेंनी विधान परिषदेत मांडली ठोस भूमिका

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या केईएम (KEM), नायर आणि कूपर या प्रमुख रुग्णालयांमधील जैववैद्यकीय कचऱ्याची