प्रहार    

अहमदाबाद विमान अपघात: DGCAचा एअर इंडियाला दणका! एअर इंडियाला 'टाळे' लागू शकते; ३ अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश

  87

अहमदाबाद विमान अपघात: DGCAचा एअर इंडियाला दणका! एअर इंडियाला 'टाळे' लागू शकते; ३ अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश

नवी दिल्ली: अहमदाबाद येथे १२ जून रोजी झालेल्या भीषण विमान अपघातानंतर आता मोठी कारवाई करण्यात आली आहे. या दुर्घटनेत २७० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याने, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) एअर इंडियाला त्यांच्या तीन अधिकाऱ्यांना क्रू ड्युटी शेड्यूल आणि रोस्टरसंबंधित जबाबदाऱ्यांवरून तात्काळ हटवण्याचे आदेश दिले आहेत.


DGCA ने एअर इंडियाला गंभीर इशारा दिला आहे की, आगामी काळात जर क्रू शेड्यूलिंग नियम, परवाना किंवा फ्लाइट वेळेच्या मर्यादेचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई केली जाईल. यामध्ये मोठा दंड, परवाना रद्द करणे किंवा ऑपरेटर परवानग्या रद्द करणे यांचा समावेश असेल, म्हणजेच अशा चुका सुरू राहिल्यास एअर इंडियाला 'टाळे' लागू शकते.



इतकंच नाही, तर DGCA ने एअरलाईनला कारणे दाखवा नोटीस (Show Cause Notice) बजावली आहे. एअर इंडियाने ठरवून दिलेल्या फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (FDTL) नुसार वैमानिकांना १० तासांपेक्षा जास्त वेळ उड्डाण करण्यास भाग पाडले आणि १६ व १७ मे रोजी बंगळुरू-लंडन या दोन उड्डाणांमध्ये नियमांचे उल्लंघन केले, याबद्दल ही नोटीस बजावण्यात आली आहे.



DGCA च्या आदेशात काय म्हटले आहे?


DGCA ने आपल्या आदेशात स्पष्ट म्हटले आहे की, "एअर इंडियाला या तीन अधिकाऱ्यांविरोधात तात्काळ अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई सुरू करावी लागेल आणि त्याचा अहवाल १० दिवसांच्या आत सादर करावा लागेल." या अधिकाऱ्यांना सध्या ऑपरेशनसंबंधित कामावरून हटवून नॉन-ऑपरेशनल भूमिकांवर नियुक्त केले जावे. जोपर्यंत शेड्यूलिंग संबंधी प्रक्रियेत आवश्यक सुधारणा पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत हे अधिकारी विमान सुरक्षा किंवा क्रू संबंधी जबाबदारी असलेल्या पदांवर राहणार नाहीत, असेही आदेशात म्हटले आहे.


DGCA ने ज्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत, त्यात एअर इंडियामध्ये कार्यरत असलेले चूरा सिंग (डिव्हिजनल उपाध्यक्ष), पिंकी मित्तल (मुख्य व्यवस्थापक - ऑपरेशन डायरेक्टोरेट) आणि पायल अरोडा (क्रू शेड्यूलिंग - प्लॅनिंग) यांचा समावेश आहे.


उल्लेखनीय आहे की, १२ जून रोजी अहमदाबाद येथून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच कोसळले होते. हे विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या इमारतीवर आदळले. या अपघातात विमानातील २४२ प्रवाशांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला, तर केवळ एक व्यक्ती बचावला. याशिवाय, बीजे मेडिकल कॉलेजमधील २० हून अधिक जणांनाही या अपघातात आपले प्राण गमवावे लागले.

Comments
Add Comment

किश्तवाडमधील ढगफुटीत ४० हून अधिक जणांचा मृत्यू, १५० जण बेपत्ता

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथील चशोटी गावात गुरुवारी दुपारी १२:३० वाजता ढगफुटी झाली. डोंगरावरून

SIR प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : बिहारमधील SIR प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी करत दिग्गज वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद

स्वातंत्र्य दिनानिमित्त १०९० जणांना शौर्य/सेवा पदके जाहीर, महाराष्ट्राचे मानकरी येथे पहा...

महाराष्ट्रातल्या ०७ पोलिसांना शौर्य पदक, ०३ पोलिसांना उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक ३९ पोलिसांना

मुसळधार पावसात दुचाकीवर झाड कोसळले आणि...

नवी दिल्ली : दिल्लीत कालकाजी येथे मुसळधार पावसात दुचाकीवर झाड कोसळले. या दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले.

Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा हाहाकार, किन्नौर ढगफुटीने उध्वस्त; घरं-गाड्या पुरात गेल्या वाहून

किन्नौर : हिमाचल प्रदेशात निसर्गाने पुन्हा एकदा आपला प्रकोप दाखवला आहे. किन्नौर जिल्ह्यातील ऋषी डोंगरी खोऱ्यात

राहुल गांधींच्या वकिलांचा यु-टर्न: “जीवाला धोका” म्हणणारा अर्ज परत घेणार

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वकिलांनी पुणे येथील न्यायालयात गांधींना वादी