तालुक्यातील वाळणकोंडी पूल वाहतुकीसाठी बंद

महाड प्रांताधिकाऱ्यांचा नागरिकांना आदेश


महाड : महाड तालुक्यातील वाळणकोंडी येथील देवी वरदायनी मातेच्या मंदिराजवळील तीस वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या झुलत्या पुलाची सध्याची अवस्था अत्यंत कमकुवत झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली असून या पुलावरील होणारी वाहतूक तातडीने बंद करून या ठिकाणी २४ तास पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा, असे आदेश महाडचे प्रांताधिकारी यांनी काढले आहेत.


मागील काही वर्षापासून या परिसरात राहणाऱ्या मुंबई, ठाणे, पुणे, सुरत, बडोदा व स्थानिक युवकांच्या वतीने दिवाळी सणादरम्यान या ठिकाणी भव्य प्रमाणात मशाल महोत्सवाचे आयोजन केले जाते. बांधकाम विभागाच्या विनंतीनुसार हा मार्ग स्थानिक ग्रामस्थांसाठी नजीकचा असल्याने या पुलाचा वापर केला जात होता, मात्र आता मांघरूण व पंदेरी या भागातून लोकांना आपला दैनंदिन प्रवास करावा लागणार असल्याने तो अधिक लांबचा व त्रासाचा होईल, अशी माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून प्राप्त झाली आहे.


या ठिकाणी देवीचे भक्त व हजारो पर्यटक प्रतिवर्षी येत असून ही जागा ऐतिहासिकदृष्ट्या देखील प्रसिद्ध आहे. देवी वरदायनी मातेला प्रतिवर्षी नवस करणाऱ्या भक्तगणांची संख्या काही हजारोमध्ये आहे. येथील नदीपात्रात असलेले मासे हे अनेक वर्षापासून असल्याची कथा परिसरातील जेष्ठ नागरिकांकडून सांगण्यात येते. कितीही मोठा पूर आला तरीही या परिसरातून हे मासे वाहून जात नाहीत अशी त्यांची महती आहे.


काही दिवसांपुर्वी कुंडमाळा येथे झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार नाही. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या स्ट्रक्चर ऑडिटनुसार हा पुल धोकादायक असल्याचे वास्तव समोर आले. त्यामुळे हा पुल वाहतुकीसाठी १८ जून ते १८ ऑगस्ट दरम्यान बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान शासनाने हा पूल सद्यस्थितीची तांत्रिक स्थिती लक्षात घेऊन येथून वाहतूक बंद केल्यास पावसाळ्यापश्चात या ठिकाणी नव्या पुलाची निर्मिती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

Comments
Add Comment

अर्थसंकल्पातून कोकणच्या आर्थिक विकासाला नवी दिशा

काजू, नारळ, मत्स्योद्योगाला भरीव निधी सुभाष म्हात्रे अलिबाग : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी

विकास गोगावले पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात

रायगड : राज्यातील राजकारणात लक्षवेधी ठरणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत महाड तालुक्यातील नाडगावतर्फे बिरवाडी

रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत नव्या चेहऱ्यांची कसोटी

१४ माजी सदस्य रिंगणात; ५९ जागांसाठी रंगतदार लढाई अलिबाग : उमेदवारी अर्ज माघारीनंतर रायगड जिल्हा परिषदेच्या

अलिबाग पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना-शेकाप लढत

१४ जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात अलिबाग : अलिबाग पंचायत समिती निवडणुकीसाठी १४ जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात आहेत.

राजिप, पंचायत समित्या निवडणुकीच्या तोंडावर पोलीस यंत्रणा सज्ज

अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका होत असल्याने

करंजाडी जिप गटात तिरंगी लढत

महाड ( वार्ताहर): महाड विधानसभा मतदारसंघ हा गेल्या ४ टर्म शिवसेनेचा बालेकिल्ला राहीला आहे. गतवेळच्या निवडणुकीत