तालुक्यातील वाळणकोंडी पूल वाहतुकीसाठी बंद

महाड प्रांताधिकाऱ्यांचा नागरिकांना आदेश


महाड : महाड तालुक्यातील वाळणकोंडी येथील देवी वरदायनी मातेच्या मंदिराजवळील तीस वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या झुलत्या पुलाची सध्याची अवस्था अत्यंत कमकुवत झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली असून या पुलावरील होणारी वाहतूक तातडीने बंद करून या ठिकाणी २४ तास पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा, असे आदेश महाडचे प्रांताधिकारी यांनी काढले आहेत.


मागील काही वर्षापासून या परिसरात राहणाऱ्या मुंबई, ठाणे, पुणे, सुरत, बडोदा व स्थानिक युवकांच्या वतीने दिवाळी सणादरम्यान या ठिकाणी भव्य प्रमाणात मशाल महोत्सवाचे आयोजन केले जाते. बांधकाम विभागाच्या विनंतीनुसार हा मार्ग स्थानिक ग्रामस्थांसाठी नजीकचा असल्याने या पुलाचा वापर केला जात होता, मात्र आता मांघरूण व पंदेरी या भागातून लोकांना आपला दैनंदिन प्रवास करावा लागणार असल्याने तो अधिक लांबचा व त्रासाचा होईल, अशी माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून प्राप्त झाली आहे.


या ठिकाणी देवीचे भक्त व हजारो पर्यटक प्रतिवर्षी येत असून ही जागा ऐतिहासिकदृष्ट्या देखील प्रसिद्ध आहे. देवी वरदायनी मातेला प्रतिवर्षी नवस करणाऱ्या भक्तगणांची संख्या काही हजारोमध्ये आहे. येथील नदीपात्रात असलेले मासे हे अनेक वर्षापासून असल्याची कथा परिसरातील जेष्ठ नागरिकांकडून सांगण्यात येते. कितीही मोठा पूर आला तरीही या परिसरातून हे मासे वाहून जात नाहीत अशी त्यांची महती आहे.


काही दिवसांपुर्वी कुंडमाळा येथे झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार नाही. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या स्ट्रक्चर ऑडिटनुसार हा पुल धोकादायक असल्याचे वास्तव समोर आले. त्यामुळे हा पुल वाहतुकीसाठी १८ जून ते १८ ऑगस्ट दरम्यान बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान शासनाने हा पूल सद्यस्थितीची तांत्रिक स्थिती लक्षात घेऊन येथून वाहतूक बंद केल्यास पावसाळ्यापश्चात या ठिकाणी नव्या पुलाची निर्मिती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

Comments
Add Comment

मुंबई-काशिद रो-रो सेवा रखडली

वादळ, वारे, उसळणाऱ्या लाटांमुळे कामात अडथळा नांदगाव मुरुड : मुंबई-काशिद रो-रो सेवेचे गेल्या पाच वर्षांपासून संथ

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून,

मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी