तालुक्यातील वाळणकोंडी पूल वाहतुकीसाठी बंद

महाड प्रांताधिकाऱ्यांचा नागरिकांना आदेश


महाड : महाड तालुक्यातील वाळणकोंडी येथील देवी वरदायनी मातेच्या मंदिराजवळील तीस वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या झुलत्या पुलाची सध्याची अवस्था अत्यंत कमकुवत झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली असून या पुलावरील होणारी वाहतूक तातडीने बंद करून या ठिकाणी २४ तास पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा, असे आदेश महाडचे प्रांताधिकारी यांनी काढले आहेत.


मागील काही वर्षापासून या परिसरात राहणाऱ्या मुंबई, ठाणे, पुणे, सुरत, बडोदा व स्थानिक युवकांच्या वतीने दिवाळी सणादरम्यान या ठिकाणी भव्य प्रमाणात मशाल महोत्सवाचे आयोजन केले जाते. बांधकाम विभागाच्या विनंतीनुसार हा मार्ग स्थानिक ग्रामस्थांसाठी नजीकचा असल्याने या पुलाचा वापर केला जात होता, मात्र आता मांघरूण व पंदेरी या भागातून लोकांना आपला दैनंदिन प्रवास करावा लागणार असल्याने तो अधिक लांबचा व त्रासाचा होईल, अशी माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून प्राप्त झाली आहे.


या ठिकाणी देवीचे भक्त व हजारो पर्यटक प्रतिवर्षी येत असून ही जागा ऐतिहासिकदृष्ट्या देखील प्रसिद्ध आहे. देवी वरदायनी मातेला प्रतिवर्षी नवस करणाऱ्या भक्तगणांची संख्या काही हजारोमध्ये आहे. येथील नदीपात्रात असलेले मासे हे अनेक वर्षापासून असल्याची कथा परिसरातील जेष्ठ नागरिकांकडून सांगण्यात येते. कितीही मोठा पूर आला तरीही या परिसरातून हे मासे वाहून जात नाहीत अशी त्यांची महती आहे.


काही दिवसांपुर्वी कुंडमाळा येथे झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार नाही. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या स्ट्रक्चर ऑडिटनुसार हा पुल धोकादायक असल्याचे वास्तव समोर आले. त्यामुळे हा पुल वाहतुकीसाठी १८ जून ते १८ ऑगस्ट दरम्यान बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान शासनाने हा पूल सद्यस्थितीची तांत्रिक स्थिती लक्षात घेऊन येथून वाहतूक बंद केल्यास पावसाळ्यापश्चात या ठिकाणी नव्या पुलाची निर्मिती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

Comments
Add Comment

विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम सुरू होण्याच्या दिशेने एक पाऊल

चार तासांचा प्रवास केवळ दीड तासांत होणार मुंबई  : गेल्या ९ वर्षांपासून रखडलेल्या विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम

जंजिरा किल्ला तब्बल नऊ दिवसांनी पर्यटकांसाठी झाला खुला

मुरुड : मुरुड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची मांदियाळी येत असते. अचानक हवामानात बदल

करंजाचा धाडसी युवक आतिश कोळी ठरला ‘देवदूत’

वादळात अडकलेल्या १५ खलाशांचा वाचवला जीव अलिबाग  : उरण तालुक्यातील करंजा पाडा येथील आतिश सदानंद कोळी या युवकाने

अलिबागच्या समुद्रात बेपत्ता झालेल्या मुंबईतील दोन तरुणाचा शोध सुरू

अलिबाग  : अलिबाग शहराजवळील जिल्हा न्यायालयाच्या पाठीमागील समुद्रकिनारी फिरायला आलेल्या चार मित्रांपैकी दोघे

टाटा मिनी बसचा अपघात, गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला निघालेल्या दोघांचा मृत्यू

कर्जत : समृद्धी महामार्गावर कर्जतजवळ बोगद्यात टाटा मिनी बसचा अपघात झाला. चालकाला डुलकी लागल्यामुळे त्याचे

अरे बापरे! मांडवा जेट्टीच्या नव्या पुलाचे खांब निकामी होण्याच्या मार्गावर; जेट्टी कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता

लोखंडी सळ्याही आल्या बाहेर, मूलभूत सुविधांचाही अभाव अलिबाग : गेटवे-मुंबई ते मांडवा-अलिबागला जलमार्गाने