निवडणुकीचे व्हीडिओसह फोटो ४५ दिवसांत नष्ट करा

केंद्रीय निवडणूक आयोगाचे राज्यांना निर्देश


नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेशी संबंधित व्हीडिओ फुटेज आणि फोटो जतन करण्याच्या कालावधीत बदल केला आहे. या निर्णयानुसार निवडणुकीनंतर आता एक वर्षाऐवजी केवळ ४५ दिवसांपर्यंत हे फुटेज आणि फोटो संग्रहित ठेवले जातील. मतदानाचा निकाल जाहीर झाल्यानंतर हा कालावधी लागू होईल व या कालावधीत कोणतीही निवडणुकीशी संबंधित याचिका दाखल केली नाही, तर डेटा नष्ट केला जाऊ शकतो. अलीकडच्या काळात या सामग्रीचा होणारा दुरुपयोगाचे कारण देत आयोगाने हा बदल केला आहे.


निवडणूक आयोगाने ३० मे रोजी सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना (सीईओ) या निर्णयासंदर्भात सूचना दिली. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, नामांकनपूर्व कालावधी, उमेदवारी अर्ज दाखल करणे, प्रचाराचा कालावधी, मतदान व मतमोजणी यांसारख्या मतदान प्रक्रियेच्या विविध टप्प्यांशी संबंधित फुटेज आता ४५ दिवसांसाठी जतन केले जातील. निवडणूक याचिका दाखल करण्याच्या कालमर्यादेनुरूप हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीत एखादी याचिका दाखल करण्यात आलीच, तर प्रकरण निकाली निघेपर्यंत संबंधित फुटेज जतन केले जाईल.


निवडणूक प्रक्रियेचे व्हीडिओ शूटिंग आणि छायाचित्रण कायद्याने अनिवार्य नसून ते केवळ अंतर्गत व्यवस्थापनाचे एक साधन आहे. सोशल मीडियावर कोणताही संदर्भ न देता, चुकीच्या पद्धतीने हे फुटेज प्रसारित केल्याचे समोर आले आहे.

Comments
Add Comment

पंतप्रधान मोदी मिझोरम, मणिपूर, आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहार या पाच राज्यांच्या तीन दिवसीय दौऱ्यावर

मिझोरम, मणिपूर आणि आसाममध्ये ३५,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रकल्पांचे उद्घाटन करणार प. बंगाल आणि बिहारमध्ये

पंतप्रधान मोदींचा आज मणिपूर दौरा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरला भेट देणार आहेत, जिथे ते अनेक प्रकल्पांची पायाभरणी करतील आणि एका

सावधान! आरोग्य मंत्रालयाचे सर्व राज्यांना अलर्ट जारी; मोठं संकट येणार की साथरोग?

पुरामुळे वाढतेय साथरोगाची भीती: आरोग्य मंत्रालयाचा सर्व राज्यांना 'हाय अलर्ट' जारी, डेंग्यू आणि मलेरियाचा धोका

माधुरी हत्ती प्रकरण : कोल्हापूरला पाठवण्यावर तुर्तास निर्णय नाही

प्रकरण उच्चस्तरीय समितीकडे वर्ग करण्याबाबत सर्वांचे एकमत नवी दिल्ली : कोल्हापूर

Nepal News : भारतीय पर्यटकांवर नेपाळमध्ये हल्ला; प्रवाशांचे मोबाईल-रोख रक्कम लुटली अन् सर्वांना तातडीनं...

काठमांडू : नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाला आता हिंसक वळण मिळालंय. गेल्या काही

सी. पी. राधाकृष्णन झाले भारताचे १५ वे उपराष्ट्रपती, राष्ट्रपतींनी दिली शपथ

नवी दिल्ली : भारताचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी. राधाकृष्णन यांनी शपथ घेतली. दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे