आषाढीनिमित्त पश्चिम रेल्वे चालवणार उधना ते मिरज दरम्यान विशेष गाड्या

  25

मुंबई  : पंढरपूर येथील आषाढी एकादशी उत्सवादरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने उधना आणि मिरज दरम्यान दोन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रेन क्रमांक ०९०७९ उधना-मिरज स्पेशल ही गाडी शुक्रवार, ०४ जुलै रोजी सकाळी ११:२५ वाजता उधना येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता मिरजला पोहोचेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्र. ०९०८० मिरज-उधना विशेष गाडी शनिवार, ५ जुलै रोजी सकाळी ९:१० वाजता मिरजहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी ४ वाजता उधना येथे पोहोचेल.


ही गाडी बारडोली,व्यारा, नंदुरबार, दोंडाईचा, अमळनेर, धरणगाव, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी आणि पंढरपूर स्थानकावर दोन्ही दिशेने थांबेल. ट्रेन क्रमांक ०९०८१ उधना-मिरज स्पेशल ही ट्रेन शनिवार, ५ जुलै रोजी सकाळी ११:२५ वाजता उधना येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता मिरजला पोहोचेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्र. ०९०८२ मिरज-उधना विशेष ही गाडी रविवार, ६ जुलै रोजी सकाळी ९:१० वाजता मिरजहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता उधना येथे पोहोचेल. ही गाडी बारडोली, व्यारा, नंदुरबार, दोंडाईचा, अमळनेर, धरणगाव, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी आणि पंढरपूर स्थानकावर दोन्ही दिशेने थांबेल. या ट्रेनमध्ये स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लास कोच असतील. ०९०७९ आणि ०९०८१ या ट्रेन क्रमांकांसाठी बुकिंग २३ जून पासून पीआरएस काउंटर आणि आयआरसीटीसी वेबसाइटवर सुरू होणार असल्याचे पश्चिम रेल्वेने कळवले आहे.

Comments
Add Comment

देवेंद्रजी योगा करतात का ? पत्रकारांच्या प्रश्नांवर अमृता फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया...

मुंबई : आज आंतराराष्ट्रीय योगा दिवस असल्याने संपूर्ण राज्यातील शाळा, कॉलेज, शासकीय संस्थासोबतचं खाजगी

येत्या रविवारी पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक नाही

मुंबई : येत्या रविवारी मध्यरात्री पश्चिम रेल्वेतर्फे बोरिवली आणि भाईंदर स्थानकांदरम्यान रात्रीचा ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय

विलेपार्ले - अंधेरी पूर्व भागांत पुढील शनिवारपर्यंत पाणीकपात

मुंबई : मुंबई मेट्रो-७ अ प्रकल्प अंतर्गत, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे अर्थात एमएमआरडीएच्यावतीने,

आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदान

मुंबई : आगामी आषाढी एकादशी वारी करिता तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे मानाच्या १० पालख्यांसोबत येणाऱ्या एकूण १४००

MPSC परिक्षांचे फॉर्म भरण्यापूर्वी करावी लागणार खात्री, आयोगाने केला नवा बदल?...

मुंबई : MPSC परीक्षा दरम्यान मोठे घोटाळे होताना अनेक उदाहरणे आयोगासमोर आलेले आहेत. घोटाळ्यांवर आळा आलण्यासाठी