अमिताभ बच्चनच्या आवाजाला लोक कंटाळले!

मुंबई : प्रत्येक फोन कॉलपूर्वी वाजणाऱ्या सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील सायबर सुरक्षा जनजागृती कॉलर ट्यूनमुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. ४० सेकंदांचा हा संदेश, कॉल कितीही महत्त्वाचा असो, लोकांना त्रास देत आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्रालय आणि ट्राय (TRAI) कडे याबाबत तक्रारींचा पाऊस पडत असून, सोशल मीडियावरही ही कॉलर ट्यून बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. लोकांचे म्हणणे आहे की, एकदा-दोनदा ऐकल्यानंतर हा संदेश वारंवार ऐकणे असह्य झाले आहे.



सायबर सुरक्षेबद्दल जागृती करण्यासाठी प्रत्येक कॉलपूर्वी वाजणारी अमिताभ बच्चन यांची कॉलर ट्यून आता कोविड प्रतिबंधक संदेशाप्रमाणेच डोकेदुखी बनली आहे. कितीही तातडीचा कॉल असला तरी, ४० सेकंद हा आवाज ऐकूनच घ्यावा लागतो. उदाहरणार्थ, जर कोणी मोठ्या संकटात सापडणार असेल आणि त्याला त्वरित मदत हवी असेल, तरी बच्चन साहेबांचा आवाज आधी ऐकावा लागतो. याच कारणामुळे, देशभरात लोकप्रिय असलेल्या या आवाजाबद्दल लोक तक्रारी करत आहेत आणि फेसबुक, एक्स, इंस्टाग्राम आणि यूट्यूबसह प्रत्येक सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर नाराजी व्यक्त करत आहेत.


गेल्या वर्षी सायबर सुरक्षा जनजागृतीसाठी बच्चन यांच्या आवाजातील ही कॉलर ट्यून प्रत्येक कॉलपूर्वी वाजण्यास सुरुवात झाली होती. आता देशभरच्या त्रस्त नागरिकांनी केंद्रीय दूरसंचार मंत्रालय आणि ट्रायकडे या सतत वाजणाऱ्या आवाजाबद्दल तक्रारी केल्या आहेत. तर, मोठ्या प्रमाणावर लोक सोशल मीडियावर ही कॉलर ट्यून बंद करण्याची मागणी करत आहेत.


परंतू, दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते, कॉलरला हा संदेश ऐकू येत असला तरी दुसऱ्या बाजूला फोन वाजण्यास सुरुवात होते. पण दूरसंचार तज्ञांच्या मते, हे तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे की काही वेळा कॉलर ट्यून पूर्ण झाल्यावरच दुसऱ्या बाजूला रिंग जाते.


एक-दोन कॉलमध्ये सायबर सुरक्षा संदेश ऐकण्यास कोणतीही अडचण नाही, परंतु एकाच नंबरवर अनेक वेळा कॉल केल्यावरही हा संदेश सतत येत राहतो, जे खूप त्रासदायक आहे. यात सुधारणा करणे आवश्यक आहे आणि जर ते शक्य नसेल तर ही कॉलर ट्यून बंद करावी, अशी मागणी आता केली जात आहे.


कोरोना काळातही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा ३० सेकंदांचा कोविड प्रतिबंधक संदेश प्रत्येक कॉलपूर्वी ऐकू येत होता आणि मोठ्या प्रमाणावर लोकांच्या विरोधानंतर तो बंद करण्यात आला. त्यावेळीही लोकांनी सरकारला दररोज पहिल्या कॉलपूर्वी अशी कॉलर ट्यून वाजवणे ठीक आहे, परंतु प्रत्येक कॉलवर ती येणे ही एक मोठी समस्या असल्याचे सुचवले होते.आता सायबर क्राइमसंदर्भात या कॉलर ट्यूनचीही तीच अवस्था झाली आहे.



हा सायबर अलर्ट आवाज काय आहे?


भारत सरकारच्या निर्देशानुसार, दूरसंचार कंपन्यांकडून प्रत्येक आउटगोइंग कॉलपूर्वी एक इशारा संदेश ऐकवला जात आहे. या संदेशात वापरकर्त्यांना संशयित लिंक किंवा अज्ञात OTP कोणासोबतही शेअर न करण्यास आणि अनोळखी कॉल्सपासून सावध राहण्यास सांगितले जाते. हा ऑडिओ सुमारे ४० सेकंदांचा असतो आणि लोकांना सुरक्षित डिजिटल व्यवहार करण्याचे आवाहन करतो. याचा उद्देश लोकांना डिजिटल फसवणुकीपासून वाचवणे आहे, परंतु प्रत्येक कॉलवर वारंवार तोच संदेश येणे ही एक मोठी समस्या बनली आहे.

Comments
Add Comment

Anti-Narcotics Task Force : अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्समधील जवानांना मिळणार ३० टक्के 'प्रोत्साहन भत्ता'; गृह विभागाचा निर्णय

 १ ऑगस्टपासून अंमलबजावणी https://prahaar.in/2026/07/29/malshej-ghat-planning-a-weekend-trip-to-malshej-wait-the-ghat-will-remain-closed-for-another-3-4-days-due-to-a-road-collapse-important-advisory-from-the-administration/ मुंबई :

BMC : मानखुर्द आणि गोवंडी परिसरातील स्वच्छतेविषयक कामांची आयुक्तांनी केली पाहणी, असे दिले निर्देश..

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) आयुक्त अश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांनी पूर्व उपनगरातील मानखुर्द आणि गोवंडी परिसरातील

Redevelopment of Pagdi Buildings : मुंबईतील पागडी इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न; जुने भाडेकरुन आजही आपल्या हक्काच्या घरापासून वंचित

- सुधार समितीत सदस्यांनी व्यक्त केली चिंता मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील पागडी तत्वावरील अर्थात ना उपकर

Mulund Dumping Ground : मुलुंड डम्पिंग ग्राऊंडची जागा धारावी विकास प्रकल्पाला देण्याचा प्रस्ताव लांबणीवर

भाडेपट्ट्यांवर देण्याचा प्रस्ताव सुधार समितीने ठेवला राखून पुढील बैठकीत निर्णय होण्याची शक्यता मुंबई

BMC News : सेव्हन हिल्स रुग्णालयाचा तिढा सुटला, सुधार समितीने दिली मंजुरी

आता ७६ खाटा आणि नंतर मिळणार ३०० खाटा महापालिकेला सेव्हन हिल्स हेल्थकेअरसोबत कॅप्री ग्लोबलसोबत करार करण्यास

FDA Raid : सीसीआय', 'एमआयजी क्लब', जुहू जिमखान्यासह नामांकित क्लबवर 'एफडीए'ची कारवाई

परवाने निलंबित; स्वयंपाकघरांमध्ये माश्या, झुरळांचा सुळसुळाट, बुरशी लागलेल्या भाज्या आणि अस्वच्छतेचे